शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४५ फिर्यादींना हस्तांतरीत केला एक कोटी २५ लाखांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 9:48 PM

ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीणमधील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील रोकड आणि दागिन्यांसह सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यावेळी सेवापदके परत मिळाल्याने लष्कारातील माजी अधिकारीही भावूक झाला होता.

ठळक मुद्देचोरीतील सेवापदके परत मिळाल्याने लष्करातील अधिकारी झाला भावूक दागिनेही पुन्हा मिळाल्याने किन्हवलीची गृहिणीही भारावली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चोरी आणि जबरी चोरीतील एक कोटी २५ लाख ६९ हजार ८३६ रुपयांचा ऐवज ४५ फिर्यादींना ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते मंगळवारी अभिहस्तांतरण करण्यात आला. जबरी चोरीतील पदके आणि दोन लाखांची रक्कम पोलिसांनी परत केल्यानंतर लष्कारातील माजी अधिकारी सनी थॉमस यांनी समाधान व्यक्त करतांनाच भावूक झाले होते.ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीण जिल्हयातील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील सोन्याचे दागिने (मंगळसूत्रे, सोनसाखळी, कर्णफुले, बे्रसलेट, कानाच्या रिंगा, झुमके आणि इतर ) तसेच चोरीस गेलेली मोटारसायकल, मोबाईल आणि रोकड असा सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.

यावेळी मौल्यवान मंगळसूत्रांसह मौल्यवान दागिने, मोबाईल, मोटारसायकली आणि रोकड परत मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. अंबरनाथ येथील कुळगाव येथील रहिवाशी असेलेले सैन्य दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट सनी थॉमस यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. थॉमस यांनी भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपली सेवा बजावल्याने त्यांना चांगल्या कामगिरीबद्दलची सेवा पदके मिळाली होती. त्यांच्याकडे झालेल्या या मौल्यवान पदकांसह दोन लाखांची रोकड असा दोन लाख ३५ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. ही चोरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने अवघ्या चार दिवसात उघडकीस आणली होती. या प्रकरणात नवी मुंबईतून तिघा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीतील पदकांसह सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. आयुष्यात आपण काहीच कमावले नाही. पण निवृत्तीनंतर मिळालेली दोन लाखांची जमा पुंजी समाजकार्यासाठी उपयोगात आणायची होती. शिवाय भारत पाक सीमेमवर बजावलेल्या कर्तव्यापोटी केंद्र सरकारकडून मिळालेले पदक हीच एक मोठी संपत्ती होती. तीही चोरी झाली होती. ती पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक आंधळे यांच्या पथकाचा आपल्याला अभिमान आहे. पोलीस मेहनत घेऊन गुन्हा कसा उघडकीस आणतात याचा चांगला अनुभव आल्याचे सांगतांनाच त्यांना गहिवरुन आले. तसेच घरातील चोरीतून चोरटयांनी आयुष्यभराची कमाई चोरुन नेली होती. पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा सर्व साडे चार तोळयांचा ८८ हजारांचा ऐवज परत मिळवून दिल्याचे किन्हवली येथील वैशाली देशमुख यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. देशमुख यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. तिचा किन्हवली पोलिसांनी यशस्वी तपास केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक नाईक, मीरा रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी, पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

नोकरांना काम देतांना काळजी घ्या- डॉ. राठोडआपल्या मालमत्तेची कशा प्रकारे सुरक्षा घ्यायची याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही तसेच अनोळखी व्यक्तीला कोणतेही काम देतांना किंवा नोकरीवर ठेवतांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी बाहेरगावी जातांना आपल्या घराची कशा प्रकारे सुरक्षा घ्यावयाची याबाबत अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस