शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

ठाणे जिल्ह्यातील धरणातील साठ्यात झपाट्याने घट; एमआयडीसीकडून पाण्याची चोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 7:10 PM

सध्या स्थितीला पाण्याची बचत करण्याचे धोरण स्विकारणे स्वागतार्थ मानले जात आहे. यामुळे शहरातील काही हॉटेल्समध्ये अर्धा ग्लास पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. तर रस्त्याच्या कडेचा नळ बंद करण्याची जाणीव नागरिकांमध्ये दिसून येत आहे. यातून पाणी बचत होण्यास मदत होत आहे. मात्र एमआयडीसी त्यांच्या ५८३ दश लक्ष लिटर मंजूर पाणी को्यापेक्षा सुमारे ८०० ते ८५० दशलक्ष लिटर पाणी रोज उचलत आहे, असे संबंधीत विभागाच्या निदर्शनात आले. सक्तीने पाणी चोरी सक्तीने बंद केलेली असतानाही एमआयडीसीकडून त्यास प्रतिसाद दिला जात नाही.

ठळक मुद्देभातसा धरणात १७ दश लक्ष घनमीटर तर बारवीत दहा दशलक्ष घनमीटर पाणी साठा कमी मात्र एमआयडीसीकडून अद्यापही पूर्वीप्रमाणेचे पाण्याची चोरी सुरू पाणी समस्या गंभीर असूनही या धरणातून एमआयडीसी २०० ते २६५ एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची गंभीरबाब

सुरेश लोखंडेठाणे : पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा मागील वर्षाच्या तुलनेत झपाट्याने कमी झाला आहे. भातसा धरणात १७ दश लक्ष घनमीटर तर बारवीत दहा दशलक्ष घनमीटर पाणी साठा कमी झाला आहे. तरी देखील सध्याच्या कपातीमधील वाढ टाळण्यासाठी जादा म्हणजे चोरून पाणी उचलण्यास सक्तीने बंदी घातली आहे. मात्र एमआयडीसीकडून अद्यापही पूर्वीप्रमाणेचे पाण्याची चोरी सुरू असल्याचे निदर्शनात आल्याचे संबंधीतांकडून नमुद करण्यात आले आहे. या पाणी चोरीला वेळीच थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.सध्या स्थितीला पाण्याची बचत करण्याचे धोरण स्विकारणे स्वागतार्थ मानले जात आहे. यामुळे शहरातील काही हॉटेल्समध्ये अर्धा ग्लास पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. तर रस्त्याच्या कडेचा नळ बंद करण्याची जाणीव नागरिकांमध्ये दिसून येत आहे. यातून पाणी बचत होण्यास मदत होत आहे. मात्र एमआयडीसी त्यांच्या ५८३ दश लक्ष लिटर मंजूर पाणी को्यापेक्षा सुमारे ८०० ते ८५० दशलक्ष लिटर पाणी रोज उचलत आहे, असे संबंधीत विभागाच्या निदर्शनात आले. सक्तीने पाणी चोरी सक्तीने बंद केलेली असतानाही एमआयडीसीकडून त्यास प्रतिसाद दिला जात नाही. याकडे संबंधीत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन एमआयडीसीवर कारवाई करीत जादा पाणी उचलण्यास बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आहे.बारवी धरणात मागच्या वर्षी आजच्या दिवशी २१०.२७ दश लक्ष घनमीटर म्हणजे ९०.२२ टक्के पाणी साइा होता. आता तो दहा दश लक्ष घनमीटने कमी होऊन केवळ ८१.१३ टक्के साठा शिल्लक आहे. मागील आठव्याच्या तुलनेत दोन टक्के पाणी साठा कमी झाल्याची धक्कादायक माहिती आहे. पाणी समस्या गंभीर असूनही या धरणातून एमआयडीसी २०० ते २६५ एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची गंभीरबाब संबंधीत विभागाकडून सांगितली जात आहे. भातसाधरणात मागील वर्षाच्या तुलने १७ दश लक्ष घनमीटर पाणी साठा कमी झाला आहे. आंध्रा धरणात सहा दश लक्ष घनमीटर पाण्याची तूट आहे. यातूनही सुरळीत पाणी पुरवठा कमी होण्यासाठी २२ टक्के पाणी कपात लागू आहे. त्यापोटी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले. या कपातीत वाढ होऊ नये, यासाठी मंजूर पाणी कोट्यापेक्षा चोरून जादा पाणी उचलणाºयावर कारवाईचे संकेत आहे. यास अनुसरून एमआयडीसीवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.* मध्ये वैतरणाच्या पाण्यामुळे मोकड सागरचा साठा वाढला -अवकाळी पाऊस पडलेला नसतानाही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या  मोडक सागर धरणात मागील आठव्याच्या तुलनेत सुमारे चार दश लक्ष घनमीटर पाणी साठा वाढल्याचे निदर्शनात आले. यास अनुसरून चौकशी केली असता अप्पर वैतरणाचे सुमारे ३०० ते ४०० क्युसेस पाणी मध्यवैतरणात सोडले जाते. त्यानंतर हे पाणी मोडक सागरमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे या धरणातील पाणी साठा वाढलेला दिसूत असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या संबंधीत विभागाकडून करण्यात आले आहे. यानुसार मोडक सागरमध्ये सध्या ४३ दश लक्ष घनमीटर पाणी साठा आहे. मागील आठवड्यात त्यात केवळ ३८.९१ दश लक्ष घनमीटर पाणी साठा होता.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईthaneठाणेWaterपाणी