शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रिक्षा चालकांना मारहाण झाली नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी; एकनाथ शिंदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:16 IST

ठाण्यात सोमवारी महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता.

ठाणे: लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे ठाण्यात सर्वसामान्य ठाणोकरांचे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. त्यात शिवसैनिकांकडून दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते. तसेच रिक्षा चालकांना देखील मारहाण करण्यात आली. परंतु ठाण्यातील व्यापारी हे स्वच्छेने बंदमध्ये सहभागी झाले असल्याचं सांगत कोणत्याही रिक्षा चालकांना मारहाण झाली नसल्याचा दावा ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तरीदेखील मारहाण प्रकरणी माहिती घेऊन पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील एकनाश शिंदे यांनी यावेळी दिली.

ठाण्यात सोमवारी महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता. परंतु यावेळी स्टेशन परिसर, जांभळी नाका, नौपाडा भागातील व्यापा:यांची दुकाने बंद करण्याचे काम आंदोलनकत्र्या शिवसैनिकांकडून केले जात असल्याचे चित्र दिसून आले. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या  रिक्षा चालकांना देखील मारहाण करीत रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले. या बाबत एकनाथ शिंदे यांना छेडले असता, त्यांनी लखीमुपर झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युनंतर हा बंद पुकारण्यात आला आहे. त्याला व्यापाऱ्यांनी आणि नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. ते स्वच्छेने या आंदोलनात सहभागी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

चंद्रकात पाटील यांनी हे आंदोलन फसल्याची टिका केली आहे, यावर त्यांना छेडले असता, हे आंदोलन कुठल्याही प्रकारे आंदोलन फसलेले नाही, उलट अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच आस्थापना बंद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाण्यात काही ठिकाणी जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्याबाबत शिंदे यांनी मात्र कोणावरही जबरदस्तीने बंद करण्याची वेळ आलेली नाही, ते स्वत:हून बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा केला आहे. टिएमटी बंद ठेवण्यामागे कारण काय असा सवाल केला असता, नागरीकांनी ठरवले होते, की कामकाज बंद ठेवण्याचे त्यानुसार कोणाचही गैरसोय झालेली नाही. तशी आगाऊ सुचना देखील दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणे