शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

Thane: शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे  

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 06, 2023 5:32 PM

Thane: समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - आमच्या शांतीवन आश्रमात जेव्हा नुकताच जन्मलेल्या बाळाला घेऊन मुली येतात...आमच्याकडे बाळाला सोपवून पळुन जाण्याचा प्रयत्न करतात.. अंधारात लपून बसतात...कधीकधी बेवारस बाळ सापडतात. तेव्हा वाटतं की, आई वर लिहिलेल्या मराठी साहित्यातील सगळ्या कविता पाण्यात बूडवून टाकाव्यात... असे भावविभोर अनुभव कथन करता- करता बीड येथील शांतीवन संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोजे हळवे होतात. ते समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् अर्थात शिक्षक दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 'विचारमंथन' व्याख्यानमालेचे नववे पुष्प 'वेगवेगळया सामाजिक आणि परिस्थितीमधील विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे अनुभव, सध्याची शिक्षण स्थिती आणि नागरिक घडविण्याच्या प्रवासातील शिक्षकांचे योगदान' या विषयावर मान्यवरांनी गुंफले. या परिसंवात वंचित, निराधार, बेघर लेकारांचे संगोपन शिक्षण यासाठी कार्य करणारे बीड येथील शांतीवन संस्थेचे संस्थापक नागरगोजे, ठाण्यातील सिग्नल शाळेच्या प्रकल्प्रमुख आरती परब, श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या उपप्राचार्या ग्लॅडिज कॉब्राल, बालहक्क, शिक्षण या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पत्रकार यामिनी सप्रे सहभागी झाले होते. या मान्यवरांची मुलाखत आकाशवाणीचे वृत्तनिवेदक राजेंद्र पाटणकर यांनी घेतली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांचा सत्कार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते ग्रंथबुके देवून करण्यात आला.

ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न समजून घेतला, ऊसतोडीसाठी मुलांना शिक्षण सोडावे लागते. ऊसतोड मजुरांच्या वेदना असंख्य आहेत, त्या जाणून घेतल्या. ऊसतोडीवर गेलेल्या बाईच्या आणि लेकरांच्या लैंगिक शेषणाच्या कित्येक घटना या दडपून टाकल्‌या जात असल्याचं लक्षात आले. अशा कित्येक घटनांना वाचा फोडण्याचे काम शांतिवनच्या माध्यमातून हाती घेतले. पंधरा वर्षाच्या आत आई होवून विधवा झालेल्या मुली एकटीने जगण्याचा संघर्ष करताना भेटल्या. परिस्थितीमुळे मुलीची जबाबदारी घ्यायला नको म्हणून जन्माला येण्याअगोदारच त्यांना खुडून टाकणाऱ्या हतबल माताही दिसल्या. मुन सुन्न करणारे भयाण वास्तव पाहिले असल्याचे  नागरगोजे यांनी नमूद केले. या शोषित कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारमध्ये बसलेल्यांनीही गांभिर्याने पाहिले नाही तर कितीतरी जबाबदार घटकांनी या प्रश्नाला सोईस्कररित्या बाजूला ठेवले असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली अर्थव्यवस्था ८० टक्के कृषीवर अवलंबून आहे, असे असताना गडचिरोलीपासून मुंबईपर्यत किंवा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यतच्या प्राथमिक शिक्षण विभागात कृषी हा विषय शिकवला जात नाही. शेती करा असे सांगतो आणि शेतीचे शिक्षण देत नाही. शेतीवर शिक्षण देणारी शिक्षणव्यवस्था नसल्याचे त्यांनी नमूद केली. यासाठी शांतीवनमध्ये जैन एरिगेशन यांच्या सहयोगाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शेती हा विषय शिकवतो, आज ही मुले चांगल्या पध्दतीने शेती करण्याचे शिक्षण घेतात. १५ वर्षापूर्वी आमचा हा प्रयोग शासनानेही स्वीकारली असून शासनानेही प्रगतीवर्ग सुरु केले असल्याचे दीपक नागरगोजे यांनी नमूद केले. मुलांवर संस्कार करणारे सर्वोत्तम साहित्य सानेगुरूजीचे असून ते मुलांना चांगल्या पध्दतीने समजते असे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेTeachers Dayशिक्षक दिन