शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण तीन वर्षांनंतर बोलू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 3:55 PM

दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे .

- धीरज परब 

मीरारोड - दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे . 

सिल्वासा येथे राहणारा मनीष हा २०१५ साली दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता . वडील देवूभाई  हे मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत असल्याने मनीष कडून सर्वाना अपेक्षा होत्या . पण दहावीत नापास झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मनीष ने एसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला .  त्यावेळी त्यावर तात्काळ उपचार झाल्यामुळे त्याचा जीव वाचला पण त्याची वाचा कायमची गेली होती व तो बोलू शकत नव्हता. 

 

सिलवासा  येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये आयोजित एका मोफत वैद्यकीय तपासणी दरम्यान वोक्हार्ट रुग्णालयाच्या कान  नाक व घशाच्या तज्ञ डॉ. नीपा वेलीमुट्टम यांची भेट झाली असता त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाची व्यथा सांगितली.  

 

डॉ निपा यांनी त्यांना मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला. वोक्हार्ट मध्ये आल्यावर मनीषच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यावर त्याच्यावर शल्यचिकित्सा करण्याचे ठरविले. " ऍसिडमुळे मनीषच्या  श्वासनलिकेला दुखापत झाली होती व ती अरुंद बनली होती त्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी  अडथळा येत होता.  सिलवासा येथील डॉक्टरांनी  ट्राचेओस्टोमी  करून श्वसनासाठी त्यांच्या मानेला एक छिद्र केले होते, या प्रक्रियेमुळे तो श्वास घेऊ शकत होता पण त्याला बोलण्यास अडथळा येत होता.  

याबाबत  वोक्हार्टचे कर्करोग तज्ञ  डॉ. कृथार्थ ठाकर व भूलतज्ञ  डॉ. विनिता संगई यांच्याशी वैद्यकीय सल्ला मसलत  करून मनीषच्या श्वासनलिकेवर  शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. या शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या श्वासनलिकेचा  खराब झालेला  भाग काढून तो पूर्ववत जोडण्यात आला.  त्यामुळे त्याच्या स्वर नलिकेला  ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो परत  बोलू लागला. 

अशा प्रकारची शल्यचिकीत्सा हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात कठीण शल्यचिकित्सा समजली जाते  व त्यासाठी आधुनिक वैद्यकिय तंत्रज्ञान  उपलब्ध असणे फार गरजेचे असते असे  डॉ. नीपा वेलीमुट्टम म्हणाल्या .   भारतामध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा बोलबाला असला तरीही त्यांची व्याप्ती तळागाळातील लोकांपर्यंत तितकी पोहचत नसल्याचे त्या म्हणाल्या . केंद्रशासनाच्या संजीवनी योजनेतून हि शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले .  

मनीषच्या समस्येचे निराकरण कदाचित २ वर्षांपूर्वीच झाले असते परंतु  सिलवासा येथे आधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या उपचारास विलंब लागला, परंतु आता मनीष बोलू शकतो याचा आम्हाला  आनंद आहे असे मत मनीषचे  वडील देवूभाई यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरnewsबातम्याscienceविज्ञान