शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

ठाण्यातील जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण, महानगरे खाडीमार्गे जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 5:43 AM

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात असून पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर आता...

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात असून पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर आता दुस-या टप्प्यात ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. तसेच या खाडीलगतच्या अभयारण्यातील वन्यजीवांवर जलवाहतूक प्रकल्पामुळे काही परिणाम होऊ शकतो का, याचा अभ्यास लवकरच सुरू करण्यात येणार असून त्याचबरोबर वसई तेमीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली भागातील खाडीतून दगड आणि गाळ काढल्यानंतर त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होऊ शकतो का, याचाही सविस्तर अभ्यास केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.ठाणे शहरासाठी जलवाहतूक प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार असल्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यानुसार ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली शहरांवरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर गेल्या काही वर्षांत भार वाढला असून तो कमी करण्यासाठी या शहरांना जोडणाºया खाडीमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला होता. पहिल्या टप्प्यात ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.अहवालास डिसेंबर महिना उजाडणारया प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीमध्ये नुकतीच एक बैठक घेतली होती. त्यामध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी येत्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले होते. या जलमार्गासाठी एकूण ६४५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मीरा-भार्इंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या चार ठिकाणी जेटी बांधणे, रिव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम विकसित करणे, तीन वर्षे बोटींची दुरुस्ती, निगा व देखभाल अशी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या ८६ कोटी रु पयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. याच बैठकीमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडण्यासाठी खाडीमध्ये जलवाहतूक प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिका प्रशासनाने तो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत हा अहवाल तयार करण्याचा प्रशासनाचा मानसअसला, तरी हे काम पूर्णहोण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा अवधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.खाडीत याची केली तपासणीखाडीमार्गात खडक आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. कोणत्या भागात दगड आणि मातीचा गाळ काढावा लागेल, याचाही अभ्यास करण्यात आला होता. तसेच खाडीच्या तळाशी असलेले खडक, माती आणि गाळ याचेही परीक्षण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या मार्गाची तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.दुसरा टप्पा ९० किमीचा : ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या पहिल्या टप्प्यात ५० किमी लांबीचा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविला जाणार आहे. तर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या दुसºया टप्प्यात ९० किमी लांबीचा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील जलमार्गाची आठ महिन्यांपूर्वी चाचपणी करण्यात आली होती.

टॅग्स :thaneठाणे