शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Tauktae Cyclone: चक्रीवादळाशी झुंज देत ‘न्यू हेल्प मेरी’ किनाऱ्यावर; ५ खलाशी सुखरूप बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 08:26 IST

चक्रीवादळाच्या इशाऱ्याने रविवारपर्यंत उत्तन, पाली व चौक येथील सर्वच मच्छीमार बोटी परतल्या.

मीरा रोड : तौक्ते चक्रीवादळाच्या गर्तेत अडकलेली भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छिमार बोट मंगळवारी रात्री सुखरूप परतली. नाखवा जस्टिन डायमंड मिरांडा यांनी वादळावर मात करून तीन दिवसभर समुद्रात वादळाशी संघर्ष करत स्वतःसह पाच खलाशी यांचे जीव वाचवत बोटीने किनारा गाठला.

चक्रीवादळाच्या इशाऱ्याने रविवारपर्यंत उत्तन, पाली व चौक येथील सर्वच मच्छीमार बोटी परतल्या. पण, मिरांडा यांची बोट वादळात अडकली. बोटीवर त्यांचा मुलगा जस्टिन हा नाखवा व अन्य ५ खलाशी होते. रविवारी बोट ओएनजीसीच्या वापरात नसलेल्या इंधन विहिरीच्या रिंगजवळ होती. त्यावेळी त्यांना तेथेच थांबा किंवा डहाणूचा समुद्रकिनारा जवळ असल्याने तेथे आश्रयाला जा अशा सूचना होत्या. परंतु, जस्टिन हा बोटीसह भाईंदर किनारी येण्यास निघाला. परंतु सोमवारी बोट वादळात ओढली जाऊ लागली. वायरलेसवरून तो सतत कुटुंबीयांशी संपर्कात होता.

तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर बचावासाठी गेले खरे; पण प्रचंड वाऱ्यामुळे ते माघारी फिरले. वादळाने खवळलेल्या समुद्रात बोट टिकवून ठेवण्यासाठी तीन नांगर तुटले. शेवटी अन्य दोरखंड एकत्र करून त्याचा वापर केला. बोटीचे स्टिअरिंग बिघडल्याने जस्टिनने खवळलेल्या समुद्रात जाऊन बोटीची दुरुस्ती केली. माझ्या मुलाने वादळावर मात करून स्वतःसह पाच खलाशी आणि बोटीला परत घेऊन आला ही अभिमानाची गोष्ट आहे, असे डायमंड मिरांडा यांनी सांगितले.

नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरला इमर्जन्सी लँडिंग

तौक्ते चक्रीवादळामुळे मंगळवारीही वारा व पाऊस जोरात असताना नौदलाचे एक टेहळणी करणारे हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यांमुळे वैमानिकास भाईंदरच्या पाली येथील जेटीवर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर उतरल्याचे कळताच मच्छीमारांनी ते पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली होती. जवळपास २० मिनिटे थांबलेले हेलिकॉप्टरनंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामांची पाहणी करण्यासाठी ते फिरत होते; परंतु वादळामुळे वातावरण ढगाळ होऊन जोरदार वारा, पाऊस असल्याने वैमानिकाने ते जेटीवर उतरवल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ