शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

तानसा धरण भरले; तर मोडकसागर भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:15 IST

जिल्ह्यात सरासरी १४६ मिमी पाऊस : ३३ गावांना सतर्कतेचा इशारा, बारवीची स्थितीही सुधारली

ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तानसा धरण भरल्याने तानसासह वैतरणा नदीकाठावरील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांच्या कालावधीत एक हजार २७.९८ मिमी पाऊस पडला असून जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी नोंद १४६.८५ मिमी इतकी केली आहे.

तानसासह वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण भरण्याच्या स्थितीत असल्यामुळे या दोन्ही नदीकाठांवरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा १० दिवसांपूर्वीच दिला होता. यानुसार, तानसा धरण गुरुवारी दुपारी २.३० वाजता भरून वाहू लागले. तानसा धरणाची गुरुवारी ४२१.९६ फूट पाण्याची पातळी होताच ते भरून वाहू लागले आहे.

मोडकसागर धरणाची ५२९.८५ फूट पाण्याची पातळी आहे. भातसा धरणात सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी तयार झाली आहे. तर, ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणीसाठा तयार आहे. तर, वाढीव पाणीसाठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये अन्यही धरणे भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.

तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठामुंबई - तानसा तलाव भरुन वाहू लागल्याने पाण्याच्या चिंतेत असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही तलावात ४० टक्के जलसाठा कमी आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी पाऊस उशिरा आला, त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली. आजच्या घडीला तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठा आहे. तर याच काळात गेल्या दोन वर्षांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक जलसाठा होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईला दररोज तीन हजार ३८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा जमा झाल्यानंतर मुंबईत गेली वर्षभर सुरू असलेली दहा टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी तुळशी तलाव भरून वाहिला होता. मात्र या तलावातून केवळ १८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज होत असतो. तानसा तलावातून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

भिवंडीत सर्वाधिक पाऊसजिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २०० मिमी, तर याखालोखाल उल्हासनगरमध्ये १७५, कल्याणला १५३, अंबरनाथला १५२.६०, शहापूरला १५० आणि ठाणे येथे १११ मिमी पाऊस पडला. सर्वात कमी मुरबाड तालुक्यात अवघा ८६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस