शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

तानसा धरण भरले; तर मोडकसागर भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:15 IST

जिल्ह्यात सरासरी १४६ मिमी पाऊस : ३३ गावांना सतर्कतेचा इशारा, बारवीची स्थितीही सुधारली

ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तानसा धरण भरल्याने तानसासह वैतरणा नदीकाठावरील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांच्या कालावधीत एक हजार २७.९८ मिमी पाऊस पडला असून जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी नोंद १४६.८५ मिमी इतकी केली आहे.

तानसासह वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण भरण्याच्या स्थितीत असल्यामुळे या दोन्ही नदीकाठांवरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा १० दिवसांपूर्वीच दिला होता. यानुसार, तानसा धरण गुरुवारी दुपारी २.३० वाजता भरून वाहू लागले. तानसा धरणाची गुरुवारी ४२१.९६ फूट पाण्याची पातळी होताच ते भरून वाहू लागले आहे.

मोडकसागर धरणाची ५२९.८५ फूट पाण्याची पातळी आहे. भातसा धरणात सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी तयार झाली आहे. तर, ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणीसाठा तयार आहे. तर, वाढीव पाणीसाठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये अन्यही धरणे भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.

तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठामुंबई - तानसा तलाव भरुन वाहू लागल्याने पाण्याच्या चिंतेत असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही तलावात ४० टक्के जलसाठा कमी आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी पाऊस उशिरा आला, त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली. आजच्या घडीला तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठा आहे. तर याच काळात गेल्या दोन वर्षांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक जलसाठा होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईला दररोज तीन हजार ३८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा जमा झाल्यानंतर मुंबईत गेली वर्षभर सुरू असलेली दहा टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी तुळशी तलाव भरून वाहिला होता. मात्र या तलावातून केवळ १८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज होत असतो. तानसा तलावातून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

भिवंडीत सर्वाधिक पाऊसजिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २०० मिमी, तर याखालोखाल उल्हासनगरमध्ये १७५, कल्याणला १५३, अंबरनाथला १५२.६०, शहापूरला १५० आणि ठाणे येथे १११ मिमी पाऊस पडला. सर्वात कमी मुरबाड तालुक्यात अवघा ८६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस