शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

तानसा धरण भरले; तर मोडकसागर भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:15 IST

जिल्ह्यात सरासरी १४६ मिमी पाऊस : ३३ गावांना सतर्कतेचा इशारा, बारवीची स्थितीही सुधारली

ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तानसा धरण भरल्याने तानसासह वैतरणा नदीकाठावरील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांच्या कालावधीत एक हजार २७.९८ मिमी पाऊस पडला असून जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी नोंद १४६.८५ मिमी इतकी केली आहे.

तानसासह वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण भरण्याच्या स्थितीत असल्यामुळे या दोन्ही नदीकाठांवरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा १० दिवसांपूर्वीच दिला होता. यानुसार, तानसा धरण गुरुवारी दुपारी २.३० वाजता भरून वाहू लागले. तानसा धरणाची गुरुवारी ४२१.९६ फूट पाण्याची पातळी होताच ते भरून वाहू लागले आहे.

मोडकसागर धरणाची ५२९.८५ फूट पाण्याची पातळी आहे. भातसा धरणात सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी तयार झाली आहे. तर, ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणीसाठा तयार आहे. तर, वाढीव पाणीसाठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये अन्यही धरणे भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.

तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठामुंबई - तानसा तलाव भरुन वाहू लागल्याने पाण्याच्या चिंतेत असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही तलावात ४० टक्के जलसाठा कमी आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी पाऊस उशिरा आला, त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली. आजच्या घडीला तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठा आहे. तर याच काळात गेल्या दोन वर्षांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक जलसाठा होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईला दररोज तीन हजार ३८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा जमा झाल्यानंतर मुंबईत गेली वर्षभर सुरू असलेली दहा टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी तुळशी तलाव भरून वाहिला होता. मात्र या तलावातून केवळ १८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज होत असतो. तानसा तलावातून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

भिवंडीत सर्वाधिक पाऊसजिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २०० मिमी, तर याखालोखाल उल्हासनगरमध्ये १७५, कल्याणला १५३, अंबरनाथला १५२.६०, शहापूरला १५० आणि ठाणे येथे १११ मिमी पाऊस पडला. सर्वात कमी मुरबाड तालुक्यात अवघा ८६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस