शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा; महापौरांचे विरोधकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 15:34 IST

मीरा-भार्इंदर शहरांर्गत नियोजित मेट्रो मार्गाच्या ९ स्थानकांना नावे सुचविण्याचे आवाहन महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना आवाहन केले असुन त्यावर आजच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

राजू काळे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरांर्गत नियोजित मेट्रो मार्गाच्या ९ स्थानकांना नावे सुचविण्याचे आवाहन महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना आवाहन केले असुन त्यावर आजच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

शहरातील नियोजित मेट्रो मार्ग दहिसर चेकनाका येथुन विस्तारीत करण्यात आला असुन त्यासाठी ९ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. मात्र त्यांची नावे अद्याप निश्चित झालेली नसल्याने त्यांना सर्वानुमते मान्य ठरणारी नावेच देण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. या नियोजित ९ मेट्रो स्थानकांत राष्ट्रीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वरील दहिसर चेकनाका परिसरातील पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल परिसरात दोन स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. भार्इंदर पुर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावर ५ स्थानके निश्चित करण्यात आली असुन त्यात काशिमिरा वाहतुक बेटालगतच्या झंकार कंपनी, मीरारोड येथील साईबाबा नगर, दिपक हॉस्पिटल, गोल्डन नेस्ट या छेदमार्गावरील क्रिडा संकुल व इंद्रलोक या परिसरांचा समावेश आहे. भार्इंदर पश्चिमेकडे २ स्थानके प्रस्तावित करण्यात आली असुन त्यात मॅक्सस मॉल व नेताजी सुभाषचंद्र मैदान परिसरांचा समावेश आहे. सुरुवातीला नियोजित मेट्रो मार्ग काशिमिरा वाहतुक बेटाहुन छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर प्रस्तावित करण्यात आला होता. तो तत्कालिन महासभेच्या मान्यतेनंतर भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान व पुर्वेकडील इंद्रलोकपर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. या नियोजित मेट्रो मार्गाच्या पाहणीकरीता एमएमआरडीए आयुक्त यु. पी. एस. मदान व अतिरीक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या शिष्टमंडळाने फेब्रुवारी २०१७ मध्ये शहराला भेट देत मेट्रोच्या कारशेडसह स्थानकांच्या जागांची पाहणी केली होती. त्यात ९ मेट्रो स्थानकांच्या जागा निश्चित करण्यात आल्या असुन त्याचा रितसर ठराव महासभेत मंजुर करुन पाठविण्याची सुचना पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना एमएमआरडीएने पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार महापौरांनी शिवसेना व काँग्रेस सदस्यांनीही त्या स्थानकांना नावे सुचवावी, असे आवाहन केले असुन त्यावर चर्चा करुनच सर्वानुमते नियोजित स्थानकांना नावे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 तत्पुर्वी भाजपाचे सभागृह नेता रोहिदास पाटील यांनी नियोजित मेट्रो स्थानकांना शहरातील प्रमुख गावांची नावे देण्याची मागणी महापौर व आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यात त्यांनी १९८५ मध्ये १) भार्इंदर पुर्व (नवघर, गोडदेव, खारी व बंदरवाडी) २) भार्इंदर पश्चिम (राई, मोर्वा व मुर्धा) ३) काशी व मीरा

४) घोडबंदर या चार ग्रुप ग्रामपंचायत समावेशाने नगरपरिषदेची स्थापना झाल्याचे सांगुन १९९० मध्ये चेना, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतीचा समावेशाने नगरपालिकेची स्थापना झाल्याचे म्हटले आहे. यानंतर २८ फेब्रूवारी २००२ रोजी महापालिकेची स्थापना झाली असली तरी शहराचे गावपण राखण्यासाठी त्यांनी पांडुरंगवाडी, अमर पॅलेस, झंकार कंपनी, दिपक हॉस्पिटल, इंद्रलोक, क्रिडा संकुल, इंद्रलोक व मॅक्सस मॉल या परिसरातील मेट्रो स्थानकांना अनुक्रमे पेणकरपाडा, मीरागाव, काशीगाव, शिवार गार्डन, नवघरगाव, स्वातंत्र्यवीर सावरकर, शहिद भगतसिंग अशी नावे स्थानकांना देण्याची सुचना केली असुन उर्वरीत साईबाबा नगर व नेताजी सुभाषचंद्र बोस हि नावे कायम ठेवण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक