शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर मीरा रोड येथे यशस्वी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 19:50 IST

सुदान या देशाची नागरिक असलेली विडात  या  ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला.

मीरा रोड - दुर्मिळ असलेल्या "स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर"  या स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लागण झाल्याचे निदान करत एका 62 वर्षीय आफ्रिकन महिलेवर मीरा रोडच्या एका रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली . 

सुदान या देशाची नागरिक असलेली विडात  या  ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. मीरा रोड येथील एका रुग्णालयात भरती झाल्यावर तिच्या आधुनिक पद्धतीने वैद्यकीय चाचण्या केल्या असता तिच्या स्वादुपिंडाच्या टोकावर कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले . आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. स्वादुपिंडालाही कर्करोगाची बाधा झाल्यावर त्यावर तातडीने उपचार करणे फार गरजेचे आहे.

पोट व आतड्यांचे शल्य विशारद डॉ. इमरान शेख म्हणाले , "गेल्या दोन वर्षांपासून या महिलेला काविळीमुळे त्रास होत होता ही कावीळ कमी करण्यासाठी यकृतामध्ये स्टेण्टचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या महिलेची मेडिकल हिस्टरी समजून घेतल्यावर तसेच सीटी स्कॅन केल्यावर "स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर" हा दुर्मिळ कर्करोग झाल्याचे समजले .  हा फार दुर्मिळ प्रकारचा स्वादुपिंडाचा कर्करोग आहे. 

कॅन्सरचे निदान झाल्यावर आम्ही स्वादुपिंडाचा पुढील भाग, छोट्या आतड्याचा काही भाग, बाईल डक्ट (यकृताशी संबंधित भाग ) गॉल ब्लॅडर हे अवयव काढून आम्ही  स्वादुपिंड आणि पित्तनलिका लहान आतडी संबंधित जटिल पुनर्रचना केली असून तिच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. अशा प्रकारची शल्यचिकित्सा वैद्यकीय क्षेत्रात फार कौशल्याची समजली जाते. या शल्यचिकित्सेत ब्लड ट्रांसफ्युजनची गरज भासली नसून आम्ही छोट्या आतडीची यशस्वीरीत्या पुनर्रचना केली आहे." 

स्वादुपिंडाचा कर्करोग कमी जणांना होत असला तरी झाल्यावर तो उशिरा लक्षात येतो. निदान होईपर्यंत तो पसरलेला असतो. याची शस्त्रक्रिया ही गंभीर व धोक्याची असते. यामुळेच रुग्णाचे आयुष्य सीमित असते. बऱ्याचदा कावीळ झाल्यानंतर रुग्ण इतर उपाय करतात व डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. परंतु एक-दोन आठवडय़ांत कावीळ उतरली नाही तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते  असे डॉ . शेख म्हणाले . तंम्बाखू, मद्यपान,वाढते वजन, आनुवंशिकता, डायबेटीस, जीवनशैलीतील घातक बदल ही कारणे  स्वादुपिंडातील कर्करोगास कारणीभूत ठरतात. 

 

टॅग्स :cancerकर्करोगMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक