शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर मीरा रोड येथे यशस्वी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 19:50 IST

सुदान या देशाची नागरिक असलेली विडात  या  ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला.

मीरा रोड - दुर्मिळ असलेल्या "स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर"  या स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लागण झाल्याचे निदान करत एका 62 वर्षीय आफ्रिकन महिलेवर मीरा रोडच्या एका रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली . 

सुदान या देशाची नागरिक असलेली विडात  या  ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. मीरा रोड येथील एका रुग्णालयात भरती झाल्यावर तिच्या आधुनिक पद्धतीने वैद्यकीय चाचण्या केल्या असता तिच्या स्वादुपिंडाच्या टोकावर कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले . आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. स्वादुपिंडालाही कर्करोगाची बाधा झाल्यावर त्यावर तातडीने उपचार करणे फार गरजेचे आहे.

पोट व आतड्यांचे शल्य विशारद डॉ. इमरान शेख म्हणाले , "गेल्या दोन वर्षांपासून या महिलेला काविळीमुळे त्रास होत होता ही कावीळ कमी करण्यासाठी यकृतामध्ये स्टेण्टचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या महिलेची मेडिकल हिस्टरी समजून घेतल्यावर तसेच सीटी स्कॅन केल्यावर "स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर" हा दुर्मिळ कर्करोग झाल्याचे समजले .  हा फार दुर्मिळ प्रकारचा स्वादुपिंडाचा कर्करोग आहे. 

कॅन्सरचे निदान झाल्यावर आम्ही स्वादुपिंडाचा पुढील भाग, छोट्या आतड्याचा काही भाग, बाईल डक्ट (यकृताशी संबंधित भाग ) गॉल ब्लॅडर हे अवयव काढून आम्ही  स्वादुपिंड आणि पित्तनलिका लहान आतडी संबंधित जटिल पुनर्रचना केली असून तिच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. अशा प्रकारची शल्यचिकित्सा वैद्यकीय क्षेत्रात फार कौशल्याची समजली जाते. या शल्यचिकित्सेत ब्लड ट्रांसफ्युजनची गरज भासली नसून आम्ही छोट्या आतडीची यशस्वीरीत्या पुनर्रचना केली आहे." 

स्वादुपिंडाचा कर्करोग कमी जणांना होत असला तरी झाल्यावर तो उशिरा लक्षात येतो. निदान होईपर्यंत तो पसरलेला असतो. याची शस्त्रक्रिया ही गंभीर व धोक्याची असते. यामुळेच रुग्णाचे आयुष्य सीमित असते. बऱ्याचदा कावीळ झाल्यानंतर रुग्ण इतर उपाय करतात व डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. परंतु एक-दोन आठवडय़ांत कावीळ उतरली नाही तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते  असे डॉ . शेख म्हणाले . तंम्बाखू, मद्यपान,वाढते वजन, आनुवंशिकता, डायबेटीस, जीवनशैलीतील घातक बदल ही कारणे  स्वादुपिंडातील कर्करोगास कारणीभूत ठरतात. 

 

टॅग्स :cancerकर्करोगMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक