शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर मीरा रोड येथे यशस्वी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 19:50 IST

सुदान या देशाची नागरिक असलेली विडात  या  ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला.

मीरा रोड - दुर्मिळ असलेल्या "स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर"  या स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लागण झाल्याचे निदान करत एका 62 वर्षीय आफ्रिकन महिलेवर मीरा रोडच्या एका रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली . 

सुदान या देशाची नागरिक असलेली विडात  या  ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. मीरा रोड येथील एका रुग्णालयात भरती झाल्यावर तिच्या आधुनिक पद्धतीने वैद्यकीय चाचण्या केल्या असता तिच्या स्वादुपिंडाच्या टोकावर कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले . आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. स्वादुपिंडालाही कर्करोगाची बाधा झाल्यावर त्यावर तातडीने उपचार करणे फार गरजेचे आहे.

पोट व आतड्यांचे शल्य विशारद डॉ. इमरान शेख म्हणाले , "गेल्या दोन वर्षांपासून या महिलेला काविळीमुळे त्रास होत होता ही कावीळ कमी करण्यासाठी यकृतामध्ये स्टेण्टचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या महिलेची मेडिकल हिस्टरी समजून घेतल्यावर तसेच सीटी स्कॅन केल्यावर "स्लेडोझिंग एडेनोकैरिनोमा ऑफ सिर" हा दुर्मिळ कर्करोग झाल्याचे समजले .  हा फार दुर्मिळ प्रकारचा स्वादुपिंडाचा कर्करोग आहे. 

कॅन्सरचे निदान झाल्यावर आम्ही स्वादुपिंडाचा पुढील भाग, छोट्या आतड्याचा काही भाग, बाईल डक्ट (यकृताशी संबंधित भाग ) गॉल ब्लॅडर हे अवयव काढून आम्ही  स्वादुपिंड आणि पित्तनलिका लहान आतडी संबंधित जटिल पुनर्रचना केली असून तिच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. अशा प्रकारची शल्यचिकित्सा वैद्यकीय क्षेत्रात फार कौशल्याची समजली जाते. या शल्यचिकित्सेत ब्लड ट्रांसफ्युजनची गरज भासली नसून आम्ही छोट्या आतडीची यशस्वीरीत्या पुनर्रचना केली आहे." 

स्वादुपिंडाचा कर्करोग कमी जणांना होत असला तरी झाल्यावर तो उशिरा लक्षात येतो. निदान होईपर्यंत तो पसरलेला असतो. याची शस्त्रक्रिया ही गंभीर व धोक्याची असते. यामुळेच रुग्णाचे आयुष्य सीमित असते. बऱ्याचदा कावीळ झाल्यानंतर रुग्ण इतर उपाय करतात व डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. परंतु एक-दोन आठवडय़ांत कावीळ उतरली नाही तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते  असे डॉ . शेख म्हणाले . तंम्बाखू, मद्यपान,वाढते वजन, आनुवंशिकता, डायबेटीस, जीवनशैलीतील घातक बदल ही कारणे  स्वादुपिंडातील कर्करोगास कारणीभूत ठरतात. 

 

टॅग्स :cancerकर्करोगMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक