शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

मीरा भाईंदरमध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई होणार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा खरमरीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 17:00 IST

Jitendra Awhad News: मीरा भाईंदर मध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई केली जाईल . त्यासाठी कागदपत्रे गोळा होत आहेत . शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई केली जाईल . त्यासाठी कागदपत्रे गोळा होत आहेत . शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे आमदार गणेश नाईक, माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव घेऊन तर काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचे नाव न घेता जोरदार टीका केली . 

मीरारोडच्या नया नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍड. सना देशमुख यांच्या कार्यालयासह अन्य कार्यालयांच्या उदघाटना साठी आव्हाड रविवारी सायंकाळी आले होते . यावेळी जाहीर सभेत आव्हाड म्हणाले कि , मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती . त्यावेळी गणेश नाईक बघायचे कि, माझा शहरात प्रवेश नको . नाईकांच्या ध्रुवकिशोर पाटील व प्रकाश दुबोले यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हाच आपण पक्षाच्या नेत्यांना सावध केले होते कि हे नाईक यांच्या शिवाय होऊ शकत नाही . ते ऐकले नाही आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले . 

शहरात महापौर, आयुक्त , स्थायी समिती सभापती यांचे नाही तर नरेंद्र मेहतांचीच चालते . अमेरिकेत ९११ आणि मीरा भाईंदरमध्ये मेहतांची ७११ आहे .  कांदळवन, दलदल बाजूला ठेऊन फाईव्ह स्टार क्लबची परवानगी कोणत्या कायद्या खाली दिली ते आज पर्यत कळले नाही . विधानसभेत पहिल्यांदा मी विषय काढला होता. 

ह्याचे जे काळे धंदे आहेत ते बंद करण्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे . सरकारची चौकशी सुरु आहे आणि लवकरच कळेल काय कारवाई होईल ती. शहरातील लुटमारीवर कठोर कारवाई होणार , त्याची कागदपत्रे जमा होत आहेत . मनपा मुख्यालयाच्या आड  ५०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करून त्यावर पांघरून घालायचे होते .  त्यावेळी जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी गडबडीची माहिती दिली . 

७ वर्षात मेहता ला जे पाहिजे होते तसे त्यांनी केले . एका सोसायटीची जागा सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला . रहिवाशी माझ्या कडे आल्या नंतर कायदेशीर लढाई लढली.  तुमच्या समोर तुमचे रस्ते, पाणी विकले जातेय, अनधिकृत इमारती व झोपड्या बांधून विकल्या जात आहेत. लोकांनी परिवर्तन आणले पाहिजे . आज ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी हा पर्याय आहे असे आव्हाड म्हणाले . 

मेहतानी शहराचे मालक बनून जे नुकसान केले आहे त्याच्या विरुद्ध बोलले पाहिजे. मेहताला हटवण्यासाठी महाविकास आघाडी बनली पाहिजे. महाविकास आघाडी बनली तर भाजपला पराभवाची धूळ चारू. एकीकडे मेहता तर दुसरीकडे सुलतान ए नया नगर अशी टीका आव्हाड यांनी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचे नाव न घेता केली . ह्या दोघांची सल्तनत खालसा करायची आहे . 

नेताजी बसले आहेत आणि शिपाई नगरसेवकांना सांगतो कि , नेत्यास भेटायचे कि नाही . लाईन लावायची पध्द्त बंद करा . जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे तिकडे होते, ऐनवेळी आम्हाला सोडून गेले . तिकडे चिठ्ठी देऊन कंटाळले  आणि परत आले असा चिंता आव्हाड यांनी हुसेन सह मालुसरेना काढला . 

नया नगर मधील सर्व १२ जागा सर्वांचे बारा वाजवून मिळवा असे सांगतानाच आपण काँग्रेस व शिवसेना विरुद्ध बोललो नाही , पण नेत्याच्या विरुद्ध बोललो. शहरात पाणी , रस्ते , झोडपडपट्टी , जुन्या इमारती आदींच्या समस्या गंभीर आहेत . एसआरए, क्लस्टर , म्हाडा साथीच्या योजनाना मंजुरी देऊ . २००९ चे मुंब्रा आणि आताचे मुंब्रा बघा - चेहरा मोहरा बदलला आहे. जात - धर्म बाजूला ठेऊन विकास करा , पक्ष पाहू नका असे आमचे नेते सांगतात . येणाऱ्यांचे दुःख दूर करण्याचे , अश्रू पुसण्याचे काम करा. 

निवडणुकीत पराभवाच्या भीतीने शेतकरी विरोधी कायदे रद्द  उत्तर प्रदेश , पंजाब राज्यातील निवडणुकीत मोठा पराभव होईल व पुढे देशात सुद्धा पराभव होईल म्हणून शेतकरी विरोधी ३ कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परत घेतले . त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा अजिबात नाही . कारण शेतकऱ्यांच्या लढ्याला नक्षली  पासून अतिरेकी पर्यंत हिणवले गेले . परदेशातून पैसे येतो सांगितले . परंतु शेतकऱ्यांनी देशाच्या हिताचा विचार करून ३६० दिवसांचा लढा दिला . यात ७०० शेतकरी शहिद झाले . जालियनवाला बाग मध्ये जशा गोळ्या घातल्या त्याच प्रकारे मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांवर अश्रूधूर , पाण्याचा मारा केला . मंत्र्याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडले असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला . 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMira Bhayanderमीरा-भाईंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेस