शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ, बदलापूरमध्येही एसआरए योजना लागू , सरकारची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 02:12 IST

मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क्षेत्रांत राहण्यासाठी ओढ असते.

अंबरनाथ - मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रांत झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अंबरनाथ, बदलापूर या पालिकांमधील वाढती झोपडपट्टी पाहता येथे ही योजना लागू झाल्याने येथील झोपडीवासीयांनाही चांगले जीवन जगता येईल, असा विश्वास आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला.मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क्षेत्रांत राहण्यासाठी ओढ असते. त्यामुळे या नगरपालिका क्षेत्रांमध्येही झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरांतील सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे या क्षेत्रांत एसआरए योजना लागू व्हावी, यासाठी किणीकर यांनी पाठपुरावा केला होता. बीएसयूपी योजना अपयशी ठरल्यानंतर केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेलाही नगरपालिका क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने एसआरएची गरज होती.शहराचा सुनियोजित विकास साधण्यासाठी झोपडपट्टीचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने एसआरए योजना अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.- डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर