शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम काही मंडळी करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 16:08 IST

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे  : ठाणे  जिल्ह्यात तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे ९९ टक्के आघाडीत लढतील असा विश्वास राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. परंतु दोनही पक्षातील काही विघ्न संतुष्ट मंडळी या दुधात मीठाचा खडा टाकण्याचे काम करीत असल्याचेहा गोप्यस्फोटही त्यांनी केला. परंतु आपला वैचारीक शत्रु हा भाजप असल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी आपल्याला दोन पावले मागे आले तरी चालणार आहे. परंतु आघाडी ही करावीच लागणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे सुतोवाच केले. आगामी निवडणुकीसाठी आपल्याकडे आता फक्त 90 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यानुसार आता आळस झटकून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

प्रत्येकाच्या घराघरात पोहचले पाहिजे, बुथ लेव्हलची रचना, वॉर्ड रचना आदींची कामे वेगाने करुन भाजपने नोटबंदी, जीएसटी आणि इतर कोण कोणत्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याची माहिती ही प्रत्येकाला देण्याचे काम कार्यकत्र्याने करायला हवे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिली. राज्यात देखील महाविकास आघाडीचे काम हे योग्य पध्दतीने सुरु असून शरद पवार यांच्या नंतर राज्यासाठी काम करणारा कोण नेता असेल तर ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे असल्याचेही सांगत मुख्यमंत्र्यांचे त्यांनी पुन्हा कौतुक केले.

एका कुटुंब प्रमुखाप्रमाणो ते काम करीत आहेत. येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी होईल असे मला नक्की वाटत आहे, कदाचित एकनाथ शिंदे यांना देखील तसेच वाटत आहे. त्यामुळे आमच्यात काही गोष्टींवरुन वाद जरी होत असले तरी ते काही वेळेस पाण्यावरुन, कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून होत आहेत. मात्र ते तेवढय़ापुर्ती असल्याने आघाडी ही निश्चित होईल असे सुतोवाच त्यांनी पुन्हा केले.

संजय राऊतांनी माणसुकीचे दर्शन घडविले-

शरद पवार यांच्यासाठी संजय राऊतांनी खुर्ची उचलून दिली. यावरुन भाजपची मंडळी टिका करीत आहेत. परंतु एका वडलीधा:या माणसाला राऊतांनी केलेली मदत म्हणजेच त्यांनी यातून एकप्रकारे यातून माणसुकीचे दर्शन घडविले आहे. मात्र भाजपमध्ये तर लालकृष्ण अडवाणी यांना उभे राहण्यासाठी देखील जागा दिली जात नाही, ही त्यांच्या संस्कृती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.  सोशल मिडीयावर सक्रीय राहून निवडणुक जिंकता येत नाही

यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याचे देखील यावेळी आव्हाड यांनी कान टोचले. फेसबुक, ट्विटरवर सक्रीय राहून निवडणुक जिंकता येत नसल्याचे सांगत, मतदार नोंदणी, घराघरात जाऊन पक्षाचा अंजेडा रुजवा, आपण नगरसेवक नाही, म्हणून वॉर्डातील कामे करणो टाळू नका, लोकांची कामे करा, आता निवडणुकीत पडलो म्हणून पुढील पाच वर्ष कामच करायचे नाही, असे चालणार नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

ओबीसी आरक्षण कोण रोखतय..

जे कोण कोर्टात जात आहेत, ते सर्वाना माहित आहे. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढा सुरु ठेवला आहे आणि तो सुरच ठेवणार आहे. शिक्षणात, नोकरीत, निवडणुकीत आरक्षण मिळत असेल, तर का काढत आहेत, समता आणि समानता ही शवेटी राजकीय असली पाहिजे ही भावना निती मंडळाने व्यक्त केली आहे. त्याची अंमलबजावणी शरद पवार यांनी राज्यात केली. मात्र येथील सर्वसामान्य शोषीत माणसाला राजकीय अधिकार मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना