शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

...म्हणून जुनी ब्रिटिशकालीन मोठी विहीरच बुझवायला घेतली; मीरा-भाईंदर महापालिकेचा नवा प्रताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 12:21 IST

तर काही फुटांवरच ब्रिटिशकालीन जुन्या विहिरी लगतचा रस्ता खचला. तर सदर दोन्ही ठिकाणी खचलेल्या भागावर महापालिकेने गेल्या पावसाळ्यापासून दुरुस्ती कामच हाती घेतले नाही. 

मीरा रोड - गेल्या पावसाळ्यात उत्तन-डोंगरी येथे खचलेला रस्ता दुरुस्त करायची उपरती आता झालेल्या मीरा-भाईंदर महापालिकेने संरक्षण भिंत बांधण्यासाठी चक्क ब्रिटिशकालीन जुनी मोठी विहीरच बेकायदा माती भराव करून बुझवायला घेतल्याने कारवाईची मागणी स्थानिकांसह वनशक्ती संस्थेने केली आहे. भाईंदरच्या डोंगरी -  उत्तन ह्या मुख्य रस्त्यावर लहान व अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. गेल्या पावसाळ्यात आनंद नगर येथे तलावाची संरक्षण भिंत खचली. जेणेकरून रस्ता काहीसा खचला. तर काही फुटांवरच ब्रिटिशकालीन जुन्या विहिरी लगतचा रस्ता खचला. तर सदर दोन्ही ठिकाणी खचलेल्या भागावर महापालिकेने गेल्या पावसाळ्यापासून दुरुस्ती कामच हाती घेतले नाही. 

येथे वाहन चालकांना इशारा मिळेल, अश्या आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. येथील रस्त्यात बसवलेल्या लोखंडी सुरक्षा खांबामुळे रात्रीच्या काळोखात अपघात होऊ लागले. तर पालिकेने समोरच्या बाजूने रस्ता वाढवण्याकडेसुद्धा डोळेझाक केली. जेणेकरून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर यामुळे टीकेची झोड उठली. 

त्यातच आता पावसाळा तोंडावर आल्यावर पालिकेला जाग आली आणि विहिरीकडील रस्त्याची दुरुस्ती संरक्षक भिंत बांधून करण्याऐवजी महापालिकेच्या महाभागांनी खचलेल्या ठिकाणची सुस्थितीत असलेली ब्रिटिशकालीन विहीरच भराव टाकून बंद करण्याचा प्रकार सुरू केला. पालिकेच्या या अजब कारभारावर टीकेची झोड वेलेरिन पांडरीक, शॉन कोलासो आदींनी उठवली व संताप व्यक्त केला.  पालिकेने संरक्षक भिंत बांधण्याऐवजी जुनी विहीरच बुझवण्याचा केलेला प्रकार म्हणजे एखाद्या डायबेटिक रुग्णास पायच्या बोटाला गँगरिन झाल्यामुळे त्या रुग्णाचा संपूर्ण पायच काढून टाकणे, असा उफराटा असल्याची टीका कोळसे यांनी केली आहे. त्यांच्यासह वनशक्तीचे संचालक स्टॅलिन यांनी देखील  विहिरीतील भराव काढून सबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि विहिरी पूर्ववत करून संरक्षण भिंत रस्त्यासाठी बांधून घ्यावी अशी मागणी केली आहे. पालिकेचे अधिकारी मात्र विहिरीचा भाग पडल्याने रस्ता खचला असून, धोकादायक झाला आहे. त्यामुळे संरक्षण भिंत बांधण्यासाठी भराव करत असल्याचे कारण सांगितले.      महापालिका आणि येथील काही लोकप्रतिनिधी यांनी निसर्ग व पर्यावरणाचा सतत ऱ्हासच चालवला असून, या आधी देखील अनेक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तरी देखील पालिका निसर्गाचा नाश करण्याचे प्रकार थांबवत नसल्याने चीड स्टॅलिन यांनी व्यक्त केली आहे.  संरक्षण भिंत बांधायची म्हणून उद्या तलाव, खाडी आणि समुद्र सुद्धा भराव टाकून पालिका बंद करणार का ?, विहिरी , तलाव, खाडी , नैसर्गिक प्रवाह आदी बुझवता येत नाहीत व त्यात बांधकामे करता येत नाही असे ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर