शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर पक्षश्रेष्ठींचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:37 IST

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेच्या निमित्ताने ‘पाणी’प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या

कल्याण : लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर झालेला पराभव आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक पातळीवरील वाद काही कमी होताना दिसत नाही. यावर गुरुवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या जिल्हानिहाय बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडून झाडाझडती घेतली जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु पवारांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी या वादावर मौन बाळगून आगामी विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा केली आणि उपस्थितांची मते जाणून घेतली.

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेच्या निमित्ताने ‘पाणी’प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या वक्त्यांसमोेरच राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि पक्षाचे वक्ता प्रशिक्षण जिल्हाध्यक्ष मनोज नायर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला होता. अंतर्गत गटबाजी आणि वाद हे समीकरण राष्ट्रवादीसाठी नवीन नाही. या घटनेतूनही वादाचा सिलसिला सुरूच असल्याचे समोर आले होते. या वादाचे पडसाद पवारांनी बोलाविलेल्या जिल्हानिहाय बैठकीत उमटतील, अशी चर्चा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलाविलेल्या या बैठकीत पवार वादाची गांभीर्याने दखल घेतील का, याकडे लक्ष लागले होते; परंतु प्रत्यक्षात गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत या वादावर मौन बाळगणेच श्रेष्ठींनी पसंत केल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी बैठक बोलाविली असली, तरी पक्षांतर्गत वादाची दखल पवारांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी होती, असा सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे. दरम्यान, या बैठकीत जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष पदाऐवजी लोकसभा अध्यक्ष असावा, अशीही सूचना काही पदाधिकाºयांकडून या वेळी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कल्याणचा दौरा करणार असून संघटनात्मक बांधणीबरोबरच पक्षांतर्गत वस्तुस्थितीचा आढावा घेतील, असे या वेळी ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीन मतदारसंघांची मागणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम, पूर्व आणि ग्रामीण हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला यावेत, अशी मागणी उपस्थित पदाधिकाºयांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेkalyanकल्याण