शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर पक्षश्रेष्ठींचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:37 IST

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेच्या निमित्ताने ‘पाणी’प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या

कल्याण : लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर झालेला पराभव आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक पातळीवरील वाद काही कमी होताना दिसत नाही. यावर गुरुवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या जिल्हानिहाय बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडून झाडाझडती घेतली जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु पवारांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी या वादावर मौन बाळगून आगामी विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा केली आणि उपस्थितांची मते जाणून घेतली.

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेच्या निमित्ताने ‘पाणी’प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या वक्त्यांसमोेरच राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि पक्षाचे वक्ता प्रशिक्षण जिल्हाध्यक्ष मनोज नायर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला होता. अंतर्गत गटबाजी आणि वाद हे समीकरण राष्ट्रवादीसाठी नवीन नाही. या घटनेतूनही वादाचा सिलसिला सुरूच असल्याचे समोर आले होते. या वादाचे पडसाद पवारांनी बोलाविलेल्या जिल्हानिहाय बैठकीत उमटतील, अशी चर्चा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलाविलेल्या या बैठकीत पवार वादाची गांभीर्याने दखल घेतील का, याकडे लक्ष लागले होते; परंतु प्रत्यक्षात गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत या वादावर मौन बाळगणेच श्रेष्ठींनी पसंत केल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी बैठक बोलाविली असली, तरी पक्षांतर्गत वादाची दखल पवारांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी होती, असा सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे. दरम्यान, या बैठकीत जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष पदाऐवजी लोकसभा अध्यक्ष असावा, अशीही सूचना काही पदाधिकाºयांकडून या वेळी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कल्याणचा दौरा करणार असून संघटनात्मक बांधणीबरोबरच पक्षांतर्गत वस्तुस्थितीचा आढावा घेतील, असे या वेळी ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीन मतदारसंघांची मागणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम, पूर्व आणि ग्रामीण हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला यावेत, अशी मागणी उपस्थित पदाधिकाºयांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेkalyanकल्याण