शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर पक्षश्रेष्ठींचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:37 IST

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेच्या निमित्ताने ‘पाणी’प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या

कल्याण : लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर झालेला पराभव आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक पातळीवरील वाद काही कमी होताना दिसत नाही. यावर गुरुवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या जिल्हानिहाय बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडून झाडाझडती घेतली जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु पवारांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी या वादावर मौन बाळगून आगामी विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा केली आणि उपस्थितांची मते जाणून घेतली.

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेच्या निमित्ताने ‘पाणी’प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या वक्त्यांसमोेरच राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि पक्षाचे वक्ता प्रशिक्षण जिल्हाध्यक्ष मनोज नायर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला होता. अंतर्गत गटबाजी आणि वाद हे समीकरण राष्ट्रवादीसाठी नवीन नाही. या घटनेतूनही वादाचा सिलसिला सुरूच असल्याचे समोर आले होते. या वादाचे पडसाद पवारांनी बोलाविलेल्या जिल्हानिहाय बैठकीत उमटतील, अशी चर्चा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलाविलेल्या या बैठकीत पवार वादाची गांभीर्याने दखल घेतील का, याकडे लक्ष लागले होते; परंतु प्रत्यक्षात गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत या वादावर मौन बाळगणेच श्रेष्ठींनी पसंत केल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी बैठक बोलाविली असली, तरी पक्षांतर्गत वादाची दखल पवारांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी होती, असा सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे. दरम्यान, या बैठकीत जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष पदाऐवजी लोकसभा अध्यक्ष असावा, अशीही सूचना काही पदाधिकाºयांकडून या वेळी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कल्याणचा दौरा करणार असून संघटनात्मक बांधणीबरोबरच पक्षांतर्गत वस्तुस्थितीचा आढावा घेतील, असे या वेळी ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीन मतदारसंघांची मागणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम, पूर्व आणि ग्रामीण हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला यावेत, अशी मागणी उपस्थित पदाधिकाºयांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेkalyanकल्याण