शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 2:38 AM

निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांची भीती : कुरघोडीची व्यक्त केली शंका

जितेंद्र कालेकर

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेली स्फोटकांची मोटार आणि याच मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्र सरकारची राष्ट्रीय तपास संस्था करणार आहे. राज्य सरकारने दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे यापूर्वीच हा तपास सोपविला होता. गेल्या वर्षभरापासून केंद्र व राज्य सरकारकडून आपापल्या अखत्यारीतील तपास यंत्रणांचा परस्परविरोधी वापर सुरू आहे. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासाला राजकीय रंग लाभण्याची भीती त्यांचे नातलग व निवृत्त पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची मोटार मिळणे आणि त्याच मोटारीच्या मालकाचा कालांतराने संशयास्पद मृत्यू होणे या दोन्ही घटना एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळेच या घटनांचा तपास कोणत्याही एका संस्थेने त्यातही एटीएससारख्या तपास संस्थेने करणे आवश्यक आहे. अन्यथा, या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडे तपास गेल्यामुळे दोन्ही यंत्रणांमध्ये पर्यायाने केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वारंवार संघर्ष चिघळण्याची चिन्हे अधिक आहेत. हिरेन यांच्या मृत्यूनंतर लागलीच भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. आता या प्रकरणाचा तपास केंद्राने आपल्याकडे घेतला तर राज्य सरकारवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न एनआयएच्या माध्यमातून केला जाईल, अशी भीती काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्फोटके सापडणे व हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या परस्परांशी संबंधित घटना असल्यामुळे याचा तपास वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत व्हायला नको. इतकेच काय, त्यासाठी पोलीस उपायुक्त पातळीवरील अधिकारी एकच हवा, असे मत एकेकाळी ठाणे, मुंबईतील गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेल्या एका वरिष्ठ निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.  याच अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील टीमने ठाणे, मुंबईतील सुरेश मंचेकर, छोटा राजन आणि छोटा शकील या गँगस्टर्सच्या टोळ्या नेस्तनाबूत केल्या होत्या. 

स्फोटकांच्या मोटारीचा तपास एनआयएकडे जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली, तर सुरुवातीपासूनच हा तपास एनआयएकडे दिला जावा, असा आग्रह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता. दरम्यान, हा संपूर्ण तपास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एटीएसकडे सोपविला.  मोटारीचे मालक हिरेन यांच्या गूढ मृत्यूवरून राजकारण चांगलेच तापले. मनसुख यांचा नाहक बळी गेल्यामुळे कुटुंबीयांच्या मागणीवरून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ठाणे पोलिसांकडून एटीएसकडे सोपविण्यात आला. कदाचित हा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  दोन्ही यंत्रणांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वारंवार संघर्ष चिघळण्याची चिन्हे अधिक आहेत. 

‘मृत्यूचे कारण उघड होणार नाही’स्फोटक प्रकरण व हिरेन यांचा मृत्यू या प्रकरणावरून राज्य व केंद्र सरकार समोरासमोर उभे ठाकले तर हिरेन यांच्या मृत्यूचे खरे कारण कधीच उघड होणार नाही. कुरघोडीच्या राजकारणात या विषयावरून राजकारण होईल, अशी शंका हिरेन यांचे नातलग व्यक्त करतात.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण