शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात सत्ताबदलाचे संकेत, महापौर शिवसेनेचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:54 IST

राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत.

सदानंद नाईक 
उल्हासनगर : राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओमी टीम एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २१ नोंव्हेबर रोजी महापौरपदाचा कालावधी संपत असून त्यापूर्वी नवीन महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने परंपरागत मित्र शिवसेनेला बगल देत ओमी टीमसोबत आघाडी केली. ओमी कलानी टीमचे समर्थक भाजपच्या चिन्हावर पालिका निवडणुकीत उतरले. भाजप व ओमी टीमचे ३२ नगरसेवक निवडून येऊन त्यांनी स्थानिक साई पक्षाच्या मदतीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी विराजमान झाल्या. उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद साई पक्षाला दिले, तर ओमी टीमला विविध पदांसाठी सव्वा वर्ष झुलवत ठेवले. अखेर, सव्वा वर्षांनी ओमी टीमच्या, मात्र भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचम कलानी यांना महापौरपद देण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरनिवडीला तीन महिन्यांची मुदत दिली असून, ती २१ नोव्हेंबरला संपत आहे.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही ओमी टीमच्या महापौर पंचम कलानी यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. या प्रकाराने नाराज झालेले ओमी कलानी यांनी ज्योती कलानी यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले. निवडणुकीदरम्यान कलानी कुटुंबाची भाजपने चोहीकडून कोंडी केली, तसेच ओमी समर्थक नगरसेवकांना व्हीप काढून भाजपचे काम करण्यास सांगितले. हे कमी म्हणून की काय, ओमी कलानी टीमच्या अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई केली. अखेरच्या दोन दिवसांपूर्वी कलानी कुटुंबाऐवजी कुमार आयलानी यांना पक्षाची उमेदवारी घोषित केली. याप्रकाराने नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप केला. कलानीपाठोपाठ साई पक्षाला भगदाड पाडल्याचा आरोप आता शहरातून होत आहे. राज्यातील सत्तांतराचा परिणाम शहरातील राजकारणावर होऊन शिवसेनेचा महापौर होण्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.
>नोव्हेंबरमध्ये महापौरपदाची निवडणूक
महापौरपदाचा कालावधी आॅक्टोबर महिन्यात संपला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरपदाच्या निवडणुकीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येऊन, ती मुदत २१ नोंव्हेबर रोजी संपत आहे. २१ नोंव्हेबरपूर्वी महापौर निवडणूक होण्याची शक्यता असून पालिकेत सत्तांतराचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.