शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

शिवसेना खोटी आश्वासने देत नाही - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 3:42 AM

सिटी पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन : कल्याणमध्येही हवाई रिक्षा सुरू करण्याची केली घोषणा

कल्याण : शिवसेना कधीही खोटी आश्वासने देत नाही. जे बोलतो ते आम्ही करुन दाखवितो, असा टोला शिवसेनेचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी भाजपाला लगावला. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर कल्याणच्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी हवाई रिक्षा सुरु करण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गौरीपाडा येथे उभारण्यात येणाऱ्या सिटी पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, खा. श्रीकांत शिंदे, आ. नरेंद्र पवार, आयुक्त गोविंद बोडके, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर उपेक्षा भोईर, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना खोटी आश्वासने देत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ती शिकवण दिलेली नाही. जे कराल तेच सांगा असे बजावले आहे. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यावर ते काम कुठपर्यंत आले. त्याची पूर्तता झाली की नाही यावर आम्ही नजर ठेवून असतो. दोन निवडणुकींच्या मधल्या काळात अनेक पक्ष राजकारण करीत असतात. शिवसेना मात्र दोन निवडणुकीच्या मधल्या काळात जनतेला दिलेली वचनपूर्ती करण्यावर लक्ष देते. समाजकारणाचा वसा शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिला आहे. मी आत्ता २८ वर्षाचा असलो तरी माझ्या ५० व्या वर्षी गाव, शहरे, राज्य आणि देशातील विकासाची स्थिती काय असेल. याचा विचार करतो.रिंगरोडचे काम लवकर व्हावे - पालकमंत्रीच्पालकमंत्री शिंदे म्हणाले की, सिटी पार्क हा उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रॉजेक्ट आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. सिटी पार्कसोबतच कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ सुंदर व्हावे यासाठी पक्षप्रमुखांनी जातीने लक्ष दिले आहे.च्कल्याणमधील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आयुक्त बोडके यांनी रस्ते रुंदीकरण हाती घ्यावे. त्यासाठी पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. कल्याणच्या वाहतूककोंडीवर रिंगरोड हा रामबाण उपाय आहे. या रिंगरोडचे काम जलद गतीने मार्गी लावण्याचे आवाहन त्यांनी केले.ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपाचा निधीकार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार आहे का, अशी विचारणा काहींनी केली असली तरी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी युती कटीबद्ध आहे. या विकासात ठाकरे कुटुंबीयांचे योगदान असले तरी त्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला आहे. याठिकाणी शिवसेना भाजपाचे झेंडे लागलेले आहेत. तरीसुद्धा विरोधक गाजर दाखवल्याचे आंदोलन करतात, असा टोला भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी लगावला. त्यांच्या भाषणानंतर आदित्य म्हणाले की, शिवसेना भाजपामध्ये मध्यस्थी करायची असेल तर कल्याणच्या नरेंद्र पवारांनाच सांगायला हवे. आदित्य यांच्या या टिप्पणीवर हास्याची लकेर उठली.

अंबरनाथमध्ये शूटिंग रेंजचे उद््घाटनअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्यावतीने तयार केलेल्या फिश मार्केट, बहुउद्देशीय इमारत आणि शूटिंग रेंजचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. अंबरनाथमध्ये दहा, २५ आणि ५० मीटर असे तीन रेंज उभारले आहेत. वरळी वगळता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात असे रेंज नसल्याचे मत आदित्य यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, आमदार बालाजी किणीकर, गोपाळ लांडगे, पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख, मुख्याधिकारी देविदास पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेAditya Thackreyआदित्य ठाकरे