शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

'राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम शरद पवार करतात', कपिल पाटील यांचा टोला  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 3:15 PM

Kapil Patil News: यापुढे कितीही पक्ष एकत्र आले, तरी देखील यापुढे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असून फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

ठाणे  - जे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत, त्यामुळे सहाजीकच त्यांना मी मुख्यमंत्री असल्याची भावना वाटणे गैर नसल्याचे सांगत, सध्याच्या मुख्यमंत्र्याकडे कोणतेच काम नाही, त्यांचे काम हे शरद पवार असल्याची टिका केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी जागर अभियानत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार टिका केली. या सरकाराने ओबीसीचे राजकीय आरक्षण अद्यापही दिलेले नाही, मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. परंतु आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत असल्याची टिका देखील त्यांनी यावेळी केली. ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळावे यासाठी केंद्राने राज्याला अधिकार दिले असतांनाही आरक्षण देण्याऐवजी, शेतक:यांच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ सरकार कसे टिकेल यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या महाविकास आघाडी सरकाराने सत्तेत आल्यापासून नुसता गोंधळ घातला आहे, तो गोंधळ सोडविण्यासाठी फडणवीस करीत असल्याने मागील तीन महिन्यापासून त्यांना मास्क लावण्यासाठी देखील वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकूणच यापुढे कितीही पक्ष एकत्र आले, तरी देखील यापुढे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असून फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्या कार्यकाळात एमएमआरडीएकडून 145क् कोटींचा निधी ठाणो जिल्ह्यासाठी मिळाला होता. परंतु आताच्या महाविकास आघाडी सरकारकडून निधी दिला जात नसून त्यासाठी वारंवार खेटे घालावे लागत असल्याची टिका देखील त्यांनी केली. पेट्रोल आणि डिङोल यांच्या वाढीव दराबाबत देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना, पेट्रोल, डिङोलचे दर वाढले तर त्यासाठी केंद्राकडे बोट दाखविले जाते. मात्र क्रुड ऑईलचे दर वाढल्याने दर हे वाढत असतात, हे महाविकास आघाडी सरकाराला माहित नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. परंतु केवळ केंद्राकडे बोट दाखवायचे, परंतु चीनला बॉर्डर पासून दोन किमी मागे हटविले, पाकीस्तानमध्ये घुसुन देशाने ङोंडो फडकवला, ३७० कलम हटविले ही कामे दिसत नाहीत का? असा सवालही त्यांनी शेवटी केला.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे