शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 20:46 IST

कल्याण- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूने भोसकून ठार केले. ज्या व्यक्तीवर चारित्र्याचा संशय घेतला जात होता. त्याच्यावरही चाकूने वार करणा-या पतीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

कल्याण- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूने भोसकून ठार केले. ज्या व्यक्तीवर चारित्र्याचा संशय घेतला जात होता. त्याच्यावरही चाकूने वार करणा-या पतीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याचा अंतिम निकाल आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांनी दिला. या खटल्यात सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी काम पाहिले. या खटल्यातील तपास कामात पोलीस डी. एस. लोखंडे व एस. पी. पाटील यांनी मेहनत घेतली. उल्हासनगरातील कॅम्प नंबर एक परिसरातील अमरधाम येथे राहणारा भजनसिंग लभाणा हा सुताराचे काम करायचा. त्याला त्याच्या पत्नीवर संशय होता. तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. लभाणाला तीन मुले होती. रागाच्या भरात त्यांनी चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने हल्ला करून तिला ठार मारले.तसेच पत्नीचे हितेश धामेजा याच्या सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय लभाणाला होता. पत्नीच्या हत्येपश्चात त्याने हितेशवर धारदार चाकूने वार करून त्यालाही गंभीर जखमी केले होते. ही घटना 23 सप्टेंबर 2012 साली घडली होती. या प्रकरणी हितेशचे वडील वासूमल यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात लभाणाच्या विरोधात पत्नीची हत्या व हितेशवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लभाणाला तातडीने अटक केली होती.लभाणाला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने जामीन दिला नव्हता. त्यामुळे त्याची रवानगी घटनेच्या दुस-या दिवसापासून आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. या प्रकरणात 26 साक्षीदार सरकारी वकील पक्षाने तपासले. न्यायालयाने पत्नीच्या हत्येप्रकरणी व हितेशवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी लभाणाला सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर चार हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. हत्या व प्राणघातक हल्ला या दोन्ही आरोपप्रकरणी प्रत्येकी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा लभाणाला एकत्रित भोगावी लागणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणCrimeगुन्हा