शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

ठाणे स्थानकात रोज सहा हजार पाण्याच्या बाटल्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:32 AM

लाखो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सहा हजार लीटर पाणी प्रवाशांनी प्यायल्याची माहिती आहे.

ठाणे : लाखो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सहा हजार लीटर पाणी प्रवाशांनी प्यायल्याची माहिती आहे. त्यातच एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा वाढल्याने आणि रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत विक्रीला बंदी केल्यामुळे ही संख्या वाढली आहे. हे प्रमाण पाऊस सुरू होताच निम्म्यावर येईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेलवर २८२ अपडाउन तसेच ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासीसंख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी ये-जा करतात. स्थानकातील १० फलाटांवर एकूण १६ उपाहारगृहे आहेत. याच उपाहारगृहांतून उन्हाळा सुरू झाल्याने आणि लिंबू सरबत मिळणे बंद झाल्याने दररोज एक लीटरच्या १२ बाटल्या असलेले ५०० बॉक्स म्हणजे सहा हजार लीटर पाणी दिवसाला विकले जाते. एका महिन्याचा विचार केल्यास सुमारे दोन लाख लीटर पाणीविक्री होते. मात्र, उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळा आणि हिवाळ्यात हे प्रमाण निम्मे असते, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. याआधी म्हणजे रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत विक्री सुरू होती तेव्हा दररोज बाटल्यांतून ३०० बॉक्स पाणी विकले जात होते.दरम्यान, रिकाम्या होणाºया बाटल्यांची विल्हेवाट लावणारी क्रशिंग मशीन ज्या कंपन्यांकडे आहे, त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच त्या बाटल्या क्रश करून त्याचे प्लॅस्टिक घेऊन जाण्याचे आवाहन रेल्वे सूत्रांनी केले आहे.सद्य:स्थितीत रोज एक लीटरच्या पाण्याच्या बाटल्यांचे ५०० च्या आसपास बॉक्स ठाण्यात विकले जात आहेत. येथे विक्री करण्ययात येणाºया पाण्याच्या बाटल्या घेऊन जास्तीत जास्त प्रवासी निघून जातात, तर रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या कचरावेचक उचलत असल्याने तितक्या प्रमाणात त्यांचा कचरा कमी होण्यास मदत होत आहे, असे ठाणे रेल्वे स्थानकाचे संचालक राजेंद्र वर्मा यांनी सांगितले.>कचरा न उचलल्यास कारवाईचा बडगामध्य रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेमुळे स्थानकांच्या टॉपटेन यादीत ठाण्याचे नाव आल्यावर रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच स्थानकातील उपाहारगृहचालकांना आपापल्या उपाहारगृहांसमोरच्या बाटल्या उचलण्याचे आदेश दिले आहेत.त्यांनी कचरा न उचलल्यास कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. रेल्वे स्थानकातील स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमले असून त्याद्वारे स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे.