शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिकेची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 05:09 IST

भिवंडी - महापालिका इमारतीच्या लौकिकाला डाग लागेल, अशी गेल्या काही महिन्यांतील तिसरी घटना मागील आठवड्यात घडली. इमारतीच्या कम्पाउंडला लागून एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याबाबत, पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांंना खुलासा करता आलेला नाही, त्यामुळे मुख्यालयाच्या परिसरातील सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात कापआळी येथे महापालिकेचे सात मजली मुख्यालय आहे. ...

भिवंडी - महापालिका इमारतीच्या लौकिकाला डाग लागेल, अशी गेल्या काही महिन्यांतील तिसरी घटना मागील आठवड्यात घडली. इमारतीच्या कम्पाउंडला लागून एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याबाबत, पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांंना खुलासा करता आलेला नाही, त्यामुळे मुख्यालयाच्या परिसरातील सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात कापआळी येथे महापालिकेचे सात मजली मुख्यालय आहे. या मुख्यालयाच्या खिडकीतून काही वर्षांपूर्वी एका काश्मिरी तरुणाने उडी मारून आत्महत्या केली होती. हा तरुण कोठून इमारतीत शिरला आणि त्याने कोणत्या मजल्यावरून उडी मारली, याबाबतचे चित्रण पालिकेच्या कॅमेºयात बंदिस्त न झाल्याने या प्रकरणावर अखेरपर्यंत प्रकाश पडला नाही. पालिकेचे तत्कालीन अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा केला नाही. सुरक्षा ठेकेदारावर पांघरूण घालण्याचे काम केले गेले. त्यापूर्वी इमारतीत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने पालिकेतील काही दक्ष अधिकाºयांनी आणि नगरसेवकांनी सुरक्षारक्षकांत वाढ करून इमारतीच्या पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वारच बंद करून टाकले. मागील दाराने सर्व कारभार सुरू ठेवला. पालिकेच्या कामकाजाची वेळ जरी सायंकाळी ६ वाजेपर्यंत असली, तरी या इमारतीत मोठे अधिकारी आणि ठेकेदार यांची रात्री उशिरापर्यंत लगबग सुरू असल्याने इमारतीमधील दिव्यांचा झगमगाट १२ वाजेपर्यंत सुरू राहायचा. याचा गैरफायदा घेत काहींनी आपली चारचाकी वाहने पालिकेच्या आवारात उभी करणे सुरू केले होते. त्यापैकी एक तरुण रात्री आवारात गाडी उभी करून परतत असताना इमारतीच्या कम्पाउंडचा मागील लोखंडी दरवाजा अंगावर कोसळून तो जागीच मरण पावला. ही घटना या मार्गावरून जाणाºया रिक्षाचालकांनी पाहून पोलिसांना खबर दिली होती. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने पूर्वेचे मुख्य प्रवेशद्वार उघडले नाही. आयुक्त ई. रवींद्रन व आयुक्त योगेश म्हसे यांनी इमारतीचे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार सुरू केले. याखेरीज, खाजगी सुरक्षाव्यवस्था बंद करून महाराष्ट्र सुरक्षाबल मागवून त्यांच्या हातात इमारतीची सुरक्षा सोपवली. या सुरक्षारक्षकांवर अधिकारी म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी एस.डी. चव्हाण यांची नियुक्ती केली. इमारतीच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे नियंत्रण सुरक्षा कार्यालयाां ठेवले. कॅमेरा आणि त्याचे नियंत्रण करण्याचा ठेका जावेद अली अन्सारी यांना देण्यात आला.

महापालिका इमारतीच्या कम्पाउंडबाहेर दररोज बेवारस गाड्या उभ्या राहत असून काही खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या या कम्पाउंडलगत दररोज उभ्या केल्या जातात. अशा खाजगी गाड्यांच्या आडोशाचा आधार घेत गुलाम नबी शेख (४५) या रिक्षाचालकाने पालिकेच्या कम्पाउंडमधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा मार्ग रहदारीचा असल्याने घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. ही माहिती जवळच असलेल्या निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाल्याने ते घटनास्थळी पोहोचले. या घटनेबाबत मृत व्यक्तीच्या भावाने निजामपूर पोलीस ठाण्यात नोंद केली. मात्र, पालिकेच्या सुरक्षा अधिकारी व सुरक्षारक्षकांनी कातडीबचाव धोरण स्वीकारले. या घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्याकरिता पालिकेच्या आवारातील कॅमेरे तपासले असता मृत व्यक्तीची हालचाल टिपणारा कॅमेरा बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे रिक्षाचालकाची हत्या की आत्महत्या, यावर पोलिसांना आजतागायत प्रकाश टाकता आलेला नाही. सुरक्षा अधिकारी चव्हाण यांचा सुरक्षारक्षकांवर वचक नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. परिणामी, पालिकेच्या इमारतीला सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळी गस्त घालत नाहीत. त्यामुळे विविध घटना घडतात.

भिवंडी महापालिका मुख्यालयाची सुरक्षा खासगी सुरक्षायंत्रणेकडून काढून घेऊन महाराष्ट्र सुरक्षाबलाकडे सोपवली. मात्र, त्यामुळे काहीच फरक पडला नाही. मुख्यालयातील झाडाला मागील आठवड्यात एका रिक्षाचालकाने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमका त्याच भागातील सीसीटीव्ही बंद असल्याने फुटेज प्राप्त झाले नाही. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, त्याचा उलगडा झालेला नाही.

टॅग्स :bhiwandiभिवंडीPoliceपोलिस