शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाषाशुद्धीची सावरकरांची तळमळ - डॉ. सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 18:32 IST

स्वा. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक नवे शब्द रुढ केले. भाषाशुद्धीची प्रेरणा बहुदा त्यांना शिवचरित्रावरुन मिळाली. शिवरायांच्याकाळी फारसी शब्दांचा उपयोग सर्वत्र केला जात असे. याला उत्तर म्हणुन त्यांनी रघुनाथपंत हनुमंते यांना आदेशीत करुन राजव्यवहार कोश निर्माण केला. तद्वतच सावरकरांनी दिलेले महापौर, दिनांक, अध्यासन, प्रपाठक, विधिज्ञ, टपाल, दुरमुद्रक, नेपथ्य आदी शब्द आज उपयोगात आणले जातात. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सावरकरांची भाषाशूद्धीची तळमळ आपण लक्षात घ्यायला हवी असे मत इतिहास व्याख्याते, अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त ते पोर्टब्लेअर अंदमान येथून उपस्थितांना मार्गदर्शन महाराष्ट्र मंडळामध्ये ते बोलत होते

डोंबिवली: स्वा. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक नवे शब्द रुढ केले. भाषाशुद्धीची प्रेरणा बहुदा त्यांना शिवचरित्रावरुन मिळाली. शिवरायांच्याकाळी फारसी शब्दांचा उपयोग सर्वत्र केला जात असे. याला उत्तर म्हणुन त्यांनी रघुनाथपंत हनुमंते यांना आदेशीत करुन राजव्यवहार कोश निर्माण केला. तद्वतच सावरकरांनी दिलेले महापौर, दिनांक, अध्यासन, प्रपाठक, विधिज्ञ, टपाल, दुरमुद्रक, नेपथ्य आदी शब्द आज उपयोगात आणले जातात. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सावरकरांची भाषाशूद्धीची तळमळ आपण लक्षात घ्यायला हवी असे मत इतिहास व्याख्याते, अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त ते पोर्टब्लेअर अंदमान येथून उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. त्यानंतर त्यांनी लोकमतला तेथून ही माहिती देतांना सावरकरांचे मराठीसाठी योगदान या विषयी बोलतांना वरील माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सध्या वृत्तपत्रे,वाहिन्या चर्चा वा साहित्यातून अनेकदा इंग्रजी शब्द उपयोगात आणले जातात. अन्य भाषेतील शब्द आपल्या भाषेत आणल्यामुळे भाषा समृद्ध होते असा फसवा युक्तीवाद केला जातो. मात्र त्यामुळे मूळ भाषेतील त्या अर्थाचा शब्द मरतो. त्याचे काय? असा सवाल डॉ. शेवडे यांनी केला. पोर्टब्लेअरमधील महाराष्ट्र मंडळामध्ये ते बोलत होते. त्या व्याख्यानाच्या निमित्ताने त्यांनी सावरकरांची अंदमाची उडी, त्यामागील राजकारण, त्यांचे अंदमान वास्तव्य आदी अनेक बाबींचा उहापोह केला. तत्पूर्वी याचदौ-यादरम्यान सेल्यूलर तुरुंगात ‘अंदमान पर्व’ या विषयावरही डॉ, शेवडेंनी उद्बोधन केले. गेली १०वर्षे सलग सावरकर आत्मार्पण दिनी सेल्यूलर तुरुंगात व्याख्यान देण्याची अनोखी परंपरा त्यांनी सुरु ठेवली आहे.आपल्या चित्रदर्शी शैलीतील व्याख्यानातून त्यांनी अंदमानातील छळपर्व उपस्थितांसमोर मांडले. देशासाठी हालअपेष्टा सहन केलेल्या या मृत्यूंजय क्रांतीविराचे लंडनमधील निवास स्थान सरकार कधी ताब्यात घेणार? आणि सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? या दोन प्रश्नांनी महामंडळातील सभेची सांगता झाली. महाराष्ट्रामधील सुमारे ७०० सावरकरप्रेमींनी त्या व्याख्यानाला उपस्थिती लावली होती. सभेचे प्रास्ताविक अरविंद पाटील यांनी तर समारोप गोरखनाथ पाटील यांनी केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्ली