शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भाषाशुद्धीची सावरकरांची तळमळ - डॉ. सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 18:32 IST

स्वा. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक नवे शब्द रुढ केले. भाषाशुद्धीची प्रेरणा बहुदा त्यांना शिवचरित्रावरुन मिळाली. शिवरायांच्याकाळी फारसी शब्दांचा उपयोग सर्वत्र केला जात असे. याला उत्तर म्हणुन त्यांनी रघुनाथपंत हनुमंते यांना आदेशीत करुन राजव्यवहार कोश निर्माण केला. तद्वतच सावरकरांनी दिलेले महापौर, दिनांक, अध्यासन, प्रपाठक, विधिज्ञ, टपाल, दुरमुद्रक, नेपथ्य आदी शब्द आज उपयोगात आणले जातात. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सावरकरांची भाषाशूद्धीची तळमळ आपण लक्षात घ्यायला हवी असे मत इतिहास व्याख्याते, अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त ते पोर्टब्लेअर अंदमान येथून उपस्थितांना मार्गदर्शन महाराष्ट्र मंडळामध्ये ते बोलत होते

डोंबिवली: स्वा. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक नवे शब्द रुढ केले. भाषाशुद्धीची प्रेरणा बहुदा त्यांना शिवचरित्रावरुन मिळाली. शिवरायांच्याकाळी फारसी शब्दांचा उपयोग सर्वत्र केला जात असे. याला उत्तर म्हणुन त्यांनी रघुनाथपंत हनुमंते यांना आदेशीत करुन राजव्यवहार कोश निर्माण केला. तद्वतच सावरकरांनी दिलेले महापौर, दिनांक, अध्यासन, प्रपाठक, विधिज्ञ, टपाल, दुरमुद्रक, नेपथ्य आदी शब्द आज उपयोगात आणले जातात. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सावरकरांची भाषाशूद्धीची तळमळ आपण लक्षात घ्यायला हवी असे मत इतिहास व्याख्याते, अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त ते पोर्टब्लेअर अंदमान येथून उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. त्यानंतर त्यांनी लोकमतला तेथून ही माहिती देतांना सावरकरांचे मराठीसाठी योगदान या विषयी बोलतांना वरील माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सध्या वृत्तपत्रे,वाहिन्या चर्चा वा साहित्यातून अनेकदा इंग्रजी शब्द उपयोगात आणले जातात. अन्य भाषेतील शब्द आपल्या भाषेत आणल्यामुळे भाषा समृद्ध होते असा फसवा युक्तीवाद केला जातो. मात्र त्यामुळे मूळ भाषेतील त्या अर्थाचा शब्द मरतो. त्याचे काय? असा सवाल डॉ. शेवडे यांनी केला. पोर्टब्लेअरमधील महाराष्ट्र मंडळामध्ये ते बोलत होते. त्या व्याख्यानाच्या निमित्ताने त्यांनी सावरकरांची अंदमाची उडी, त्यामागील राजकारण, त्यांचे अंदमान वास्तव्य आदी अनेक बाबींचा उहापोह केला. तत्पूर्वी याचदौ-यादरम्यान सेल्यूलर तुरुंगात ‘अंदमान पर्व’ या विषयावरही डॉ, शेवडेंनी उद्बोधन केले. गेली १०वर्षे सलग सावरकर आत्मार्पण दिनी सेल्यूलर तुरुंगात व्याख्यान देण्याची अनोखी परंपरा त्यांनी सुरु ठेवली आहे.आपल्या चित्रदर्शी शैलीतील व्याख्यानातून त्यांनी अंदमानातील छळपर्व उपस्थितांसमोर मांडले. देशासाठी हालअपेष्टा सहन केलेल्या या मृत्यूंजय क्रांतीविराचे लंडनमधील निवास स्थान सरकार कधी ताब्यात घेणार? आणि सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? या दोन प्रश्नांनी महामंडळातील सभेची सांगता झाली. महाराष्ट्रामधील सुमारे ७०० सावरकरप्रेमींनी त्या व्याख्यानाला उपस्थिती लावली होती. सभेचे प्रास्ताविक अरविंद पाटील यांनी तर समारोप गोरखनाथ पाटील यांनी केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्ली