शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

ठाण्यातही भगवे वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:31 IST

मराठा क्रांती मोर्चासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोर्चेकºयांच्या स्वागताच्या कमानी, झेंडे, फ्लेक्स यामुळे शहरातील प्रमुख रस्ते भगवे झाले आहेत. मुंबई आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी शक्यतो लोकलने प्रवास करून मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मराठा क्रांती मोर्चासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोर्चेकºयांच्या स्वागताच्या कमानी, झेंडे, फ्लेक्स यामुळे शहरातील प्रमुख रस्ते भगवे झाले आहेत. मुंबई आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी शक्यतो लोकलने प्रवास करून मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातून येणारे मोर्चेकरी आणि शहापूर, मुरबाडसारख्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी पार्किंग, चहा-नाश्ता, पाणी, वैद्यकीय मदत अशी व्यवस्था संध्याकाळपासूनच सज्ज ठेवण्यात आली आहे.मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईपासून १०० किलोमीटरच्या परिघात राहणाºया नागरिकांनी मोर्चाच्या दिवशी सकाळी निघावे, मुंबईत दाखल होण्यासाठी निश्चित करून दिलेली ठराविक वेळ पाळावी, त्याचबरोबर गाड्या आणण्यापेक्षा शक्यतो लोकलने प्रवास करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.मुरबाड, शहापूर येथील कार्यकर्त्यांनी आपली वाहने कल्याण परिसरात पार्क करून पुढील प्रवास लोकलने करावा. तसेच वाहने घेऊन येणाºयांनी मुलुंडपासून दिशादर्शक फलकांचा आधार घ्यावा, पार्किंगची व्यवस्था पाळावी, असे निरोप देण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी ठाणे शहरातील कार्यकर्ते निघतील. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना वेळा ठरवून दिल्या आहेत.कल्याण-डोंबिवलीही सज्जकल्याण : मराठा मूक मोर्चासाठी कल्याण- डोंबिवलीही सज्ज झाली असून कल्याणहून प्रचंड प्रमाणात समाज बांधव सहभागी होतील, असे आयोजकांनी सांगितले. डोंबिवलीतूनही मोठया प्रमाणावर कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठवाड्यातील ५०० मोर्चेकरी डोंबिवलीत दाखल झाले आहेत.मूक मोर्चानिमित्ताने मंगळवारी सायंकाळी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ सदस्य नोंदणी अभियान पार पडले. बाहेरगावाहून मुंबईत दाखल होणाºयांसाठी कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी डोंबिवलीत मराठवाडा परिसरातून ५०० च्या आसपास कार्यकर्ते दाखल झाले असून त्यांची राहण्याची सोय पूर्वेकडील के. बी. विरा हायस्कूल आणि पश्चिमेकडील स. है. जोंधळे हायस्कुलमध्ये करण्यात आली आहे. पुणे, विदर्भातूनही मराठा बांधव दाखल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.मोर्चाच्या मार्गावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेऊन बहुतांश कार्यकर्ते रेल्वेने भायखळ््याच्या जिजामात उद्यानाच्या परिसरात दाखल होणार आहेत.कल्याणमधील अनेक कार्यकर्ते मंगळवारी रात्रीच मोर्चाच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. या मोर्चाची माहिती देत तरूणांनी सोशल मीडियावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मोर्चानिमित्ताने शहरातील मुख्य चौकांमध्ये आवाहनाचे फलकही लावण्यात आले आहेत.50,000 जणांची जेवणाची व्यवस्था कोपरी आनंदनगर जकात नाका येथे सुमारे ५० हजार जणांसाठी चहा-नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर १०० मोबाईल टॉयलेटही उभारण्यात आली आहेत.