शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

औद्योगिक परिसरातील वाट खडतर, काँक्रिटच्या रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:48 IST

काँक्रिटच्या रस्त्यांची दुर्दशा : मालाच्या नुकसानीमुळे डोंबिवलीतील कारखानदार त्रस्त

डोंबिवली : शहरातील औद्योगिक निवासी परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली असताना कारखान्यांच्या आवारातील रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. बहुतांश रस्ते काँक्रिटचे आहेत. परंतु, पेव्हरब्लॉक खचल्याने तसेच काँक्रिटच न राहिल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. कारखान्यांमधील तयार झालेल्या मालाची या रस्त्याने वाहतूक करताना त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कारखानदार त्रस्त झाले आहेत.

केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर १ जून २०१५ ला २७ गावांचा औद्योगिक परिसरासह महापालिकेत समावेश झाला. परंतु, येथील नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? यावरून केडीएमसी व एमआयडीसी प्रशासनात मतभेद आहेत. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे औद्योगिक भागातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे.निवासी विभागातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. कचराही वेळेत उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचून स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर ठिकठिकाणी पाण्याची डबकी निर्माण होत आहेत. परिणामी, घराघरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे नुकसान झाल्याचेही यंदाच्या पावसाळ्यात पाहायला मिळाले. त्याचबरोबर औद्योगिक परिसरातील कारखान्यांच्या भोवतालचे रस्तेही सुस्थितीत नाहीत. या भागात सुमारे ४५० कारखाने आहेत. कारखान्यांच्या परिसरातील बहुतांश रस्ते हे काँक्रिटचे आहेत. परंतु, काही ठिकाणी पेव्हरब्लॉकचा वापरही करण्यात आला आहे. मात्र, हे पेव्हरब्लॉक कारखान्यांमध्ये अवजड वाहनांमुळे पूर्णपणे खचलेले आणि तुटलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये मोठी डबकी निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यातून वाहन नेताना वाहनचालकांची कसरत होत असून दुचाकी अडकून पडल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत.दुसरीकडे काँक्रिटच्या रस्त्याला लागून असलेले डांबरी रस्तेही खचले आहेत. दोघांच्या पातळीत उंचसखल भाग झाल्याने याठिकाणीही वाहने जोरदार आदळत आहेत.रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. रस्त्यावरील डांबरही निघून गेल्याने धुळीचा त्रासही चालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने हे चित्र औद्योगिक कारखान्यांलगतच्या सर्व्हिस रोडवर पाहायला मिळते.मुख्यमंत्र्यांनाहीदिले पत्ररस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एमआयडीसी, केडीएमसी यांच्याशी पत्रव्यवहार केले आहेत. याप्रकरणी उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्रे पाठविली आहेत. परंतु, अद्यापही रस्त्यांची सुधारणा झालेली नाही. या खड्डेमय रस्त्यांमुळे मालाचेही मोठे नुकसान होत आहे. या रस्त्यांवरून शाळेच्या बसही जात असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षाही धोक्यात आली आहे, असे कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले.रस्त्यावर पसरलेल्या सांडपाण्यातून करावी लागली येजाऔद्योगिक निवासी भागातील सर्व्हिस रोडवर सांडपाणी वाहून नेणारे गटार तुंबल्याने तेथील रस्त्याच्या बहुतांश भागात सांडपाणी साचले होते. अन्य पर्याय नसल्याने गेले दोन दिवस या घाणेरड्या पाण्यातून वाहनचालक आणि पादचारी ये-जा करीत होते. दरम्यान, सोमवारी दुपारी गटार साफसफाईचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू करण्यात आले होते. येथील लगतच्या रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण केली असताना सांडपाण्यातून वाट काढणे स्थानिकांसाठी जिकिरीचे होऊन बसले होते. 

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी