शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत
2
मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... 
3
८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?
4
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
5
Inflation Impact in India: २० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित
6
मकर संक्रांत २०२६: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?
7
अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम
8
संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू 
9
"माझ्यामुळेच NATO अस्तित्वात, आता ग्रीनलँडवरही आमचाच ताबा हवा" Donald Trump यांचा मोठा दावा!
10
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
11
मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स इंडस्ट्रीज 'या' राज्यात करणार ₹7 लाख कोटींची गुंतवणूक
12
IND vs NZ ODI : वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून OUT! ‘या’ युवा खेळाडूला टीम इंडियात पहिली संधी
13
Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
14
व्हेनेझुएलाचा 'गुप्त' खजिना! कच्चे तेल किंवा सोने नाही तर 'या' वस्तूवर अमेरिकेचा डोळा?
15
"रोज रशियाचे 1000 सैनिक मारले जात आहेत, हा निव्वळ 'वेडेपणा', अमेरिका..."; झेलेंस्की यांचा धक्कादायक दावा
16
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
17
केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
18
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
19
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
20
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील प्रदूषणबाबत काँग्रेसचे पर्यावरण सचिवकडे साकडे, वालधुनी नदीचे प्रदूषण ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 17:03 IST

Ulhasnagar : शहराला प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना निवेदन दिले. तसेच सर्वाधिक प्रदूषित वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडत असल्याने होत असल्याची माहिती देऊन कारवाईची मागणी केली.

उल्हासनगर ध्वनी प्रदूषणात अव्वल असतांना, वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडले जाते. याप्रकाराने नदीतील पाण्याच्या उग्र वास येत असून नदी किनारील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला. शहराला प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले. तसेच प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करून प्रदूषणाबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने उल्हासनगर, अंबरनाथ येथून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात रासायनिक कारखाने तसेच टँकरद्वारे विषारी रसायन सोडत असल्याचें सांगण्यात आले. नदी पात्रात वारंवार विषारी रसायन सोडत असल्यावरही काहीएक कारवाई होत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. 

वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडल्यानंतर, नदी पात्रातील उग्र वासाने श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे, उलट्या होणे, डोळे दुखणे, अंगाला खाज सुटणे आदी त्रास नदी किनारील हजारो नागरिकांना होत आहे. शहरातील भरतनगर, कैलास कॉलनी,समतानगर, वडोलगाव, रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, शांतीनगर, हिराघाट आदी परिसरारील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. असे पर्यावरण विभागाच्या सचिव यांना सांगण्यात आले. असाच प्रकार सुरू राहिल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता रोहित साळवे यांनी व्यक्त केला आहे. या व्यतिरिक्त प्रतिबंधक प्लॅस्टिक पिशव्याची निर्मिती व विक्री सुरू असल्याचे साळवे यांनी सांगितले. एकूणच शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे. 

प्रदूषण मंडळाची कारवाई दिखाऊ वालधुनी नदी पात्रात रासायनिक कारखाने प्रक्रिया न केलेले विषारी रसायन सोडत असून दर पाच मिनिटाला नदीतील पाणी रंग बदलत आहे. तसेच बाहेरून आणलेले विषारी रसायन टँकरद्वारे नदी पात्रात सोडले जात असून यापूर्वी टँकरवर गुन्हे दाखल झाले. मात्र काही वर्षांपासून प्रदूषण मंडळ, पोलीस व महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रोहित साळवे यांनी केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर