शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील प्रदूषणबाबत काँग्रेसचे पर्यावरण सचिवकडे साकडे, वालधुनी नदीचे प्रदूषण ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 17:03 IST

Ulhasnagar : शहराला प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना निवेदन दिले. तसेच सर्वाधिक प्रदूषित वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडत असल्याने होत असल्याची माहिती देऊन कारवाईची मागणी केली.

उल्हासनगर ध्वनी प्रदूषणात अव्वल असतांना, वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडले जाते. याप्रकाराने नदीतील पाण्याच्या उग्र वास येत असून नदी किनारील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला. शहराला प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले. तसेच प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करून प्रदूषणाबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने उल्हासनगर, अंबरनाथ येथून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात रासायनिक कारखाने तसेच टँकरद्वारे विषारी रसायन सोडत असल्याचें सांगण्यात आले. नदी पात्रात वारंवार विषारी रसायन सोडत असल्यावरही काहीएक कारवाई होत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. 

वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडल्यानंतर, नदी पात्रातील उग्र वासाने श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे, उलट्या होणे, डोळे दुखणे, अंगाला खाज सुटणे आदी त्रास नदी किनारील हजारो नागरिकांना होत आहे. शहरातील भरतनगर, कैलास कॉलनी,समतानगर, वडोलगाव, रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, शांतीनगर, हिराघाट आदी परिसरारील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. असे पर्यावरण विभागाच्या सचिव यांना सांगण्यात आले. असाच प्रकार सुरू राहिल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता रोहित साळवे यांनी व्यक्त केला आहे. या व्यतिरिक्त प्रतिबंधक प्लॅस्टिक पिशव्याची निर्मिती व विक्री सुरू असल्याचे साळवे यांनी सांगितले. एकूणच शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे. 

प्रदूषण मंडळाची कारवाई दिखाऊ वालधुनी नदी पात्रात रासायनिक कारखाने प्रक्रिया न केलेले विषारी रसायन सोडत असून दर पाच मिनिटाला नदीतील पाणी रंग बदलत आहे. तसेच बाहेरून आणलेले विषारी रसायन टँकरद्वारे नदी पात्रात सोडले जात असून यापूर्वी टँकरवर गुन्हे दाखल झाले. मात्र काही वर्षांपासून प्रदूषण मंडळ, पोलीस व महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रोहित साळवे यांनी केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर