शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील प्रदूषणबाबत काँग्रेसचे पर्यावरण सचिवकडे साकडे, वालधुनी नदीचे प्रदूषण ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 17:03 IST

Ulhasnagar : शहराला प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना निवेदन दिले. तसेच सर्वाधिक प्रदूषित वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडत असल्याने होत असल्याची माहिती देऊन कारवाईची मागणी केली.

उल्हासनगर ध्वनी प्रदूषणात अव्वल असतांना, वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडले जाते. याप्रकाराने नदीतील पाण्याच्या उग्र वास येत असून नदी किनारील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला. शहराला प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले. तसेच प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करून प्रदूषणाबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने उल्हासनगर, अंबरनाथ येथून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात रासायनिक कारखाने तसेच टँकरद्वारे विषारी रसायन सोडत असल्याचें सांगण्यात आले. नदी पात्रात वारंवार विषारी रसायन सोडत असल्यावरही काहीएक कारवाई होत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. 

वालधुनी नदी पात्रात विषारी रसायन सोडल्यानंतर, नदी पात्रातील उग्र वासाने श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे, उलट्या होणे, डोळे दुखणे, अंगाला खाज सुटणे आदी त्रास नदी किनारील हजारो नागरिकांना होत आहे. शहरातील भरतनगर, कैलास कॉलनी,समतानगर, वडोलगाव, रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, शांतीनगर, हिराघाट आदी परिसरारील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. असे पर्यावरण विभागाच्या सचिव यांना सांगण्यात आले. असाच प्रकार सुरू राहिल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता रोहित साळवे यांनी व्यक्त केला आहे. या व्यतिरिक्त प्रतिबंधक प्लॅस्टिक पिशव्याची निर्मिती व विक्री सुरू असल्याचे साळवे यांनी सांगितले. एकूणच शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे. 

प्रदूषण मंडळाची कारवाई दिखाऊ वालधुनी नदी पात्रात रासायनिक कारखाने प्रक्रिया न केलेले विषारी रसायन सोडत असून दर पाच मिनिटाला नदीतील पाणी रंग बदलत आहे. तसेच बाहेरून आणलेले विषारी रसायन टँकरद्वारे नदी पात्रात सोडले जात असून यापूर्वी टँकरवर गुन्हे दाखल झाले. मात्र काही वर्षांपासून प्रदूषण मंडळ, पोलीस व महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रोहित साळवे यांनी केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर