शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

पाण्यासाठी शहापूरकरांची मंत्रालयापर्यंत जलदिंडी

By admin | Published: May 06, 2016 1:00 AM

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईने जनतेला ग्रासले असताना, शहापूर तालुक्यातील शेकडो गाव - पाड्यांना डोळ्यासमोर धरणांतील

शेणवा/शहापूर : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईने जनतेला ग्रासले असताना, शहापूर तालुक्यातील शेकडो गाव - पाड्यांना डोळ्यासमोर धरणांतील पाणी दिसत असूनदेखील ते घेऊ शकत नसल्याने जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याच्या निषेधार्थ शहापुरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे येत्या १४ मे ते १७ मे दरम्यान शहापूर ते मंत्रालय जलदिंडी काढून राज्यकर्त्याना पाणीटंचाईचे विदारक वास्तव दाखवणार आहेत.मुंबईसह, ठाणे, कल्याण, भार्इंदर शहरांना तालुक्यातील तानसा, भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणांतून पाणी पुरवठा बारामाही सुरळीत सुरु असतो. परंतु पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला पाण्यासाठी मैलोमैल दरवर्षी फिरावे लागत आहे तालुक्याच्या पाणीटंचाईबाबत दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात चर्चा होते. मात्र पहिला पाऊस पडला की ती बंद होते. मंजूर झालेल्या नळपाणी योजनांचा भ्रष्टाचार, स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र दरवर्षी दिसते. शहापूरच्या या कृत्रिम पाणीटंचाईवर कायमची मात तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी या जलिदंडीचे आयोजन केल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वार्ताहर)