शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र चळवळीत शेकापचे योगदान

By admin | Updated: August 4, 2014 00:29 IST

किरण माने : शेतकरी कामगार पक्षाचा ६६ वा वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महाराष्ट्र राज्य निर्मितीत शेतकरी कामगार पक्षाचे अमूल्य योगदान असल्याचे मत सातारा येथील अ‍ॅड. किरण माने यांनी आज, रविवारी व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जिल्हा सहचिटणीस भारत पाटील मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते. तत्पूर्वी, सकाळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव पाटील यांच्या हस्ते खासबाग, टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयाजवळ ध्वजवंदन झाले. अ‍ॅड. किरण माने म्हणाले, श्रमिकांचे राज्य आणण्यासाठी या पक्षाने आंदोलन केले. काँग्रेसने १९२० ला भाषा व प्रांतरचनेचा ठराव केला पण, तो अंमलात आणला नाही. भाषावार प्रांतरचनेला काँग्रेसचा विरोध होता. यासाठी शेकापने महाराष्ट्र समिती स्थापन करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली. या चळवळीत १०५ हुतात्मे झाले तर सुमारे एक हजार जणांना तुरुंगवास भोगावा लागला. या लढ्याची सुरुवात कोल्हापुरातील बिंदू चौकातून झाली. त्याची दखल घेत त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे पुणे येथे दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य निर्मितीचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे राज्य निर्मितीच्या लढ्याला यश हे या पक्षाचे आहे.स्वागत जिल्हा सहचिटणीस दिलीपकुमार पाटील यांनी तर सुनीलकुमार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास माजी महापौर शिवाजीराव कदम, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, सुशांत बोरगे, सुभाष सावंत, बाबूराव पाटील, मधुकर हरेल, अशोक चव्हाण, स्वप्निल कदम, संग्राम माने, सुनंदा मोरे, दमयंती कडोकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजीराव जगदाळे यांनी आभार मानले.५० जागा लढविणार...येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ५० जागा लढविणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग संघटक मनीष महागांवकर यांनी शेकापमध्ये प्रवेश केला.