शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र चळवळीत शेकापचे योगदान

By admin | Updated: August 4, 2014 00:29 IST

किरण माने : शेतकरी कामगार पक्षाचा ६६ वा वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महाराष्ट्र राज्य निर्मितीत शेतकरी कामगार पक्षाचे अमूल्य योगदान असल्याचे मत सातारा येथील अ‍ॅड. किरण माने यांनी आज, रविवारी व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जिल्हा सहचिटणीस भारत पाटील मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते. तत्पूर्वी, सकाळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव पाटील यांच्या हस्ते खासबाग, टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयाजवळ ध्वजवंदन झाले. अ‍ॅड. किरण माने म्हणाले, श्रमिकांचे राज्य आणण्यासाठी या पक्षाने आंदोलन केले. काँग्रेसने १९२० ला भाषा व प्रांतरचनेचा ठराव केला पण, तो अंमलात आणला नाही. भाषावार प्रांतरचनेला काँग्रेसचा विरोध होता. यासाठी शेकापने महाराष्ट्र समिती स्थापन करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली. या चळवळीत १०५ हुतात्मे झाले तर सुमारे एक हजार जणांना तुरुंगवास भोगावा लागला. या लढ्याची सुरुवात कोल्हापुरातील बिंदू चौकातून झाली. त्याची दखल घेत त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे पुणे येथे दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य निर्मितीचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे राज्य निर्मितीच्या लढ्याला यश हे या पक्षाचे आहे.स्वागत जिल्हा सहचिटणीस दिलीपकुमार पाटील यांनी तर सुनीलकुमार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास माजी महापौर शिवाजीराव कदम, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, सुशांत बोरगे, सुभाष सावंत, बाबूराव पाटील, मधुकर हरेल, अशोक चव्हाण, स्वप्निल कदम, संग्राम माने, सुनंदा मोरे, दमयंती कडोकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजीराव जगदाळे यांनी आभार मानले.५० जागा लढविणार...येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ५० जागा लढविणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग संघटक मनीष महागांवकर यांनी शेकापमध्ये प्रवेश केला.