शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये अतिक्रमणांना ‘संरक्षण’

By admin | Updated: June 16, 2017 02:06 IST

अंबरनाथ स्टेशनला लागून असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. याबाबत पालिकेकडे तक्रारी आलेल्या असतानाही ती जागा संरक्षण

- पंकज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथ स्टेशनला लागून असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. याबाबत पालिकेकडे तक्रारी आलेल्या असतानाही ती जागा संरक्षण विभागाची असल्याचे कारण पुढे करुन त्या अतिक्रमणांवर कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या पालिकेने त्याच वस्तीमध्ये नागरी सुविधा पुरविण्यास सुरूवात केल्याने त्याचा कित्ता गिरवत शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढू लागली आहेत. अंबरनाथ आयुध निर्माणी कारखान्यातील शस्त्र सामग्री वाहतुकीसाठी पूर्वीपासून स्वतंत्र रेल्वे रुळ टाकले आहेत. त्या रुळांवरुन कंपनीमधील शस्त्र सामग्री मालगाडीने पुणे, नागपूर आणि कानपूरला पाठविली जात होती. कालांतराने मालगाडीने सामग्री नेणे बंद झाल्याने रेल्वे रुळ आणि त्याला लागून असलेला परिसर हा पडीक अवस्थेत राहिला. या जागेवर अंबरनाथ आयुध निर्माणी अर्थात संरक्षण विभागाचा मालकी हक्क आहे. मात्र जागेच्या सुरक्षेकडे व्यवस्थापनेचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने या मोकळ्या जागेवर काही भू माफियांनी कब्जा करुन तेथे रातोरात अनधिकृत झोपड्या उभारण्यास सुरूवात केली. नव्याने उभारण्यात आलेल्या झोपड्या विकण्याचे काम सुरू आहे. एक लाखापासून ते तीन लाखांपर्यंत झोपडी विकली जात असल्याने गोवंडी, भिवंडी, मुंब्रा, कौसा, मानखुर्द या भागातील गुंड प्रवृत्तीच्या अनेक व्यक्ती येथे वास्तव्यास आहेत. सरासरी पाच एकरांची जागा या भू माफियांनी हडप केली आहे. झोपड्या विकल्यानंतर त्यांना नागरी सुविधा कशा पुरवायच्या असा प्रश्न या भू माफियांपुढे होता. मात्र काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन नागरी सुविधा पुरविण्यातही भू माफिया आणि राजकीय पुढाऱ्यांच्या दलालांनी बाजी मारली. येथील अतिक्रमणांच्या तक्रारी केल्यावर पालिका प्रशासन ही जागा संरक्षण विभागाची असल्याने तेथे त्यांच्या विभागाने कारवाई केली पाहिजे, असा सल्ला देते. मात्र, ज्या जागेवर कारवाई केली जात नाही, त्याच जागेवर नागरी सुविधा पुरवितांना त्यांना कायदा आडवा येत नसल्याचे यातून स्पष्ट दिसते. गेल्या आठवडाभरात येथे ५० हून अधिक नव्या झोपड्या रातोरात उभारण्यात आल्या. एवढेच नव्हे, तर त्यांना तत्काळ विजेचे कनेक्शनही देण्यात आले.नागरी सुविधा कशा देता?संरक्षण विभागाची जागा तत्काळ ताब्यात घेण्याचे आणि ती जागा संरक्षित करण्याचे संरक्षण विभागाच्या आदेशाकडे अंबरनाथ आयुध निर्माण कारखान्याचे व्यवस्थापन सतत दुर्लक्ष करते. या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे काम हे पालिकेचे असले तरी त्यासाठी आयुध निर्माणी कारखान्याने त्यासाठी पालिकेकडे आणि जिल्हाधिका-यांकडे योग्य पाठपुरावा करणे गरजेचे आहे. संरक्षण विभागाच्या जागेवर थेट कारवाई करता येत नसेल तर मग या ठिकाणी नागरी सुविधा कशा पुरविल्या जातात हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तहसील कार्यालयातून कायमस्वरूपी रस्ताया भागाला नागरी सुविधा पुरविण्यासाठी पालिकेने अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीची संरक्षण भिंतही तोडली. ही भिंत तोडून तेथून बांधकामांचे साहित्य नेण्यात आले. मात्र काम झाल्यावर ती भिंत पुन्हा बांधणे बंधनकारक असूनही पालिकेला ती भिंत बांधण्यास अद्याप फुरसत मिळालेली नाही. त्यामुळे आता या अतिक्रमणांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कायमस्वरुपी रस्ताही मिळाला.