शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

तब्बल १६ तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 00:23 IST

काही घरांमध्ये तब्बल १६ तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. स्वातंत्र्यदिनी अशी घटना घडल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे.

डोंबिवली : गोग्रासवाडी भागातील साकार रेसिडेन्सी येथे महावितरणच्या वीजवाहिनीत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यामुळे तेथील साडेसात हजार ग्राहकांना त्याचा फटका बसला. काही घरांमध्ये तब्बल १६ तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. स्वातंत्र्यदिनी अशी घटना घडल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे.महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रान्सफॉर्मर, मुख्य उच्चदाबवाहिनी आणि अन्य एका यंत्रणेत एकाचवेळी बिघाड झाला. शुक्र वारी रात्री पाऊस पडत असल्याने कामात अडथळा येत होता. शनिवारी सकाळी महावीरनगर येथील एका फिडरवरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तरीही, एकनाथ म्हात्रेनगर भागातील पुरवठा दुपारपर्यंत सुरळीत झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. साकार सोसायटीच्या भागातील ट्रान्सफॉर्मर फेल झाला असून तो दाब घेत नसल्याने समस्या वाढली आहे.>‘विजेच्या त्रासातून सोडवा’आमच्या घरात आई आजारी असून त्यात १६ तास वीज खंडित झाली होती. बिले वारेमाप येतच आहेत. पण, अखंडित वीजपुरवठा मात्र महावितरण देऊ शकत नाही. याकडे सत्ताधारी, विरोधी पक्ष नेत्यांनी लक्ष घालून सोक्षमोक्ष लावावा व या त्रासातून सोडवावे, अशी प्रतिक्रिया अभिलाष पगारे या तरुणाने दिली.