शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रिक्षाचालकांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 12:27 AM

आजचे उपोषण पुढे ढकलले; कृती समितीची माहिती

ठाणे : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांची पुरती वाताहत झाली आहे. मात्र, सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना अर्थसाह्य देण्यासह कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी रिक्षा, टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीने रविवारी ९ आॅगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय या चालकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. यामुळे ते आंदोलन काही दिवस स्थगित केल्याचेरिक्षा-टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनिल चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस दयानंद गायकवाड यांनी सांगितले.लॉकडाऊन कालावधीमध्ये महाराष्ट्रातील आठ आॅटोरिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक आॅटोरिक्षाचालक हे नैराश्येमध्ये जगत आहेत. त्यामुळे प्रत्येकास लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक महिन्याकाठी किमान पाच हजारांची आर्थिक मदत शासनाने द्यावी, आत्महत्याग्रस्त आॅटोरिक्षाचालकांच्या कुटुंबास १० लाखांची मदत ताबडतोब करावी, शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी मिळावी, आॅटोरिक्षाचालकांना कोविडयोद्धा म्हणून घोषित करून त्यांना ५० लाखांचे विमाकवच जाहीर करावे, कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी रिक्षाचालक उपोषणाला बसणार होते. मागण्या कधी मान्य होणार याकडे लक्ष आहे.