शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कवीला कुणी ‘घर देता का घर’, धोकादायक इमारतीला पालिकेने बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 01:50 IST

‘अशीच अमुची आई असती...’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘गोल असे ही दुनिया, आणिक गोल असे रुपया,’ अशी एकाहून एक सरस गीते ज्यांच्या लेखणीतून उतरली ते महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त कवी मधुकर जोशी यांच्यावर वयाच्या ८८ व्या वर्षी ‘कुणी घर देता का घर?,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : ‘अशीच अमुची आई असती...’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘गोल असे ही दुनिया, आणिक गोल असे रुपया,’ अशी एकाहून एक सरस गीते ज्यांच्या लेखणीतून उतरली ते महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त कवी मधुकर जोशी यांच्यावर वयाच्या ८८ व्या वर्षी ‘कुणी घर देता का घर?,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.जोशी हे आयरे येथील ४० वर्षे जुन्या ‘हेरंब’ इमारतीत राहतात. मात्र, ती धोकादायक झाल्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. त्यामुळे बिल्डरने रहिवाशांना जागा रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे आता जायचे कुठे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे.हेरंब या चार मजली इमारतीत ४३ भाडेकरू राहत होते. पण जागा रिकामी करण्याची नोटीस दिल्याने ४० जणांनी जागा सोडल्या आहेत. आता अवघे तीन कुटुंबे राहत आहेत. डोंबिवलीत मागील वर्षी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी जोशी यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. पण संमेलन संपले व साहित्याच्या सारस्वतांना त्यांचा विसर पडला आहे. संमेलनानंतर ते फिरकले देखील नाहीत, अशी खंत जोशी यांनी बोलून दाखवली.जोशी म्हणाले, जागेसाठी खूप पैसे लागतात. ते कुठून आणू? डिपॉझिट खूप सांगतात. माझ्याकडील तुटपुंज्या पैशांमुळे मला भाडेही भरणे शक्य नाही. ४० वर्षे मी नोकरी केली आहे. पण कधीही सरकारकडे जागा मागितली नाही. कारण सरकारवर माझा विश्वास नाही. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कवी शांता शेळके, कवी कुसुमाग्रज यांची घरे ही मोडकी होती. सरकारने महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला मात्र त्याबरोबर काही ठोस अशी रक्कम दिली नाही. कविता लेखनाची आपण तपश्चर्या केली आहे. पण साहित्यात त्याला फार किंमत नाही. हिंदी भाषिक कवीला जितका मान आहे, तेवढा मान सन्मान मराठी कवीला मिळत नाही. एकही मराठी कवी भरपूर मिळकत मिळवू शकलेला नाही. मंगेश पाडगावकर यांच्या सारख्या अनेक कवींनी आपला उदरनिर्वाह हा खाजगी नोकरी करून केला आहे. मराठी कवींची दुरवस्था झाली आहे. अनेक सत्कार झाले, पण ते त्या काळापुरते मर्यादित असतात. नंतर त्याला कुणी विचारत नाही. साहित्यात कवितेलाच मानाचे स्थान नाही. आता तर साहित्यालाच फार किंमत उरलेली नाही. नवोदित कवी ज्या कविता लिहितात त्या गद्य स्वरूपात असतात. पद्य कविता काळाच्या पडद्याआड लुप्त होत आहेत. साहित्यात रममाण असलेले आणि साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जोशी यांची होणारी उपेक्षा सरकारापर्यंत पोहोचणार का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पाच हजार भावस्पर्शी गीतेमधुकर जोशी यांनी पाच हजारांपेक्षा जास्त भावस्पर्शी गीते लिहिली आहेत. त्यात ‘अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती,’ हे अजरामर गीतही आहे. सध्या वयोमानानुसार फारसे लिखाण होत नाही. परंतु, नुकत्याच त्यांनी काही मंगलाष्टका लिहिल्या आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या