शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु; अहवाल आणा मगच करु दाखल, रुग्णालयांनी केले हात वर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 3:28 PM

मानपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाची प्रकृत्ती अचानक बिघडली, त्यामुळे शुक्रवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईंकानी धावपळ सुरु केली.

ठाणे: कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्युचे प्रमाणही ठाण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रशासनाच्या चुकांमुळे देखील काहींना आपल्या प्राणांना नाहक मुकावे लागल्याच्या घटना एका मागून एक समोर येत आहे. 

मानपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाची प्रकृत्ती अचानक बिघडली, त्यामुळे शुक्रवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईंकानी धावपळ सुरु केली. शहरातील तीन चार खाजगी रुग्णालयात त्याला नेण्यात आले. परंतु या रुग्णालयांनी आधी कोरोनाचा रिपोर्ट आणा मगच दाखल करु असे सांगितले. शेवटी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेता नेता या रुग्णाचा रिक्षात त्यांचा मृत्यु झाला.

घोडबंदर भागातील एका व्यक्तीला मागील काही दिवस त्रस सुरु होता. त्यामुळे त्याने 1 जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली होती. परंतु जो र्पयत अहवाल येत नाही, तो र्पयत उपचार करता येणार नाहीत, असे त्याला सांगण्यात आले होते. याच कालावधीत शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे, त्याच्या नातेवाईंकानी आधी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. अहवाल आला असेल तरच अॅम्ब्युलेन्स दिली जाईल असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अखेर एका रिक्षावाल्याला विनंती केल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी धडपड सुरु झाली.

जवळ जवळ दोन तास शहरातील प्रतीथयश तीन ते चार रुग्णालयात त्याला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली. परंतु आधी कोरोनाचा अहवाल आणा मगच दाखल करु असे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्यांनी रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. परंतु रुग्णालयात जाईपर्यंतच रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु झाला. डॉक्टरांनी तपासले असता, त्याचा आधीच मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.

चार दिवसानंतरही कोरोनाचा अहवाल प्राप्त नाही

सदर रुग्णाने 1 जुलै रोजी कळवा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर चार दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आणि त्याचा मृत्यु झाल्यानंतरही अहवाल मात्र प्राप्त झालेला नाही. यामध्ये आता हा प्रशासनाचासुध्दा ढिसाळपणाच म्हणावा लागणार आहे.

रुग्णाच्या नातेवाईंकानाच मृतदेह प्लास्टीकमध्ये पॅक करावा लागला. सिव्हील रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला होता. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना 600 रुपये खर्च करुन प्लास्टीक रॅपर विकत घ्यावे लागले आणि तेथील कर्मचा:यांनी तुम्हालाचा मृतेदह पॅक करावा लागेल असे सांगितले. त्यानुसार नातेवाईकांमधील दोघांनी त्यांचा मृतदेह प्लास्टीकमध्ये पॅक केला.

अंत्यविधीसाठी लागले सहा तास ताटकळत

जवाहरबाग स्मशानभुमीतही अंत्यविधी करण्यासाठी जवळ जवळ सहा तासांचा कालावधी गेला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर जवाहरबाग स्मशानभुमीत नेण्यात आला. परंतु तेथे आधीच वेटींगवर 10 नंबर होते. त्यामुळे तेथे देखील त्यांना जवळ जवळ 6 तास ताटकळत उभे राहावे लागले होते. मागील कित्येक दिवसापासून इतर स्मशानभुमीतही ही व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही त्याकडे प्रशासनाने काही लक्ष दिलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे