शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

परवाना नसताना उभारले रस्ते अडवून मंडप; वाहतुकीला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 20:39 IST

या मंडपांना परवानगी नसताना पालिका आणि पोलीसांनी मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक रस्ते, पदपथ वर सर्रास मंडप, कमानी उभारल्या जातात . रस्त्यांवर खड्डे खोदुन बांबु उभारुन त्यावर रोषणाई , जाहिरात फलक लावले जातात.मीरा भाईंदरमध्ये पोलीस आणि महापालिका गणेशोत्सवाच्या निमीत्ताने सार्वजनिक मंडळं, लोकप्रतिनिधी आदिंच्या बैठक घेत आहे

मीरारोड - नागरीकांना रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरु नये तसेच आपत्कालिन वेळी रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सहज जावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्याच्या एक तृतियांश भागातच मंडप उभारणीस परवानगीचे आदेश दिले असताना मीरा भाईंदरमध्ये महापालिका, पोलीस यांच्या संगनमताने सर्रास रस्ते बंद करुन मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडपांना परवानगी नसताना पालिका आणि पोलीसांनी मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.मीरा भाईंदरमध्ये पोलीस आणि महापालिका गणेशोत्सवाच्या निमीत्ताने सार्वजनिक मंडळं, लोकप्रतिनिधी आदिंच्या बैठक घेत आहे. पण सदरच्या बैठका निव्वळ बैठका घेतल्याचे दाखवण्यासाठीचा फार्स ठेला आहे. वास्तविक रस्त्याच्या एक तृतियांश भागातच मंडपसाठी परवानगी देण्याचे उच्च न्यायालय व शासनाचे आदेश आहेत. तसेच कमानी उभारण्यास देखील मनाई आहे. तरी देखील सार्वजनिक रस्ते, पदपथ वर सर्रास मंडप, कमानी उभारल्या जातात . रस्त्यांवर खड्डे खोदुन बांबु उभारुन त्यावर रोषणाई , जाहिरात फलक लावले जातात.भार्इंदर पूर्वेचा जेसल पार्क, नवघर मार्ग, खारी गाव - व्यंकटेश नगर , भार्इंदर पश्चिमेचा विनायक नगर , मोदी पटेल , नारायण नगर, मीरारोड आदी शहरातील अनेक भागात रस्ते पूर्णपणे वा मंजुर रुंदी पेक्षा जास्त प्रमाणात बंद करून भले मोठे मंडप उभारण्यात आले आहेत .रस्ता बंद करुन उभारलेल्या मंडपां मुळे लोकांना पायी वाट काढणे अशक्य झाले आहे . तर अनेक ठिकाणी रस्त्यात प्रमाणा पेक्षा जास्त मंडप उभारण्यात आले आहेत. रस्ता पुर्णच बंद करुन मंडळांनी वाहतुक पुर्णपणे बंद केली गेली आहे. तर काही प्रमाणातच रस्ता खुला ठेवल्याने देखील वाहतुकीची कोंडी होत आहे. काही ठिकाणी तर रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन तर सोडाच चारचाकी कार देखील जाणार नाही अशी स्थिती आहे.महापालिका आणि पोलीसांची परवानगी नसतानाच असे रस्ता बंद करुन वा जास्त रस्ता व्यापुन मंडप उभारण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणी महापालिका प्रभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांनी मात्र या गंभीर बाबी कडे डोळेझाक चालवली आहे. आधी रस्ता अडवुन बेकायदा मंडप उभारणीस महापालिका व पोलीसांनी संरक्षण द्यायचे आणि मग मंडप आदी उभारुन झाले की मग मात्र कायदा सुव्यवस्थेचा मुदद्दा पुढे करुन कारवाई टाळायची असा फंडा यंत्रणेने अवलंबला आहे.अशा बेकायदा मंडप व कमानी उभणारणारयां विरोधात महापालिका गुन्हे देखील दाखल करत नाही. पोलीस सुध्दा कार्यवाही करत नाहीत. यामुळे आधीच शहरात वाहतुक कोंडी होऊन रहदारीला अडथळा होत असताना मंडप व कमानींमुळे त्यात मोठी भर पडून नागरीकांना मन:स्ताप सहन करावा लागतोय. इतकेच नव्हे तर नागरीकांची सुरक्षितता देखील पालिका, पोलीसांनी वारायावर सोडली आहे. 

मंडळांना आधीपासुन आदेशांचे काटेकोर पालन करा म्हणुन सांगितलेले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन केले जात नसेल आणि रस्ते बंद वा अडवुन मंडप उभारले गेले असतील तर याचा आढावा प्रभाग अधिकाऱ्यांकडून घेऊ. कोणत्याही स्थितीत बेकायदा मंडप खपवुन घेणार नाही, अशांवर कारवाई करु. - बालाजी खतगावकर ( आयुक्त, महापालिका ) 

टॅग्स :mira roadमीरा रोडMuncipal Corporationनगर पालिकाGanpati Festivalगणेशोत्सवTrafficवाहतूक कोंडी