शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

परवाना नसताना उभारले रस्ते अडवून मंडप; वाहतुकीला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 20:39 IST

या मंडपांना परवानगी नसताना पालिका आणि पोलीसांनी मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक रस्ते, पदपथ वर सर्रास मंडप, कमानी उभारल्या जातात . रस्त्यांवर खड्डे खोदुन बांबु उभारुन त्यावर रोषणाई , जाहिरात फलक लावले जातात.मीरा भाईंदरमध्ये पोलीस आणि महापालिका गणेशोत्सवाच्या निमीत्ताने सार्वजनिक मंडळं, लोकप्रतिनिधी आदिंच्या बैठक घेत आहे

मीरारोड - नागरीकांना रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरु नये तसेच आपत्कालिन वेळी रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सहज जावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्याच्या एक तृतियांश भागातच मंडप उभारणीस परवानगीचे आदेश दिले असताना मीरा भाईंदरमध्ये महापालिका, पोलीस यांच्या संगनमताने सर्रास रस्ते बंद करुन मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडपांना परवानगी नसताना पालिका आणि पोलीसांनी मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.मीरा भाईंदरमध्ये पोलीस आणि महापालिका गणेशोत्सवाच्या निमीत्ताने सार्वजनिक मंडळं, लोकप्रतिनिधी आदिंच्या बैठक घेत आहे. पण सदरच्या बैठका निव्वळ बैठका घेतल्याचे दाखवण्यासाठीचा फार्स ठेला आहे. वास्तविक रस्त्याच्या एक तृतियांश भागातच मंडपसाठी परवानगी देण्याचे उच्च न्यायालय व शासनाचे आदेश आहेत. तसेच कमानी उभारण्यास देखील मनाई आहे. तरी देखील सार्वजनिक रस्ते, पदपथ वर सर्रास मंडप, कमानी उभारल्या जातात . रस्त्यांवर खड्डे खोदुन बांबु उभारुन त्यावर रोषणाई , जाहिरात फलक लावले जातात.भार्इंदर पूर्वेचा जेसल पार्क, नवघर मार्ग, खारी गाव - व्यंकटेश नगर , भार्इंदर पश्चिमेचा विनायक नगर , मोदी पटेल , नारायण नगर, मीरारोड आदी शहरातील अनेक भागात रस्ते पूर्णपणे वा मंजुर रुंदी पेक्षा जास्त प्रमाणात बंद करून भले मोठे मंडप उभारण्यात आले आहेत .रस्ता बंद करुन उभारलेल्या मंडपां मुळे लोकांना पायी वाट काढणे अशक्य झाले आहे . तर अनेक ठिकाणी रस्त्यात प्रमाणा पेक्षा जास्त मंडप उभारण्यात आले आहेत. रस्ता पुर्णच बंद करुन मंडळांनी वाहतुक पुर्णपणे बंद केली गेली आहे. तर काही प्रमाणातच रस्ता खुला ठेवल्याने देखील वाहतुकीची कोंडी होत आहे. काही ठिकाणी तर रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन तर सोडाच चारचाकी कार देखील जाणार नाही अशी स्थिती आहे.महापालिका आणि पोलीसांची परवानगी नसतानाच असे रस्ता बंद करुन वा जास्त रस्ता व्यापुन मंडप उभारण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणी महापालिका प्रभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांनी मात्र या गंभीर बाबी कडे डोळेझाक चालवली आहे. आधी रस्ता अडवुन बेकायदा मंडप उभारणीस महापालिका व पोलीसांनी संरक्षण द्यायचे आणि मग मंडप आदी उभारुन झाले की मग मात्र कायदा सुव्यवस्थेचा मुदद्दा पुढे करुन कारवाई टाळायची असा फंडा यंत्रणेने अवलंबला आहे.अशा बेकायदा मंडप व कमानी उभणारणारयां विरोधात महापालिका गुन्हे देखील दाखल करत नाही. पोलीस सुध्दा कार्यवाही करत नाहीत. यामुळे आधीच शहरात वाहतुक कोंडी होऊन रहदारीला अडथळा होत असताना मंडप व कमानींमुळे त्यात मोठी भर पडून नागरीकांना मन:स्ताप सहन करावा लागतोय. इतकेच नव्हे तर नागरीकांची सुरक्षितता देखील पालिका, पोलीसांनी वारायावर सोडली आहे. 

मंडळांना आधीपासुन आदेशांचे काटेकोर पालन करा म्हणुन सांगितलेले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन केले जात नसेल आणि रस्ते बंद वा अडवुन मंडप उभारले गेले असतील तर याचा आढावा प्रभाग अधिकाऱ्यांकडून घेऊ. कोणत्याही स्थितीत बेकायदा मंडप खपवुन घेणार नाही, अशांवर कारवाई करु. - बालाजी खतगावकर ( आयुक्त, महापालिका ) 

टॅग्स :mira roadमीरा रोडMuncipal Corporationनगर पालिकाGanpati Festivalगणेशोत्सवTrafficवाहतूक कोंडी