शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
5
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
6
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
7
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
8
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
9
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
10
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
11
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
12
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
13
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
14
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
15
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
16
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
17
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
18
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
19
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
20
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

पाडाळे धरणग्रस्तांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, १६२ शेतकऱ्यांवर अन्याय, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 00:00 IST

धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत.

- श्याम राऊतमुरबाड : तालुक्यातील पाडाळे येथे भामखोर नदीवर ८० कोटी ७१ लाख खर्चून महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे विभागाने २०१३ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. तीन वर्षे त्यांच्या नशिबी शासनदरबारी हेलपाटे सुरूच आहे.आतापर्यंत त्यांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नाही. त्यामुळे या धरणाचे पाणीच ग्रामस्थांनी रोखून धरल्यामुळे या परिसराला सिंचनाचाही फायदा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आत्महत्येची वाट पाहत आहात का, असा सवाल करत शेतक-यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.सरळगाव परिसरातील पाडाळे, ठुणे, माजगाव, मानिवली, कान्हार्ले, कळंभे, तळवली, नांदगाव, नागाव, पारतळे, सरळगाव आणि नेवाळपाडा या गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. या धरणाला १९८३-८४ ला मान्यता मिळाली तेव्हा त्याचा अंदाजित खर्च एक कोटी ७२ लाख १४ हजार रुपये होता. या धरणाचे काम पूर्ण झाले तेव्हा या धरणाचा खर्च ८० कोटींहून अधिक रकमेवर पोहचला. टप्प्या-टप्प्यांमध्ये वाढ झालेल्या खर्चामुळे ठेकेदार मालामाल झाले, मात्र या धरणाच्या कालव्यांसाठी आपल्या उपजाऊ जमिनी देणारे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. तोंडी आश्वासन देऊ न कालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आल्या.मात्र काम पूर्ण झाले तरी त्याचा मोबदला मिळालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी संतप्त झाले असून तीन वर्षांपासून सतत अर्ज विनंत्या, उपोषण, अंदोलन करून थकले; पण भरपाई मिळालेली नाही.गेल्या वर्षी तहसील कार्यालयासमोर बाधित शेतकºयांनी बेमुदत उपोषण आंदोलन केले. तेव्हा आमदार किसन कथोरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.कथोरे यांनी शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई देण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला आदेश दिले; मात्र या आदेशांनाही केराची टोपलीच मिळाली आहे. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी व काँग्रेसचे तालुका चिटणीस गुरु नाथ पष्टे यांनी तहसीलदारांना दिला आहे. तर पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली की ११ कोटी रु पये मंजूर असून खाजगी वाटाघाटींद्वारे हा प्रश्न सोडवला जाईल, असे नेहमीच उत्तर दिले जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले....तर आत्महत्या करावी लागेल!शासनातर्फे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मुरबाडचे तत्कालीन तहसीलदारांनी दोन वर्षांपूर्वी १६२ शेतकºयांना कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांना वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मार्गावर शासन ढकलत असल्याचा आरोप मुरबाड तालुका काँग्रेसचे चिटणीस गुरुनाथ पष्टे यांनी केला आहे.पाडाळे धरणाचे कालव्यासाठी संपादित केलेल्या १६२ शेतकºयांचा प्रश्न खाजगी वाटाघाटीने सोडवला जाईल. यासाठी ११ कोटी रु पये मंजूर असून लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल.- नीलकमल गवई  (उपविभागीय अभियंता, पाडाळे धरण) 

टॅग्स :Damधरणmurbadमुरबाड