शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

पाडाळे धरणग्रस्तांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, १६२ शेतकऱ्यांवर अन्याय, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 00:00 IST

धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत.

- श्याम राऊतमुरबाड : तालुक्यातील पाडाळे येथे भामखोर नदीवर ८० कोटी ७१ लाख खर्चून महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे विभागाने २०१३ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. तीन वर्षे त्यांच्या नशिबी शासनदरबारी हेलपाटे सुरूच आहे.आतापर्यंत त्यांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नाही. त्यामुळे या धरणाचे पाणीच ग्रामस्थांनी रोखून धरल्यामुळे या परिसराला सिंचनाचाही फायदा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आत्महत्येची वाट पाहत आहात का, असा सवाल करत शेतक-यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.सरळगाव परिसरातील पाडाळे, ठुणे, माजगाव, मानिवली, कान्हार्ले, कळंभे, तळवली, नांदगाव, नागाव, पारतळे, सरळगाव आणि नेवाळपाडा या गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. या धरणाला १९८३-८४ ला मान्यता मिळाली तेव्हा त्याचा अंदाजित खर्च एक कोटी ७२ लाख १४ हजार रुपये होता. या धरणाचे काम पूर्ण झाले तेव्हा या धरणाचा खर्च ८० कोटींहून अधिक रकमेवर पोहचला. टप्प्या-टप्प्यांमध्ये वाढ झालेल्या खर्चामुळे ठेकेदार मालामाल झाले, मात्र या धरणाच्या कालव्यांसाठी आपल्या उपजाऊ जमिनी देणारे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. तोंडी आश्वासन देऊ न कालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आल्या.मात्र काम पूर्ण झाले तरी त्याचा मोबदला मिळालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी संतप्त झाले असून तीन वर्षांपासून सतत अर्ज विनंत्या, उपोषण, अंदोलन करून थकले; पण भरपाई मिळालेली नाही.गेल्या वर्षी तहसील कार्यालयासमोर बाधित शेतकºयांनी बेमुदत उपोषण आंदोलन केले. तेव्हा आमदार किसन कथोरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.कथोरे यांनी शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई देण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला आदेश दिले; मात्र या आदेशांनाही केराची टोपलीच मिळाली आहे. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी व काँग्रेसचे तालुका चिटणीस गुरु नाथ पष्टे यांनी तहसीलदारांना दिला आहे. तर पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली की ११ कोटी रु पये मंजूर असून खाजगी वाटाघाटींद्वारे हा प्रश्न सोडवला जाईल, असे नेहमीच उत्तर दिले जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले....तर आत्महत्या करावी लागेल!शासनातर्फे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मुरबाडचे तत्कालीन तहसीलदारांनी दोन वर्षांपूर्वी १६२ शेतकºयांना कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांना वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मार्गावर शासन ढकलत असल्याचा आरोप मुरबाड तालुका काँग्रेसचे चिटणीस गुरुनाथ पष्टे यांनी केला आहे.पाडाळे धरणाचे कालव्यासाठी संपादित केलेल्या १६२ शेतकºयांचा प्रश्न खाजगी वाटाघाटीने सोडवला जाईल. यासाठी ११ कोटी रु पये मंजूर असून लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल.- नीलकमल गवई  (उपविभागीय अभियंता, पाडाळे धरण) 

टॅग्स :Damधरणmurbadमुरबाड