शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ डिसेंबर २०२५: अचानक धनलाभाचा योग, प्रकृतीचा त्रास होणार
3
"६ महिन्यापासून पगार नाही, घर सांभाळणंही कठीण झालं..."; पाकिस्तानातील अधिकाऱ्याचा Video व्हायरल
4
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
5
इंडिगोचे अध्यक्ष मेहतांचा अखेर माफीनामा; म्हणे... चूक झाली, मनापासून माफी मागतो!
6
लोकशाहीच्या पायावरच प्रहार? मतदारयादीची विश्वसनीयता हाच निवडणूक प्रक्रियेचा मूलाधार
7
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
8
वैद्यकीय विश्वाच्या या विचित्र घुसमटीचं काय करावं?
9
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
10
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
11
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
12
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
13
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
14
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
15
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
16
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
17
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
18
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
19
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
20
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाडाळे धरणग्रस्तांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, १६२ शेतकऱ्यांवर अन्याय, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 00:00 IST

धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत.

- श्याम राऊतमुरबाड : तालुक्यातील पाडाळे येथे भामखोर नदीवर ८० कोटी ७१ लाख खर्चून महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे विभागाने २०१३ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. तीन वर्षे त्यांच्या नशिबी शासनदरबारी हेलपाटे सुरूच आहे.आतापर्यंत त्यांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नाही. त्यामुळे या धरणाचे पाणीच ग्रामस्थांनी रोखून धरल्यामुळे या परिसराला सिंचनाचाही फायदा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आत्महत्येची वाट पाहत आहात का, असा सवाल करत शेतक-यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.सरळगाव परिसरातील पाडाळे, ठुणे, माजगाव, मानिवली, कान्हार्ले, कळंभे, तळवली, नांदगाव, नागाव, पारतळे, सरळगाव आणि नेवाळपाडा या गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. या धरणाला १९८३-८४ ला मान्यता मिळाली तेव्हा त्याचा अंदाजित खर्च एक कोटी ७२ लाख १४ हजार रुपये होता. या धरणाचे काम पूर्ण झाले तेव्हा या धरणाचा खर्च ८० कोटींहून अधिक रकमेवर पोहचला. टप्प्या-टप्प्यांमध्ये वाढ झालेल्या खर्चामुळे ठेकेदार मालामाल झाले, मात्र या धरणाच्या कालव्यांसाठी आपल्या उपजाऊ जमिनी देणारे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. तोंडी आश्वासन देऊ न कालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आल्या.मात्र काम पूर्ण झाले तरी त्याचा मोबदला मिळालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी संतप्त झाले असून तीन वर्षांपासून सतत अर्ज विनंत्या, उपोषण, अंदोलन करून थकले; पण भरपाई मिळालेली नाही.गेल्या वर्षी तहसील कार्यालयासमोर बाधित शेतकºयांनी बेमुदत उपोषण आंदोलन केले. तेव्हा आमदार किसन कथोरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.कथोरे यांनी शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई देण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला आदेश दिले; मात्र या आदेशांनाही केराची टोपलीच मिळाली आहे. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी व काँग्रेसचे तालुका चिटणीस गुरु नाथ पष्टे यांनी तहसीलदारांना दिला आहे. तर पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली की ११ कोटी रु पये मंजूर असून खाजगी वाटाघाटींद्वारे हा प्रश्न सोडवला जाईल, असे नेहमीच उत्तर दिले जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले....तर आत्महत्या करावी लागेल!शासनातर्फे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मुरबाडचे तत्कालीन तहसीलदारांनी दोन वर्षांपूर्वी १६२ शेतकºयांना कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांना वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मार्गावर शासन ढकलत असल्याचा आरोप मुरबाड तालुका काँग्रेसचे चिटणीस गुरुनाथ पष्टे यांनी केला आहे.पाडाळे धरणाचे कालव्यासाठी संपादित केलेल्या १६२ शेतकºयांचा प्रश्न खाजगी वाटाघाटीने सोडवला जाईल. यासाठी ११ कोटी रु पये मंजूर असून लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल.- नीलकमल गवई  (उपविभागीय अभियंता, पाडाळे धरण) 

टॅग्स :Damधरणmurbadमुरबाड