शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

ठाण्यात दहा टक्केच रेस्टॉरंट्स, बार उघडले; संध्याकाळी ७ नंतरच्या बंदच्या आदेशाने हॉटेल्स व्यवसायिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 6:47 PM

Thane Newsअनलॉक च्या पाचव्या टप्प्यात  केंद्र व राज्य शासनाने अनेक व्यावसायिकांना सूटदिली आहे ,अखेर हॉटेल आणि बार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे .

 ठाणेहॉटेल्स, बार आणि रेस्टोरेंट ५० टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी,सात नंतरच खरा व्यवसाय असल्याने हॉटेल्स व्यवसायिकांकडून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी परवानगी देऊनही ठाण्यात सोमवारी १० टक्के सुद्धा रेस्टोरेंट आणि बार उघडले नव्हते. मार्चपासून या सर्व आस्थापना बंद असल्याने पुरेसा स्टाफ देखील उपलब्ध नाही , आहेत त्या स्टाफला पूर्ण पगार द्यावा लागलं असल्याने जर संध्याकाळी ७ नंतर हॉटेल्स बंद होणार असतील तर उघडण्यात तरी काय अर्थ आहे असा प्रश्न रेस्टोरेंट व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. 

अनलॉक च्या पाचव्या टप्प्यात  केंद्र व राज्य शासनाने अनेक व्यावसायिकांना सूटदिली आहे ,अखेर हॉटेल आणि बार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे . असे असले तरी केंद्र व राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना निर्णायक अधिकार दिले आहेत ,महापालिका अथवा नगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची व्याप्ती बघून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अखत्यारीत आवश्यक ते निर्णय घ्यायचे आहेत .ठाणे महापालिका क्षेत्रात हॉटेल आणि  रेस्टॉरंट बार सुरु करताना महापालिकेने काही आवश्यक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून हॉटेल व्यावसायिकांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे,अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार  आहे .ठाणे महापालिकेच्या निर्देशां नुसार व्यावसायिक आपल्या क्षमतेच्या  पन्नास टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी देऊ शकतात  तसेच संध्याकाळी सात च्या  आत हॉटेल ,रेस्टॉरंट बंद करणे आवश्यक आहे या निर्णया मुळे हॉटेल  व्यावसायिकां मध्ये नाराजी आहे ,संध्याकाळी सात च्य नंतर हॉटेल रेस्टॉरंट मध्ये ग्राहक येण्यास सुरवात होते असे असताना त्या वेळेत हॉटेलला टाळे कसे मारणार ? असा त्यांचा  प्रश्न  आहे .तसेच निर्धारित वेळेत बनवण्यात आलेले पदार्थ विकले न गेल्यास संध्याकाळी सात नंतर ते पदार्थ फेकून देण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच अवस्था होणार आहे.

दरम्यान हॉटेल रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बरेच हॉटेल व्यावसायिक सध्या लगेच व्यवासाय सुरु करण्याच्या मानसिकतेत नसून कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने त्यांच्या पुढे अडचणींचा डोंगर उभा आहे . मुख्य म्हणजे व्यवसायाला लागणारा  मोठ्या प्रमाणात  कुशल कर्मचारी वर्ग कुठून आणायचा हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. 

हॉटेल्स व्यवसायिकांनी हॉटेल्स केली बंद .... बरेचसे कर्मचारी परराज्यात आपल्या गावी परतले असल्याने त्यांना त्वरित कामावर बोलावणे शक्य होणार नसल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवणार आहे.कोरोना संक्रमण काळात वाढत चाललेला लॉकडाऊनचा कालावधी बघून भाडे तत्वावर असलेल्या हॉटेल मालकांनी भाडे भरण्या पेक्षा हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणे शहरात अनेक हॉटेल बंद झाली आहेत .  ठाणे शहरात हॉटेल रेस्टॉरंट व्यवसाय अनलॉक  असला तरी व्यवसाय पूर्वपदा येण्यास आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक देत आहेत. 

मॉलमधील आस्थापनांना मात्र रात्री ११ पर्यंतची वेळ ... शहरातील हॉटेल्स,बार आणि रेस्टोरेंटला एकीकडे ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंतच व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी दुसरीकडे मॉलमधील आस्थापनांना मात्र वेगळे नियम आहेत का ? असा प्रश्न हॉटेल्स व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. मॉल मधील काही आस्थापनांच्या वतीने रात्री ११ पर्यंत आस्थापना सुरु राहणार असल्याचे फलक लावण्यात आले असल्याची माहिती हॉटेल्स व्यवसायिकांनी दिली आहे. 

व्यवसाय करायचा कसा ?" एक तर मार्च पासून हॉटेल्स बंद आहेत त्यामुळे स्टाफ देखील पुरेसा नाही. याशिवाय संध्यकाळी ७ नंतरच ग्राहक येण्याची वेळ असल्याने यावेळीच जर हॉटेल्स बंद करायची आहेत तर मग कोणता व्यवसायिक हॉटेल्स उघडेल. त्यामुळे बहुतांश व्यवसायिकांनी हॉटेल्स न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात व्यवसायिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून किमान रात्री ९ पर्यंत तरी परवानगी द्यावी . - रत्नाकर शेट्टी, सदस्य, ठाणे हॉटेल्स ओनर्स असोशिएशन

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेलthaneठाणे