शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

टाउनशिपच्या मार्गात हरकतींचा ब्रेक, लेखी हमी हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:02 IST

केडीएमसीने सापाड व वाडेघर येथे विकास परियोजनेचा पहिला टप्पा राबवण्यासाठी सरकारतर्फे राजपत्रित अधिसूचना काढून हरकती, सूचना मागवल्या आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसीने सापाड व वाडेघर येथे विकास परियोजनेचा पहिला टप्पा राबवण्यासाठी सरकारतर्फे राजपत्रित अधिसूचना काढून हरकती, सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी महिनाभराचा कालावधी होता. हा कालावधी संपण्यापूर्वी सात दिवस आधी योजना समजून सांगितल्याने हरकती, सूचना घेण्यास कमी वेळ मिळाल्याचा मुद्दा सापाड व वाडेघर ग्रामस्थ मंडळाने मांडला होता. तसेच प्रकल्पात बाधित होणाऱ्यांना लेखी हमी दिल्याशिवाय ही योजना राबवू नये, अशी ५०० जणांच्या वतीने ग्रामस्थ मंडळाने एक संयुक्तिक हरकत घेतली आहे.महापालिकेने शहर नियोजन योजनेंतर्गत तयार केलेली विकास परियोजना सापाड व वाडेघर येथील २८४ हेक्टर जागेवर राबवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने राजपत्रित अधिसूचना काढून २५ डिसेंबर २०१९ ते २५ जानेवारी २०२० दरम्यान या प्रकल्पासाठी हरकती, सूचना मागविल्या आहेत. मात्र, सापाड-वाडेघर येथे ही योजना राबवण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना ग्रामस्थांना दिलेली नाही. राजपत्रित सूचना जाहीर झाल्यावर महापालिकेने थेट हरकती, सूचना मागविल्या. मात्र, योजना नेमकी काय आहे, याची माहिती हरकती, सूचना मागवण्यापूर्वी दिली असती, तर ग्रामस्थांना हरकती व सूचना चांगल्या प्रकारे मांडता आल्या असत्या, याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेने १८ जानेवारीला यासंदर्भातील माहिती ग्रामस्थांना दिल्यावर ग्रामस्थ मंडळाने ५०० जणांतर्फे हरकत घेतली आहे.सापाड व वाडेघर ही गावे ग्रामपंचायतींत असताना ती पालिकेत समाविष्ट केली गेली. त्यावेळची घरे महापालिकेत अधिकृत केलेली नाहीत. या योजनेचा मोबदला जागेच्या स्वरूपात मिळणार असेल, तर त्याची माहिती सातबाराधारक जमीनमालकांना दिलेली नाही. तसेच नोटिसा व पूर्वसूचना दिलेली नाही. पालिका हरकती, सूचना मागविण्याचा फार्स करणार असेल व त्यावर लवाद नेमण्याच्या तयारीत असेल, तर ही शुद्ध फसवणूक होऊ शकते. या योजनेसाठी जागा घेण्यापूर्वी किंवा त्या घेतल्यानंतर आमच्यासोबत मोबदल्याची चर्चा केली जाणार आहे का, असा संभ्रमही जागामालकांमध्ये आहे. योजनेसाठी २८४ हेक्टर जागा लागणार आहे. मात्र, तेथे शेतजमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच काही जमिनीवर गाव व वस्ती असल्याने तेथे घरे आहेत. या परिसराला स्मार्ट लूक देताना व नियोजनबद्धता आणण्यासाठी महापालिका कंत्राट देणार आहे. त्यात भूमिपुत्र व ज्यांची जमीन घेतली जाणार आहे, त्यांचा विचार झाला पाहिजे. या सगळ्या हरकतींसंदर्भात महापालिकेने ग्रामस्थ मंडळास लेखी हमी दिल्यास योजनेचा मार्ग पुढे खुला ठेवला जाईल, अन्यथा योजनेला विरोध करणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाने सांगितले. दरम्यान, ही हरकत ग्रामस्थांनी महापालिका आयुक्त, तहसीलदार, महापालिकेचे सहायक संचालक नगररचनाकार यांच्याकडे नोंदविली आहे. हरकती घेण्यासाठी अपुरा वेळ मिळाला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे १८ ते २५ जानेवारीदरम्यान किती हरकती आल्या, याची माहिती २५ जानेवारीनंतरच नगररचना विभागाकडून दिली जाणार आहे.ग्रोथ सेंटर होणार की गुंडाळणार?केडीएमसीत समाविष्ट केलेल्या २७ गावांमध्ये कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा सप्टेंबर २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठी एक हजार ८९ कोटी रुपये मंजूर केले होते. एक हजार ८९ हेक्टर जमिनीवर ग्रोथ सेंटर विकसित केले जाणार होते. ही योजना शहर नियोजन योजनेचीच होती. मात्र, त्याची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यालादेखील २७ गावांतील ग्रोथ सेंटरबाधित १० गावांसह सर्वपक्षीय संघर्ष समितीचा विरोध कायम आहे. आता राज्यात सरकार बदलले आहे. त्यामुळे भाजपच्या योजना मार्गी लागणार की गुंडाळल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका