शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना ना पाणी, ना खुर्च्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:28 IST

लसीकरण केंद्रांवर तिसऱ्या दिवशीही गोंधळ कायम : वयोवृद्धांच्या नशिबी गैरसोय कायम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : लसीकरणाच्या तिसऱ्या  दिवशीही पालिकेच्या अनेक केंद्रांवर गोंधळ दिसून आला. पोस्ट कोविड सेंटर, बाळकुम येथील कोविड सेंटर, मनोरमानगर, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील केंद्रासह इतर केंद्रांवर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या नसणे, वारंवार सर्व्हर डाउन होणे, पिण्यास पाणी उपलब्ध नसणे, असा सावळागोंधळ होता. त्यामुळे सलग तिसऱ्या  दिवशी लसीकरणाकरिता आलेल्या ज्येष्ठांना त्रासाला सामोरे जावे लागले.ठाणे  महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, महापालिकेने शहरातील १५ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी या केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी या केंद्रांवर सुमारे एक हजारांच्या आसपास ज्येष्ठांचे लसीकरण झाले. तिसऱ्या दिवशीदेखील अनेक केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसह दुसरा डोस घेणाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गोंधळ उडाला होता. पोस्ट कोविड सेंटर येथे वेळेआधीच ज्येष्ठांनी रांग लावली होती. त्यांना बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या. त्यामुळे ते ताटकळल्याचे दिसून आले. अर्ध्या तासानंतर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व्हर वरचेवर डाउन झाल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती दादोजी कोंडदेव येथील केंद्रावर होती. तेथेही ज्येष्ठांना नाना समस्यांना सामोरे जावे लागले. बसण्यासाठी खुर्च्या नसणे, उन्हाच्या झळांचा त्रास सुरू झालेला असताना पिण्यास स्वच्छ पाणी नसणे, या समस्यांमुळे ज्येष्ठांनी तीव्र नाराजी प्रकट केली. या संदर्भात जगदीश खैरालिया यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून तक्रार केल्यावर खुर्च्या आणि पाण्याची व्यवस्था केली गेली. मनोरमानगर केंद्रावर सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व्हर डाउन असल्याने सकाळपासून आलेल्या ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागला. ॲप वारंवार डाउन होत असल्याने आपला नंबर केव्हा लागणार, अशी विचारणा ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात होती.

नव्या वर्षात सापडले सर्वाधिक ८१८ रुग्णलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण  आढळले.  यामुळे जिल्ह्यात आता २ लाख ६७ हजार ९१० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा जण दगावल्याने मृतांची संख्या ६ हजार २८६ झाली आहे.   ठाणे शहर परिसरात २३५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६२ हजार ८८८ झाली. शहरात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या १ हजार ३९० वर गेली. कल्याण-डोंबिवलीत २४२ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत १५३ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूसंख्या दोन आहे. उल्हासनगरमध्ये २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. भिवंडीत दोन बाधित असून एकही मृत्यूची नोंद नाही.  मीरा-भाईंदरमध्ये ६९ रुग्ण आढळले. अंबरनाथमध्ये २२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ३९ रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहेत.