शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

डोंबिवलीच्या एमआयडीसीतून वायू प्रदूषण झालेले नाही; ‘कामा’चा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:39 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी

डोंबिवली : शहरातील एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे झालेल्या वायू प्रदूषणामुळेडोंबिवलीकरांची झोप उडाली होती. प्रदूषण नियंत्रण महामंडळावर त्यांनी कडाडून टीका केली. त्यामुळे दुर्गंधी कुठून आली, कुठे गॅस गळती झाली का? याची पाहणी कारखानदारांच्या कामा संघटना व प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी एमआयडीसी परिसरात सर्वत्र केली. परंतु, त्यांना दोष सापडला नाही. त्यामुळे वायू प्रदूषण अन्य ठिकाणी झाले असावे व वाºयामुळे येथे त्याचा प्रभाव सर्वाधिक जाणवला असावा, अशी शक्यता असल्याचा दावा ‘कामा’चे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसमवेत आम्ही बुधवारी रात्री उशिरापर्यंत आणि गुरुवारी सकाळी व दुपारी काही वेळ ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली येथील नाले, एमआयडीसीच्या कंपन्या, तसेच जेथून नाल्याद्वारे पाणी सोडले जाते अशा सर्व ठिकाणी पाहणी केली. पण आम्हाला कुठेही दुर्गंधी, उग्र दर्प वा घाण आढळून आली नाही, असे सोनी यांनी सांगितले. तर, बुधवारच्या घटनेपासून आम्ही टप्याटप्प्याने सर्वत्र पाहणी करत आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाचे अधिकारी संजय भोसले यांनी सांगितले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्याच एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, समुद्र असो किंवा खाडीच्या पाण्यात भरती-आहोटी ही प्रक्रिया सतत सुरूच असते. त्यात डोंबिवलीच्या खाडीमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, तसेच कल्याण आदी भागातून सर्वच प्रकारचे पाणी येत असते. जेव्हा एमआयडीसीतील कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर जे खाडीत सोडण्यात येते, त्या पाण्यातील काही भाग ओहोटीच्या वेळी त्या गाळामध्ये अडकतो. त्यामुळे त्या गाळाचा जेव्हा थंडी, ऊन अशा वातावरणातील बदलांशी संपर्क येतो त्यावेळी त्यातून दुर्गंधी अथवा गॅस बाहेर पडण्याची शक्यता असते. विशेषत: थंडीच्या दिवसांमध्ये असा उग्र दर्प येण्याची दाट शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. तसाच काहीसा प्रकार बुधवारच्या घटनेत झाला असावा, त्यामुळेच कधी नव्हे तो ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गाने जाणाºया प्रवाशांनाही त्याचा त्रास झाल्याचा दावाही मंडळाकडून करण्यात आला.

रसायनमिश्रित पाणी थेट उघड्या नाल्यात

कल्याण-शीळ रस्त्यावरील सुयोग हॉटेल ते नंदी पॅलेसदरम्यानच्या गटारात एमआयडीसीमधील कंपन्यांमधून गुरुवारीही रसायनमिश्रित काळे पाणी सर्रासपणे उघड्या नाल्यात वाहत होते.

एमआयडीसीतील रहिवासी, दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्रपणे पाहणी केली असता त्यांच्यात ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने फोटो, व्हिडीओ काढून सोशल मीडियावर नागरिकांना सतर्क केले.ते म्हणाले की, निळे, काळे रसायनमिश्रित पाणी गटारात सोडण्यात आले होते. त्यामुळे रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी उघड्यावर सोडू नये, असा नियम असतानाही तो सर्रास धाब्यावर बसवला गेल्याने कंपनीचालकांवर प्रदूषण मंडळाचा वचक नाही हे स्पष्ट झाले. दरम्यान, हे फोटो संबंधित अधिकाºयांनाही पाठवले आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसीdombivaliडोंबिवलीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण