शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या एमआयडीसीतून वायू प्रदूषण झालेले नाही; ‘कामा’चा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:39 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी

डोंबिवली : शहरातील एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे झालेल्या वायू प्रदूषणामुळेडोंबिवलीकरांची झोप उडाली होती. प्रदूषण नियंत्रण महामंडळावर त्यांनी कडाडून टीका केली. त्यामुळे दुर्गंधी कुठून आली, कुठे गॅस गळती झाली का? याची पाहणी कारखानदारांच्या कामा संघटना व प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी एमआयडीसी परिसरात सर्वत्र केली. परंतु, त्यांना दोष सापडला नाही. त्यामुळे वायू प्रदूषण अन्य ठिकाणी झाले असावे व वाºयामुळे येथे त्याचा प्रभाव सर्वाधिक जाणवला असावा, अशी शक्यता असल्याचा दावा ‘कामा’चे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसमवेत आम्ही बुधवारी रात्री उशिरापर्यंत आणि गुरुवारी सकाळी व दुपारी काही वेळ ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली येथील नाले, एमआयडीसीच्या कंपन्या, तसेच जेथून नाल्याद्वारे पाणी सोडले जाते अशा सर्व ठिकाणी पाहणी केली. पण आम्हाला कुठेही दुर्गंधी, उग्र दर्प वा घाण आढळून आली नाही, असे सोनी यांनी सांगितले. तर, बुधवारच्या घटनेपासून आम्ही टप्याटप्प्याने सर्वत्र पाहणी करत आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाचे अधिकारी संजय भोसले यांनी सांगितले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्याच एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, समुद्र असो किंवा खाडीच्या पाण्यात भरती-आहोटी ही प्रक्रिया सतत सुरूच असते. त्यात डोंबिवलीच्या खाडीमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, तसेच कल्याण आदी भागातून सर्वच प्रकारचे पाणी येत असते. जेव्हा एमआयडीसीतील कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर जे खाडीत सोडण्यात येते, त्या पाण्यातील काही भाग ओहोटीच्या वेळी त्या गाळामध्ये अडकतो. त्यामुळे त्या गाळाचा जेव्हा थंडी, ऊन अशा वातावरणातील बदलांशी संपर्क येतो त्यावेळी त्यातून दुर्गंधी अथवा गॅस बाहेर पडण्याची शक्यता असते. विशेषत: थंडीच्या दिवसांमध्ये असा उग्र दर्प येण्याची दाट शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. तसाच काहीसा प्रकार बुधवारच्या घटनेत झाला असावा, त्यामुळेच कधी नव्हे तो ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गाने जाणाºया प्रवाशांनाही त्याचा त्रास झाल्याचा दावाही मंडळाकडून करण्यात आला.

रसायनमिश्रित पाणी थेट उघड्या नाल्यात

कल्याण-शीळ रस्त्यावरील सुयोग हॉटेल ते नंदी पॅलेसदरम्यानच्या गटारात एमआयडीसीमधील कंपन्यांमधून गुरुवारीही रसायनमिश्रित काळे पाणी सर्रासपणे उघड्या नाल्यात वाहत होते.

एमआयडीसीतील रहिवासी, दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्रपणे पाहणी केली असता त्यांच्यात ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने फोटो, व्हिडीओ काढून सोशल मीडियावर नागरिकांना सतर्क केले.ते म्हणाले की, निळे, काळे रसायनमिश्रित पाणी गटारात सोडण्यात आले होते. त्यामुळे रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी उघड्यावर सोडू नये, असा नियम असतानाही तो सर्रास धाब्यावर बसवला गेल्याने कंपनीचालकांवर प्रदूषण मंडळाचा वचक नाही हे स्पष्ट झाले. दरम्यान, हे फोटो संबंधित अधिकाºयांनाही पाठवले आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसीdombivaliडोंबिवलीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण