शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

डोंबिवलीच्या एमआयडीसीतून वायू प्रदूषण झालेले नाही; ‘कामा’चा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:39 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी

डोंबिवली : शहरातील एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे झालेल्या वायू प्रदूषणामुळेडोंबिवलीकरांची झोप उडाली होती. प्रदूषण नियंत्रण महामंडळावर त्यांनी कडाडून टीका केली. त्यामुळे दुर्गंधी कुठून आली, कुठे गॅस गळती झाली का? याची पाहणी कारखानदारांच्या कामा संघटना व प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी एमआयडीसी परिसरात सर्वत्र केली. परंतु, त्यांना दोष सापडला नाही. त्यामुळे वायू प्रदूषण अन्य ठिकाणी झाले असावे व वाºयामुळे येथे त्याचा प्रभाव सर्वाधिक जाणवला असावा, अशी शक्यता असल्याचा दावा ‘कामा’चे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसमवेत आम्ही बुधवारी रात्री उशिरापर्यंत आणि गुरुवारी सकाळी व दुपारी काही वेळ ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली येथील नाले, एमआयडीसीच्या कंपन्या, तसेच जेथून नाल्याद्वारे पाणी सोडले जाते अशा सर्व ठिकाणी पाहणी केली. पण आम्हाला कुठेही दुर्गंधी, उग्र दर्प वा घाण आढळून आली नाही, असे सोनी यांनी सांगितले. तर, बुधवारच्या घटनेपासून आम्ही टप्याटप्प्याने सर्वत्र पाहणी करत आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाचे अधिकारी संजय भोसले यांनी सांगितले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्याच एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, समुद्र असो किंवा खाडीच्या पाण्यात भरती-आहोटी ही प्रक्रिया सतत सुरूच असते. त्यात डोंबिवलीच्या खाडीमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, तसेच कल्याण आदी भागातून सर्वच प्रकारचे पाणी येत असते. जेव्हा एमआयडीसीतील कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर जे खाडीत सोडण्यात येते, त्या पाण्यातील काही भाग ओहोटीच्या वेळी त्या गाळामध्ये अडकतो. त्यामुळे त्या गाळाचा जेव्हा थंडी, ऊन अशा वातावरणातील बदलांशी संपर्क येतो त्यावेळी त्यातून दुर्गंधी अथवा गॅस बाहेर पडण्याची शक्यता असते. विशेषत: थंडीच्या दिवसांमध्ये असा उग्र दर्प येण्याची दाट शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. तसाच काहीसा प्रकार बुधवारच्या घटनेत झाला असावा, त्यामुळेच कधी नव्हे तो ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गाने जाणाºया प्रवाशांनाही त्याचा त्रास झाल्याचा दावाही मंडळाकडून करण्यात आला.

रसायनमिश्रित पाणी थेट उघड्या नाल्यात

कल्याण-शीळ रस्त्यावरील सुयोग हॉटेल ते नंदी पॅलेसदरम्यानच्या गटारात एमआयडीसीमधील कंपन्यांमधून गुरुवारीही रसायनमिश्रित काळे पाणी सर्रासपणे उघड्या नाल्यात वाहत होते.

एमआयडीसीतील रहिवासी, दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्रपणे पाहणी केली असता त्यांच्यात ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने फोटो, व्हिडीओ काढून सोशल मीडियावर नागरिकांना सतर्क केले.ते म्हणाले की, निळे, काळे रसायनमिश्रित पाणी गटारात सोडण्यात आले होते. त्यामुळे रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी उघड्यावर सोडू नये, असा नियम असतानाही तो सर्रास धाब्यावर बसवला गेल्याने कंपनीचालकांवर प्रदूषण मंडळाचा वचक नाही हे स्पष्ट झाले. दरम्यान, हे फोटो संबंधित अधिकाºयांनाही पाठवले आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसीdombivaliडोंबिवलीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण