शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

वाणांमधील नैवेद्याने गरिबांचे तोंड गोड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:58 AM

वटपौर्णिमेला अनोखा उपक्रम; फळे, पुरणपोळ्यांचे केले वाटप

टिटवाळा : ‘सोशल बार्बर’ अशी ओळख असलेल्या रवींद्र बिरारी यांनी तीन वर्षांपासून टिटवाळा परिसरात वटपौर्णिमेला अनोखा उपक्रम राबवत आहेत. वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या महिला वडाच्या झाडाला वाण वाहतात. त्यामध्ये आंबा, फणसाचे गरे, केळी अशी विविध फळे असतात. हे वाण जमा करून गरीब त्यांनी गरीब वस्तीतील मुलांना वाटले. या वर्षी त्यांच्या या उपक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. यंदा ४२ महिलांनी दिलेल्या वाणांतून १७५ पुरणपोळ्या जमा झाल्याचे बिरारी यांनी सांगितले.वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाला वाहत असलेली फळे, अन्नपदार्थांची नासाडी होते. एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरजूंना हे अन्न मिळाले तर त्यांची पोटाची भूक भागेल आणि नासाडीही टळेल, या विचारातून बिरारी यांना ही कल्पना सुचली. श्रद्धेला कुठेही धक्का न लावता त्यांनी सतीचे वाण दान करण्याची ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी त्यांनी महिलांना यामागचा उद्देश पटवून दिला. अनेक महिलांना त्यांचा हा उपक्रम आवडला असून त्यांनी आपल्या मैत्रिणींनाही याबाबत सहकार्याचे आवाहन केले. त्यामुळे दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे.केशकर्तन हा बिरारी यांचा व्यवसाय आहे; मात्र हा व्यवसाय त्यांनी स्वत:पुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक कार्याची जोड दिली आहे. रेल्वे स्टेशनवर राहणारे अपंग, निराधार वृद्ध आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींची ते केस, दाढी मोफत करतात. मनोरुग्णांनी काही वेळा त्यांच्यावर हल्ले केले. अनेकदा त्यांना संसर्ग होऊ न ते आजारीही पडले. मात्र तरीही त्यांनी या समाजसेवेत कधीच खंड पडू दिला नाही. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊ न एका कंपनीने ‘द सोशल बार्बर’ हा लघुपट बनवला आहे. मदत ही पैशानेच करता येते असे नाही. तुमचा उद्देश प्रामाणिक असेल तर आपल्याकडे जे आहे, त्यातूनही अनेकांना समाधान देऊ शकतो, अशी भावना बिरारी यांनी व्यक्त केली.