शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आयुक्त जयस्वाल यांच्याबाबत राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:21 IST

आ. आव्हाड यांचे पाठिंब्याचे पत्र; शहर राष्ट्रवादीकडून आरोप, आंदोलने

ठाणे : ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून लक्ष्य करत असताना त्याच पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दुटप्पी भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीमधील बेबनावाचा हा परिपाक आहे की, संभ्रम निर्माण करण्याची खेळी आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.दोन ते तीन महिन्यांपासून ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असून त्यामागे राष्ट्रवादीचा मोठा वाटा राहिला आहे. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शहरातील थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी मुल्ला आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली होती. त्यानंतर, २६ आॅक्टोबर रोजी या थीम पार्कचा पाहणी दौरा करून यामध्ये १०० टक्के भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. हिरानंदानी इस्टेट भागातील मलनि:सारण प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावावरूनही याच महासभेत मुल्ला आणि पाटील यांनी आवाज उठवला होता. २५ आॅक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते पाटील आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा ३० एकरांचा भूखंड ताब्यात घेण्याची मागणी करत सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता. २० आॅक्टोबरच्या महासभेत परिवहनसेवेमार्फत १५० बसेस दुरुस्तीचा प्रस्ताव होता. या प्रस्तावानुसार बसगाड्या दुरुस्त करून त्या जीसीसी तत्त्वावर खाजगी ठेकेदाराला चालवण्यासाठी दिल्या जाणार आहेत. यातून ठेकेदाराला पुढील पाच वर्षांत ४५७ कोटींचा नफा होणार आहे. याला विरोध करत त्याविरोधात आवाज फोडण्याचे कामही मुल्ला यांनी केले होते. त्यानंतर, याच भ्रष्टाचाराविरोधात २२ आॅक्टोबर रोजी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी वागळे आगारात आंदोलन केले होते.दरम्यान, एखादा प्रस्ताव तयार करत असताना तो सत्ताधाºयांच्या माध्यमातून किंवा प्रशासन स्वत: पटलावर आणत असतो. त्यामुळे यात दोघेही तसे दोषी आहेत. एकीकडे राष्टÑवादीतील ही मंडळी आंदोलन करत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचले जात असून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. यामध्ये सामाजिक व्यक्तींबरोबर काही राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. साहजिकच, आव्हाड यांचा रोख स्वपक्षीय मंडळींकडे आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.राष्ट्रवादीत आयुक्तांवरून मतमतांतरेशहर विकासाच्या दृष्टीने संजीव जयस्वाल यांनी चांगली कामे केली आहेत. त्यामुळेच हा पत्रव्यवहार केला. आंदोलनाला माझा कोणताही विरोध नाही. परंतु, आयुक्तांनी विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. - जितेंद्र आव्हाड,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसविकासाच्या मुद्यावर आम्ही सर्व आयुक्तांच्या बाजूने आहोत. परंतु, इतर विषयांवर काहीही भाष्य करू शकत नाही.- मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेते, ठामपाआयुक्त संजीव जयस्वाल हे नसतानासुद्धा शहराचा विकास झालेला आहे. ते गेल्यानंतरही शहराचा विकास होणारच आहे. जयस्वाल हे जरी स्वच्छ प्रतिमेचे असले तरीसुद्धा त्यांच्या हाताखालील अधिकाºयांकडून जो भ्रष्टाचार झालेला आहे, तो रोखण्यात अपयशी कोण ठरले, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.- आनंद परांजपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड