शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

आयुक्त जयस्वाल यांच्याबाबत राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:21 IST

आ. आव्हाड यांचे पाठिंब्याचे पत्र; शहर राष्ट्रवादीकडून आरोप, आंदोलने

ठाणे : ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून लक्ष्य करत असताना त्याच पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दुटप्पी भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीमधील बेबनावाचा हा परिपाक आहे की, संभ्रम निर्माण करण्याची खेळी आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.दोन ते तीन महिन्यांपासून ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असून त्यामागे राष्ट्रवादीचा मोठा वाटा राहिला आहे. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शहरातील थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी मुल्ला आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली होती. त्यानंतर, २६ आॅक्टोबर रोजी या थीम पार्कचा पाहणी दौरा करून यामध्ये १०० टक्के भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. हिरानंदानी इस्टेट भागातील मलनि:सारण प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावावरूनही याच महासभेत मुल्ला आणि पाटील यांनी आवाज उठवला होता. २५ आॅक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते पाटील आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा ३० एकरांचा भूखंड ताब्यात घेण्याची मागणी करत सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता. २० आॅक्टोबरच्या महासभेत परिवहनसेवेमार्फत १५० बसेस दुरुस्तीचा प्रस्ताव होता. या प्रस्तावानुसार बसगाड्या दुरुस्त करून त्या जीसीसी तत्त्वावर खाजगी ठेकेदाराला चालवण्यासाठी दिल्या जाणार आहेत. यातून ठेकेदाराला पुढील पाच वर्षांत ४५७ कोटींचा नफा होणार आहे. याला विरोध करत त्याविरोधात आवाज फोडण्याचे कामही मुल्ला यांनी केले होते. त्यानंतर, याच भ्रष्टाचाराविरोधात २२ आॅक्टोबर रोजी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी वागळे आगारात आंदोलन केले होते.दरम्यान, एखादा प्रस्ताव तयार करत असताना तो सत्ताधाºयांच्या माध्यमातून किंवा प्रशासन स्वत: पटलावर आणत असतो. त्यामुळे यात दोघेही तसे दोषी आहेत. एकीकडे राष्टÑवादीतील ही मंडळी आंदोलन करत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचले जात असून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. यामध्ये सामाजिक व्यक्तींबरोबर काही राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. साहजिकच, आव्हाड यांचा रोख स्वपक्षीय मंडळींकडे आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.राष्ट्रवादीत आयुक्तांवरून मतमतांतरेशहर विकासाच्या दृष्टीने संजीव जयस्वाल यांनी चांगली कामे केली आहेत. त्यामुळेच हा पत्रव्यवहार केला. आंदोलनाला माझा कोणताही विरोध नाही. परंतु, आयुक्तांनी विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. - जितेंद्र आव्हाड,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसविकासाच्या मुद्यावर आम्ही सर्व आयुक्तांच्या बाजूने आहोत. परंतु, इतर विषयांवर काहीही भाष्य करू शकत नाही.- मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेते, ठामपाआयुक्त संजीव जयस्वाल हे नसतानासुद्धा शहराचा विकास झालेला आहे. ते गेल्यानंतरही शहराचा विकास होणारच आहे. जयस्वाल हे जरी स्वच्छ प्रतिमेचे असले तरीसुद्धा त्यांच्या हाताखालील अधिकाºयांकडून जो भ्रष्टाचार झालेला आहे, तो रोखण्यात अपयशी कोण ठरले, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.- आनंद परांजपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड