शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो पाचची साधी निविदा प्रक्रियाही नसतांना भुमीपुजनचा घाट कशासाठी, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:09 IST

मेट्रो पाचच्या भुमीपुजनाचा वाद आणखी वाढला असून, या वादात आता राष्ट्रवादीने सुध्दा उडली घेतली आहे. या मेट्रोची अलायमेंटच चुकीची झाली असल्याचा दावा ठाणे शहर राष्ट्रवादीने केला असून मेट्रोचा मार्ग केवळ भाजपाच्या खासदारासाठीच वळविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमतदारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे कामकेवळ भाजपाच्याच खासदारासाठीच मेट्रो पाचच अट्टाहास

ठाणे - मेट्रो पाचचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. परंतु या मेट्रोची साधी निविदा प्रक्रियाही सुरु झालेली नाही, त्याबाबत अद्याप अंतिम धोरण निश्चित झाले नसतांना त्याचे भुमीपुजन कसे काय असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर मेट्रोची अलायमेंट ही वास्तविक पाहता, कळवा, मुंब्रा, शीळ, डोंबिवली, कल्याण एपीएमसी अशी असणे अपेक्षित असतांना भिवंडी मधून करण्यात आलेली अलायमेंट ही केवळ भाजपाच्या खासदारासाठीच करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.                             एकीकडे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भुमीपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला येत असतांना, दुसरीकडे कळवा आणि मुंब्रा वासियांवर अन्याय का? अशा आशयाचे फलक लागले असतांना या मेट्रो पाचच्या मार्गाची अलायमेंटच चुकीच्या पध्दतीने झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. या संदर्भात यापूर्वी सुध्दा संबधींताबरोबर चर्चा झाली होती. मेट्रो पाचच्या सध्याच्या मार्गाने केवळ २ लाख २९ हजार प्रवासीच प्रवास करु शकणार आहेत. परंतु हीच मेट्रो जर कापुरबावडी वरुन पुढे कळवा, मुंब्रा, शिळ, डोंबिवली मार्गे कल्याण एपीएमसी मार्केटला नेली असती तर त्याचा फायदा मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुध्दा झाला असता. परंतु ज्या ठिकाणी प्रवासी नाहीत, त्याठिकाणाहून ही मेट्रो नेली जात असल्याचा आरोप परांजपे यांनी केला आहे. केवळ भाजपाच्या खासदारासाठीच मेट्रोचा मार्ग हा उलट्या दिशेने आखला गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपाचा डाव - जितेंद्र आव्हाडहा मार्ग उलट्या दिशेने फिरविणे म्हणजे भाजपाने एक प्रकारे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाच केलेला हा प्रयत्न म्हणावा लागणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला लगावला. या गोष्टीकडे पालकमंत्री तसेच कल्याणच्या खासदारांनी लक्ष घालायला हवे होते. परंतु त्यांना सुध्दा ही गोष्ट कशी कळली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला जर याचा अभ्यास नसेल तर मतभेद विसरुन परांजपे यांच्याकडून अधिक अभ्यास करुन घ्यावा असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे या मेट्रोचे मोनो होणार असून केवळ लॉस देणारी ही मेट्रो ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भुमीपुजन करतांना किमान निविदा प्रक्रिया तरी पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु ते न करता केवळ मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा भाजपाने केलेला हा केवीलवाना प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Metroमेट्रोtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड