शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

मेट्रो पाचची साधी निविदा प्रक्रियाही नसतांना भुमीपुजनचा घाट कशासाठी, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:09 IST

मेट्रो पाचच्या भुमीपुजनाचा वाद आणखी वाढला असून, या वादात आता राष्ट्रवादीने सुध्दा उडली घेतली आहे. या मेट्रोची अलायमेंटच चुकीची झाली असल्याचा दावा ठाणे शहर राष्ट्रवादीने केला असून मेट्रोचा मार्ग केवळ भाजपाच्या खासदारासाठीच वळविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमतदारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे कामकेवळ भाजपाच्याच खासदारासाठीच मेट्रो पाचच अट्टाहास

ठाणे - मेट्रो पाचचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. परंतु या मेट्रोची साधी निविदा प्रक्रियाही सुरु झालेली नाही, त्याबाबत अद्याप अंतिम धोरण निश्चित झाले नसतांना त्याचे भुमीपुजन कसे काय असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर मेट्रोची अलायमेंट ही वास्तविक पाहता, कळवा, मुंब्रा, शीळ, डोंबिवली, कल्याण एपीएमसी अशी असणे अपेक्षित असतांना भिवंडी मधून करण्यात आलेली अलायमेंट ही केवळ भाजपाच्या खासदारासाठीच करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.                             एकीकडे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भुमीपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला येत असतांना, दुसरीकडे कळवा आणि मुंब्रा वासियांवर अन्याय का? अशा आशयाचे फलक लागले असतांना या मेट्रो पाचच्या मार्गाची अलायमेंटच चुकीच्या पध्दतीने झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. या संदर्भात यापूर्वी सुध्दा संबधींताबरोबर चर्चा झाली होती. मेट्रो पाचच्या सध्याच्या मार्गाने केवळ २ लाख २९ हजार प्रवासीच प्रवास करु शकणार आहेत. परंतु हीच मेट्रो जर कापुरबावडी वरुन पुढे कळवा, मुंब्रा, शिळ, डोंबिवली मार्गे कल्याण एपीएमसी मार्केटला नेली असती तर त्याचा फायदा मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुध्दा झाला असता. परंतु ज्या ठिकाणी प्रवासी नाहीत, त्याठिकाणाहून ही मेट्रो नेली जात असल्याचा आरोप परांजपे यांनी केला आहे. केवळ भाजपाच्या खासदारासाठीच मेट्रोचा मार्ग हा उलट्या दिशेने आखला गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपाचा डाव - जितेंद्र आव्हाडहा मार्ग उलट्या दिशेने फिरविणे म्हणजे भाजपाने एक प्रकारे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाच केलेला हा प्रयत्न म्हणावा लागणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला लगावला. या गोष्टीकडे पालकमंत्री तसेच कल्याणच्या खासदारांनी लक्ष घालायला हवे होते. परंतु त्यांना सुध्दा ही गोष्ट कशी कळली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला जर याचा अभ्यास नसेल तर मतभेद विसरुन परांजपे यांच्याकडून अधिक अभ्यास करुन घ्यावा असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे या मेट्रोचे मोनो होणार असून केवळ लॉस देणारी ही मेट्रो ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भुमीपुजन करतांना किमान निविदा प्रक्रिया तरी पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु ते न करता केवळ मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा भाजपाने केलेला हा केवीलवाना प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Metroमेट्रोtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड