शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शिवाजी पार्कवर शरद पवार अन् सोनिया गांधींचे विचार ऐकायला मिळतील- रामदास कदम

By अजित मांडके | Updated: October 3, 2022 23:41 IST

मराठी न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना मराठी माणसांमध्येच फूट पाडण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्याचे मला दुःख असल्याचे रामदास कदम म्हणाले.

ठाणे : दसरा मेळाव्यात प्रचंड लोक येतील लोकांना उत्सुकता आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुत्वांचे विचार या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी कसे ऐकायला मिळतील, शिवसेनेची उत्सुकता लोकांची उत्सुकता नक्कीच असेल बीकेसी वरतीच हिंदुत्वाचे विचार ऐकायला मिळतील शिवाजी पार्कवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विचार ऐकायला मिळतील ही मोठी तफावत आहे. शिवाजी पार्कवरती हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी बाळासाहेबांचे एक मैदान एक विचार एक नेता एक झेंडा अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र यंदा एक वेगळी विसंगती असेल असेल असे मत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केले. सोमवारी रात्रि उशिरा कदम यानी देखील टेभी नाका देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहून दर्शन घेतले.

देवीचे दर्शन घेतलं समाधान झालं एवढेच मागणं केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आई चांगली ताकद दे, उदंड आयुष्य दे चांगली शक्ती दे, ज्या पद्धतीने महाराष्ट्र हिताचे जे ते निर्णय घेत आहे तसे भविष्यात देखील चांगले निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी होऊ दे. चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हित घडवणारा चांगला मुख्यमंत्री मिळाला हा संदेश सर्व देशात जाऊन दे अशी मागणी मी आईकडे केली असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना नेमकी कोणाची हे ज्योतिषाकडे बघण्याची आवश्यकता नाही ते अतिशय स्पष्ट झालेले आहे आणि उद्या न्यायालयीन निवडणुका आयोगाचे निर्णय लागले तर मग अधिक स्पष्टतेने समोरील माझ्या मते कुठलीही निश्चिंत शंका नाही असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा जसे आता बाहेर पडले त्याआधी अडीच वर्ष आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना लोकांना नेत्यांना भेटले असते तर आज दोन मेळावे झाले नसते शिवसेना कुठली ती फक्त उद्धवजींच्यामुळे दोन गट झाले आहे त्याला फक्त उद्धवजी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

जसे मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले शिवसेना भवनाचे दरवाजे स्वतःहून उघडे ठेवले आहे आणि आता लोकांना देखील भेटत आहे, त्यावेळेस आमदारांचा ऐकून घेतलं असतं भेटायला जरी दिले असते तर आज ही वेळ आली नसते,  दोन झेंडे दोन बाजूला दोन मैदान दोन बाजूला दोन मेळावे दोन बाजूला माझ्या मनात ते दुःख आहे. मला समाधान होतं अशातला भाग नाही शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेत फूट पडावी दोन भाग पडावे हे मला देखील समाधानकारक नाही. मला देखील आता दुखवते तर आता उद्धव ठाकरे हिटलर बनले आहेत.

लोकशाही त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेली नाही शिवसेनाप्रमुखांची लोकशाही जी होती शिवसेनाप्रमुख नेत्यांच्या बैठका घ्यायच्या नेत्यांना विचारायचे कुठलीही गोष्ट असेल त्याच्यामध्ये विचार विनिमय होयचे साहेब गेल्यावर सर्व काही विषय संपला हम करोसो कायदा म्हणजे मीच आता ही वाईट वेळ आलेली आहे. मराठी न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना मराठी माणसांमध्येच फूट पाडण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्याचे मला दुःख असल्याचे रामदास कदम म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमShiv Senaशिवसेना