शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कोलांटीवर महापालिकेचे शिक्कामोर्तब

By admin | Updated: March 17, 2016 02:52 IST

कल्याण-डोंबिवली शहरे स्मार्ट करण्यासाठी ६,५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या विकास परिषदेत

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे स्मार्ट करण्यासाठी ६,५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या विकास परिषदेत केली होती. नंतर, मात्र त्यांनी त्या निर्णयावर कोलांटउडी घेत ती माझी घोषणा नव्हती, तर तो पालिकेचाच आराखडा होता, अशी भूमिका घेतली. पालिकेने मात्र आपल्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटीसाठी अवघ्या २५० कोटींची तरतूद करत त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि मुख्यमंत्र्यांकडून स्मार्ट सिटीसाठी निधीच मिळालेला नाही, असे माहिती अधिकारात उघड करत या घोषणेतील फोलपणा उघड केला.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ती माझी घोषणा नव्हती, तर ते पालिकेचे नियोजन होते, असे सांगत सर्व जबाबदारी पालिकेवर ढकलली होती. त्यानंतर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ६,५०० कोटींच्या निधीपैकी काही सरकारकडून प्राप्त झाला का, त्याचे नियोजन कसे असेल, अशी माहिती विचारली. त्यावर महापालिकेचे माहिती अधिकारी विनय कुलकर्णी यांनी सरकारकडून अद्याप कोणताही निधी प्राप्त झालेला नसल्याचे उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवेळी कल्याण-डोंबिवली स्मार्ट आणि सेफ सिटी करण्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन देत सहा हजार ५०० कोटींचा आराखडाच जाहीर केला होता. त्यांच्या घोेषणेमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पण, तेव्हाही त्यांनी ते पालिकेचे स्मार्ट सिटीचे नियोजन असल्याचे स्पष्ट केल्याने आयोगाने मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट दिली होती. नंतर, सभागृहातही त्यांनी स्मार्ट सिटीच्या घोषणेवर घूमजाव केल्याने विरोधकांनी टीका करत ती भाजपाची निवडणूक प्रचाराची खेळी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या कोलांटउडीला माहिती अधिकाराच्या तपशिलाने दुजोरा दिला आहे.

स्मार्ट सिटीचा आराखडा पालिकेने ज्या वेळी केंद्र सरकारला सादर केला, तेव्हाही तो ६,५०० कोटींचा नव्हता, तर १,४४५ कोटींचा होता. त्यामुळे त्याच वेळी स्मार्ट सिटीचे आश्वासन हा भाजपाचा निवडणूक प्रचाराचा भाग होता, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती.

महापालिकेने स्मार्ट सिटीचा 1,445 कोटींचा प्रकल्प अहवाल सरकारला सादर केला. पण, पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाला नाही. आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा महापालिकेसह राजकीय मंडळींना आहे.
विशेषत: भाजपाच्या नेत्यांना दुसऱ्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश स्मार्ट सिटीत नक्की होईल, असा विश्वास आहे. तोवर भाजपाचे सदस्य आणि स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी मात्र स्मार्ट सिटीसाठी 250 कोटींची तरतूदही अर्थसंकल्पात केली आहे.