शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

लॅपटॉपपेक्षा मोबाइलचाच वापर अधिक;ऑनलाइन शिक्षणाचे ठाणे जिल्ह्यातील वास्तव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:53 IST

शहरी भागांतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांचा फायदा, मात्र खेड्यांत शिक्षणासाठी करावा लागतोय संघर्ष

- स्नेहा पावसकरठाणे : कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या. गेली अनेक वर्र्षे काहीसे कठीण किंवा केवळ उच्चभ्रू लोकांपुरते मर्यादित वाटणारे आॅनलाइन शिक्षण आज मध्यमवर्गीय घराघरांतील मुलेही अगदी सहजपणे घेत आहेत आणि त्यात रमलेही आहेत. पालकही आपल्या मुलाचे आॅनलाइन शिक्षण सुरू असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत आहेत.

लॉकडाऊनमुळे शाळा सुरू होणार नसल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बहुतांश शाळांनी सुरुवातीपासूनच आॅनलाइनचा पर्याय निवडला. शाळांनी विद्यार्थ्यांचे तुकड्यांनुसार ग्रुप बनवले. तसेच त्यांचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड तयार करून ते पालकांना पाठवले. आॅनलाइन शाळेच्या वेळा ठरवून दिलेल्या असून या ई-मेल आयडीवर लॉग इन करून तेथील इन्व्हिटेशनवर क्लिक करून क्लासरूम जॉइन करायचा असतो.

काही शाळांनी गुगलच्या माध्यमातून आॅनलाइन क्लास सुरू केले आहेत, तर अनेक शाळांनी स्वत:चे अ‍ॅप तयार केले असून त्याद्वारे मुलांना आॅनलाइन धडे दिले जात आहेत. अनेकांच्या घरी लॅपटॉप, कॉम्प्युटर असतात. मात्र, त्याला कॅमेरा असला तरच आॅनलाइन क्लासरूम जॉइन करता येते. त्यामुळे आॅनलाइन क्लासरूमसाठी घरोघरी पालकांचे मोबाइलच वापरले जातात. त्यामुळे अनेक घरांतून मुलेच दिलेल्या लिंक, अ‍ॅपद्वारे कनेक्ट होऊन स्मार्टली आॅनलाइन शिक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. तांत्रिक कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला, तरीही मोबाइलवरून सुरू असलेले आॅनलाइन क्लास खंडित होत नाहीत. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाइलचाच सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागांत विजेच्या लपंडावाने अडथळा- जनार्दन भेरे भातसानगर : कोरोनामुळे आज ग्रामीण भागांतील नववी, दहावी, बारावीचे विद्यार्थी आॅनलाइनद्वारे शिक्षण घेत आहेत. शहरांत सर्व सुविधा असल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येत नाही. मात्र, ग्रामीण भागांत परिस्थिती वेगळी आहे. सकाळच्या वेळी पालकांची शेतावर जाण्याची घाई असते. अशा वेळी मुलांना पालकांचा मोबाइल मिळणे कठीण असते. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाच्या वेळी कामाला जुंपले जाते. मग, अशा परिस्थितीत ग्रामीण विद्यार्थी आॅनलाइन अभ्यास कसा करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

आॅनलाइन शिक्षणाचा शहरी भागांत निश्चितच उपयोग होत असला तरी शहापूर, जव्हार, मोखाडा यासारख्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र त्याचा उपयोग होतोय, असे वाटत नाही. आज आॅनलाइन शिक्षण सकाळी ८ पासून सुरू होते. यावेळी घरातील माणसे शेतीच्या कामाच्या लगबगीत गुंतलेली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचा मोबाइल मिळणे अशक्य असते.

यावेळी घरातील मुलांना गुरे हाकणे, मजुरांना बोलावणे, त्यांना शेतावर घेऊन जाणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. गेल्या कित्येक दिवसांपासून शहापूर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून कधी रात्रीच्या वेळी, तर कधी विजेचे काम करायचे, या बहाण्याने सकाळपासूनच वीज गायब होते. अशावेळी मोबाइल चार्ज नसला तर विद्यार्थी शिक्षण कसा घेणार? तसेच अनेक भागांत मोबाइलला नेटवर्कच मिळत नाही, असे विद्यार्थी-पालक सांगतात.

बिरवाडी येथील कातकरीवाडीतील आदिम जमातीतील मनीषा लहानू मुकणे एक हुशार विद्यार्थिनी. भातसानगरमधील प्रकल्प विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे आईवडील मजुरी करतात. आदिम जमातीतील ही एकमेव विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे, हे विशेष.‘कामावर गेले तरच सायंकाळी घरात चूल पेटते’

मनीषाच्या घरची परिस्थिती म्हणजे सकाळी कामावर गेले, तर संध्याकाळी घरातील चूल पेटणार. या मुलीच्या वडिलांकडे मोबाइल आहे, पण केवळ आलेला फोन घ्यायचा, बस्स! मग, स्मार्टफोन नसल्याने आॅनलाइन शिक्षणाचा या मुलीला काय उपयोग? ही केवळ मनीषाची व्यथा नसून अशीच अवस्था अनेक विद्यार्थ्यांची आहे. ते आजही या शिक्षणापासून वंचित आहेत. काहींना तर पालक मोबाइलच देत नाहीत. मग, त्यांनी कसे शिक्षण घ्यायचे, हा कळीचा मुद्दा आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीthaneठाणे