शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

लॅपटॉपपेक्षा मोबाइलचाच वापर अधिक;ऑनलाइन शिक्षणाचे ठाणे जिल्ह्यातील वास्तव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:53 IST

शहरी भागांतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांचा फायदा, मात्र खेड्यांत शिक्षणासाठी करावा लागतोय संघर्ष

- स्नेहा पावसकरठाणे : कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या. गेली अनेक वर्र्षे काहीसे कठीण किंवा केवळ उच्चभ्रू लोकांपुरते मर्यादित वाटणारे आॅनलाइन शिक्षण आज मध्यमवर्गीय घराघरांतील मुलेही अगदी सहजपणे घेत आहेत आणि त्यात रमलेही आहेत. पालकही आपल्या मुलाचे आॅनलाइन शिक्षण सुरू असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत आहेत.

लॉकडाऊनमुळे शाळा सुरू होणार नसल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बहुतांश शाळांनी सुरुवातीपासूनच आॅनलाइनचा पर्याय निवडला. शाळांनी विद्यार्थ्यांचे तुकड्यांनुसार ग्रुप बनवले. तसेच त्यांचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड तयार करून ते पालकांना पाठवले. आॅनलाइन शाळेच्या वेळा ठरवून दिलेल्या असून या ई-मेल आयडीवर लॉग इन करून तेथील इन्व्हिटेशनवर क्लिक करून क्लासरूम जॉइन करायचा असतो.

काही शाळांनी गुगलच्या माध्यमातून आॅनलाइन क्लास सुरू केले आहेत, तर अनेक शाळांनी स्वत:चे अ‍ॅप तयार केले असून त्याद्वारे मुलांना आॅनलाइन धडे दिले जात आहेत. अनेकांच्या घरी लॅपटॉप, कॉम्प्युटर असतात. मात्र, त्याला कॅमेरा असला तरच आॅनलाइन क्लासरूम जॉइन करता येते. त्यामुळे आॅनलाइन क्लासरूमसाठी घरोघरी पालकांचे मोबाइलच वापरले जातात. त्यामुळे अनेक घरांतून मुलेच दिलेल्या लिंक, अ‍ॅपद्वारे कनेक्ट होऊन स्मार्टली आॅनलाइन शिक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. तांत्रिक कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला, तरीही मोबाइलवरून सुरू असलेले आॅनलाइन क्लास खंडित होत नाहीत. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाइलचाच सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागांत विजेच्या लपंडावाने अडथळा- जनार्दन भेरे भातसानगर : कोरोनामुळे आज ग्रामीण भागांतील नववी, दहावी, बारावीचे विद्यार्थी आॅनलाइनद्वारे शिक्षण घेत आहेत. शहरांत सर्व सुविधा असल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येत नाही. मात्र, ग्रामीण भागांत परिस्थिती वेगळी आहे. सकाळच्या वेळी पालकांची शेतावर जाण्याची घाई असते. अशा वेळी मुलांना पालकांचा मोबाइल मिळणे कठीण असते. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाच्या वेळी कामाला जुंपले जाते. मग, अशा परिस्थितीत ग्रामीण विद्यार्थी आॅनलाइन अभ्यास कसा करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

आॅनलाइन शिक्षणाचा शहरी भागांत निश्चितच उपयोग होत असला तरी शहापूर, जव्हार, मोखाडा यासारख्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र त्याचा उपयोग होतोय, असे वाटत नाही. आज आॅनलाइन शिक्षण सकाळी ८ पासून सुरू होते. यावेळी घरातील माणसे शेतीच्या कामाच्या लगबगीत गुंतलेली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचा मोबाइल मिळणे अशक्य असते.

यावेळी घरातील मुलांना गुरे हाकणे, मजुरांना बोलावणे, त्यांना शेतावर घेऊन जाणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. गेल्या कित्येक दिवसांपासून शहापूर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून कधी रात्रीच्या वेळी, तर कधी विजेचे काम करायचे, या बहाण्याने सकाळपासूनच वीज गायब होते. अशावेळी मोबाइल चार्ज नसला तर विद्यार्थी शिक्षण कसा घेणार? तसेच अनेक भागांत मोबाइलला नेटवर्कच मिळत नाही, असे विद्यार्थी-पालक सांगतात.

बिरवाडी येथील कातकरीवाडीतील आदिम जमातीतील मनीषा लहानू मुकणे एक हुशार विद्यार्थिनी. भातसानगरमधील प्रकल्प विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे आईवडील मजुरी करतात. आदिम जमातीतील ही एकमेव विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे, हे विशेष.‘कामावर गेले तरच सायंकाळी घरात चूल पेटते’

मनीषाच्या घरची परिस्थिती म्हणजे सकाळी कामावर गेले, तर संध्याकाळी घरातील चूल पेटणार. या मुलीच्या वडिलांकडे मोबाइल आहे, पण केवळ आलेला फोन घ्यायचा, बस्स! मग, स्मार्टफोन नसल्याने आॅनलाइन शिक्षणाचा या मुलीला काय उपयोग? ही केवळ मनीषाची व्यथा नसून अशीच अवस्था अनेक विद्यार्थ्यांची आहे. ते आजही या शिक्षणापासून वंचित आहेत. काहींना तर पालक मोबाइलच देत नाहीत. मग, त्यांनी कसे शिक्षण घ्यायचे, हा कळीचा मुद्दा आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीthaneठाणे