शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

लॅपटॉपपेक्षा मोबाइलचाच वापर अधिक;ऑनलाइन शिक्षणाचे ठाणे जिल्ह्यातील वास्तव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:53 IST

शहरी भागांतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांचा फायदा, मात्र खेड्यांत शिक्षणासाठी करावा लागतोय संघर्ष

- स्नेहा पावसकरठाणे : कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या. गेली अनेक वर्र्षे काहीसे कठीण किंवा केवळ उच्चभ्रू लोकांपुरते मर्यादित वाटणारे आॅनलाइन शिक्षण आज मध्यमवर्गीय घराघरांतील मुलेही अगदी सहजपणे घेत आहेत आणि त्यात रमलेही आहेत. पालकही आपल्या मुलाचे आॅनलाइन शिक्षण सुरू असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत आहेत.

लॉकडाऊनमुळे शाळा सुरू होणार नसल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बहुतांश शाळांनी सुरुवातीपासूनच आॅनलाइनचा पर्याय निवडला. शाळांनी विद्यार्थ्यांचे तुकड्यांनुसार ग्रुप बनवले. तसेच त्यांचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड तयार करून ते पालकांना पाठवले. आॅनलाइन शाळेच्या वेळा ठरवून दिलेल्या असून या ई-मेल आयडीवर लॉग इन करून तेथील इन्व्हिटेशनवर क्लिक करून क्लासरूम जॉइन करायचा असतो.

काही शाळांनी गुगलच्या माध्यमातून आॅनलाइन क्लास सुरू केले आहेत, तर अनेक शाळांनी स्वत:चे अ‍ॅप तयार केले असून त्याद्वारे मुलांना आॅनलाइन धडे दिले जात आहेत. अनेकांच्या घरी लॅपटॉप, कॉम्प्युटर असतात. मात्र, त्याला कॅमेरा असला तरच आॅनलाइन क्लासरूम जॉइन करता येते. त्यामुळे आॅनलाइन क्लासरूमसाठी घरोघरी पालकांचे मोबाइलच वापरले जातात. त्यामुळे अनेक घरांतून मुलेच दिलेल्या लिंक, अ‍ॅपद्वारे कनेक्ट होऊन स्मार्टली आॅनलाइन शिक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. तांत्रिक कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला, तरीही मोबाइलवरून सुरू असलेले आॅनलाइन क्लास खंडित होत नाहीत. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाइलचाच सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागांत विजेच्या लपंडावाने अडथळा- जनार्दन भेरे भातसानगर : कोरोनामुळे आज ग्रामीण भागांतील नववी, दहावी, बारावीचे विद्यार्थी आॅनलाइनद्वारे शिक्षण घेत आहेत. शहरांत सर्व सुविधा असल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येत नाही. मात्र, ग्रामीण भागांत परिस्थिती वेगळी आहे. सकाळच्या वेळी पालकांची शेतावर जाण्याची घाई असते. अशा वेळी मुलांना पालकांचा मोबाइल मिळणे कठीण असते. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाच्या वेळी कामाला जुंपले जाते. मग, अशा परिस्थितीत ग्रामीण विद्यार्थी आॅनलाइन अभ्यास कसा करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

आॅनलाइन शिक्षणाचा शहरी भागांत निश्चितच उपयोग होत असला तरी शहापूर, जव्हार, मोखाडा यासारख्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र त्याचा उपयोग होतोय, असे वाटत नाही. आज आॅनलाइन शिक्षण सकाळी ८ पासून सुरू होते. यावेळी घरातील माणसे शेतीच्या कामाच्या लगबगीत गुंतलेली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचा मोबाइल मिळणे अशक्य असते.

यावेळी घरातील मुलांना गुरे हाकणे, मजुरांना बोलावणे, त्यांना शेतावर घेऊन जाणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. गेल्या कित्येक दिवसांपासून शहापूर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून कधी रात्रीच्या वेळी, तर कधी विजेचे काम करायचे, या बहाण्याने सकाळपासूनच वीज गायब होते. अशावेळी मोबाइल चार्ज नसला तर विद्यार्थी शिक्षण कसा घेणार? तसेच अनेक भागांत मोबाइलला नेटवर्कच मिळत नाही, असे विद्यार्थी-पालक सांगतात.

बिरवाडी येथील कातकरीवाडीतील आदिम जमातीतील मनीषा लहानू मुकणे एक हुशार विद्यार्थिनी. भातसानगरमधील प्रकल्प विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे आईवडील मजुरी करतात. आदिम जमातीतील ही एकमेव विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे, हे विशेष.‘कामावर गेले तरच सायंकाळी घरात चूल पेटते’

मनीषाच्या घरची परिस्थिती म्हणजे सकाळी कामावर गेले, तर संध्याकाळी घरातील चूल पेटणार. या मुलीच्या वडिलांकडे मोबाइल आहे, पण केवळ आलेला फोन घ्यायचा, बस्स! मग, स्मार्टफोन नसल्याने आॅनलाइन शिक्षणाचा या मुलीला काय उपयोग? ही केवळ मनीषाची व्यथा नसून अशीच अवस्था अनेक विद्यार्थ्यांची आहे. ते आजही या शिक्षणापासून वंचित आहेत. काहींना तर पालक मोबाइलच देत नाहीत. मग, त्यांनी कसे शिक्षण घ्यायचे, हा कळीचा मुद्दा आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीthaneठाणे