शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ‘ठामपा’साठी मनसे, राकाँ, काँग्रेस आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 1:56 AM

नवे समीकरण; युतीविरोधात फॉर्म्युला

- अजित मांडके ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेच्या अविनाश जाधव यांना मिळालेली ७२ हजार मते ही येत्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युतीकरिता धोक्याची घंटा आहे. ठाणे मतदारसंघ शिवसेनेला स्वत:कडे खेचून घ्यायचा होता. मात्र, भाजपने तो सोडला नाही व भाजपच्या संजय केळकर यांनी राखला. मात्र, मनसेने घेतलेली मते लक्षात घेता महापालिकेत युतीत बेबनाव निर्माण झाल्यास तो मनसेच्या पथ्यावर पडायला वेळ लागणार नाही.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या गडावर कमळ फुलवले. त्यानंतर, आता झालेल्या निवडणुकीत संजय केळकर यांनी हा गड राखला असला, तरी मताधिक्यात घसरण झाली आहे. मतदारसंघावर शिवसेना, भाजपचे वर्चस्व असतानाही घटलेल्या मताधिक्यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न आहे. मागील निवडणुकीत मनसेला केवळ आठ हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यात तब्बल ६४ हजार ८७४ मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत ठाणे विधानसभेत युतीच्या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अशीच हातमिळवणी केली, तर ते समीकरण युतीला घातक ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे यांना ८३ हजारांची निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभेला येथील गणित सोपे असेल, असे बोलले जात होते. परंतु, ते तितके सोपे नसल्याचे दिसून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुमारे ३५ ते ४० हजार मते मनसेला मिळाल्याचे बोलले जाते. जाधव यांना राबोडी, महागिरी यासारख्या भागांतून चांगली मते मिळाल्याचे दिसून आले.शिवसेना आणि भाजपतील सुप्त संघर्षाचा फटका केळकर यांना बसल्याची चर्चा आहे.

घोडबंदरचा काही भाग, कोलशेत, बाळकुम, ढोकाळी, राबोडी, टेकडी बंगला, वृंदावन, श्रीरंग, महागिरी, हिरानंदानी मेडोज या शहरातील काही महत्त्वाच्या भागातूनही मनसेला आघाडी मिळाल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता, या सर्व भागांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचे वर्चस्व आहे. असे असतानाही त्या भागातील मतदारांनी विरोधात मतदान केल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे १२ नगरसेवक असून भाजपचे १९ नगरसेवक आहेत. असे असतानाही मताधिक्य घटले, हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेच्या ज्या मंडळींचा केळकर यांना विरोध होता, त्यांच्याच क्षेत्रामधील मतांमध्ये दिसून येणारी घट बोलकी आहे.

आघाडीचा मनसेला लाभ

विधानसभेत भाजपला पराभूत करण्याकरिता मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी दिसली. त्याचा फायदा मनसेला झाला. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा हीच आघाडी दिसणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांत इच्छुक जास्त असल्याने अशी तीन पक्षांची आघाडी करण्यात मर्यादा असल्या, तरी युतीवर मात करण्याचा हा मार्ग विरोधकांना दिसला आहे.

टॅग्स :MNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस