शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

By मोरेश्वर येरम | Updated: November 21, 2020 17:43 IST

राजू पाटील यांच्या विधानानंतर पत्री पुलावरुन आता शिवसेना-मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देपत्री पुलाच्या रखडलेल्या कामावरुन मनसेचे शिवसेनेला टोलाकल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांची आदित्य ठाकरेंवर टीकापत्री पुलाजवळील ९० फीट रस्त्याच्या अर्धवट कामावर मनसेने दाखवलं बोट

कल्याणकल्याण-डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पत्री पुलाच्या कामाला आता वेग आला आहे. पण या पुलाच्या बांधकामाबाबत झालेल्या विलंबावरुन आरोपप्रत्यारोप काही थांबताना दिसत नाहीयत. पत्री पुलाच्या गर्डर बसविण्याचं काम आजपासून हाती घेण्यात आलं आहे. हे काम पाहण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. 

'पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्याचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली हे आजोळ आहे. त्यांनी अन्य रखडलेल्या पुलाच्या कामातही लक्ष घालावे', असा खरमरीत टोला मनसेनेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. राजू पाटील यांच्या विधानानंतर पत्री पुलावरुन आता शिवसेना-मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

कल्याण मधील पत्री पुलाचे गर्डर बसविण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. यासाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक देखील घेण्यात आला आहे. दोन दिवस गर्डर बसविण्याचे काम चालणार आहे. या कामानिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. 

पत्री पुलाचं काम बराच काळ रखडल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये रोष निर्माण झाला होता. विरोधकांकडूनही शिवसेना आणि रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका सुरू होती. आज पत्री पुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना मनेसेचे आमदार राजू पाटील हे पुलाजवळ असलेल्या ९० फीट रस्त्यावरील अर्धवट असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. याच वेळी आयुक्त पत्री पुलाजवळ असल्याचे त्यांना कळाले. राजू पाटील मनसे कार्यकर्त्यांसोबत पत्री पूल परिसरात येताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर आयुक्त तिथून निघून गेल्याचं कळातचं राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला. पुढे आयुक्तांशी फोनवर बोलणी झाल्यानंतर सोमवारी आयुक्तांची भेट घेणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे