शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

मीरा-भाईंदर पालिकेकडुन वर्गीकरण न होणारा कचरा उचलण्यास बंद; वर्गीकरण न झालेला कचरा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:01 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्या उद्दीष्टाने शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण २ आॅक्टोबर पासुन शहरभर बंधनकारक केले असून, तसे निर्देश सफाई कामगारांना दिले आहेत.

- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्या उद्दीष्टाने शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण २ आॅक्टोबर पासुन शहरभर बंधनकारक केले असून, तसे निर्देश सफाई कामगारांना दिले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वर्गीकरण न झालेला कचरा उचलण्यात न आल्याने तेथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये स्वच्छतेचे सर्व्हेक्षण केल्यानंतर त्यात मीरा-भार्इंदर शहरातील कचरा वर्गीकरणावर ठपका ठेवण्यात आला होता. यामुळे स्वच्छतेतील अव्वल क्रमांकातुन शहर बाहेर फेकले गेल्याने प्रशासन नाराज झाले. ती उणीव यंदाच्या सर्व्हेक्षणात भरुन काढण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरु झाले आहेत. कचऱ्यानेच शहराचा घात केल्याचा रोष प्रशासनाने वर्गीकरणाच्या माध्यमातुन थेट नागरीकांवर ताणला आहे. यात पुरेशी जनजागृती महत्वाची ठरत असली तरी नागरीकांनी देखील त्याची सवय अंगवळणी पडावी, असा पारदर्शक उद्देश प्रशासनाने त्यामागे ठेवला आहे. पालिकेने त्यासाठी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात वर्गीकरणाची सोय उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात येत आहे. सुका कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने २४ गाड्या कंत्राटावर घेतल्या आहेत. मात्र वर्गीकरणाच्या प्रकल्पाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. कचरा वर्गीकरणाप्रमाणे गोळा केला जात असला तरी पुढे तो घनकचरा प्रकल्पात एकत्रितपणे टाकला जात असल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. यापुर्वी ती जून, जूलैमध्ये सुरु होणार असल्याचे सुतोवाच प्रशासनाकडुन करण्यात आले होते. कचरा वर्गीकरणासाठी प्रशासनाकडुन विविध माध्यमांद्वारे जनजागृती केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अद्यापही कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो एकत्रितपणे साठविण्याची सवय कायम ठेवली आहे. यामुळे काही गृहनिर्माण संस्थांमध्ये खाजगी सफाई कामगारांकडुन उचलण्यात येणारा कचरा वर्गीकरणाअभावी दोन दिवसांपासुन उचललाच जात नसल्याने एकत्रितपणे साठविलेला कचरा आपसुकच कचरा कुंडीत टाकला जात आहे. याबाबत स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले कि, कचऱ्याच्या वर्गीकरणाअभावी यापूर्वी देखील कचरा उचलण्यात आला नव्हता. यानंतरही ज्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण केलेले नाही. तो कचरा २ आॅक्टोबरपासुन उचलण्यास मनाई करण्यात आली आहे. हा प्रकार कायम राहिल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा कार्यवाही केली जाणार आहे. तसेच सफाई कामगार नेते दिलीप गोतारणे यांनी, पालिकेने यापूर्वी देखील एकत्रित कचरा उचलण्यास मनाई केली होती. परंतु, राजकीय ओरड सुरू होताच पुन्हा एकत्रित कचरा उचलण्यास सुरुवात झाली. यंदाही प्रशासनाने दिलेले सरसकट निर्देश राजकीय दबावाखाली सापडु नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर