शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

मीरा-भाईंदर पालिकेकडुन वर्गीकरण न होणारा कचरा उचलण्यास बंद; वर्गीकरण न झालेला कचरा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:01 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्या उद्दीष्टाने शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण २ आॅक्टोबर पासुन शहरभर बंधनकारक केले असून, तसे निर्देश सफाई कामगारांना दिले आहेत.

- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्या उद्दीष्टाने शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण २ आॅक्टोबर पासुन शहरभर बंधनकारक केले असून, तसे निर्देश सफाई कामगारांना दिले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वर्गीकरण न झालेला कचरा उचलण्यात न आल्याने तेथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये स्वच्छतेचे सर्व्हेक्षण केल्यानंतर त्यात मीरा-भार्इंदर शहरातील कचरा वर्गीकरणावर ठपका ठेवण्यात आला होता. यामुळे स्वच्छतेतील अव्वल क्रमांकातुन शहर बाहेर फेकले गेल्याने प्रशासन नाराज झाले. ती उणीव यंदाच्या सर्व्हेक्षणात भरुन काढण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरु झाले आहेत. कचऱ्यानेच शहराचा घात केल्याचा रोष प्रशासनाने वर्गीकरणाच्या माध्यमातुन थेट नागरीकांवर ताणला आहे. यात पुरेशी जनजागृती महत्वाची ठरत असली तरी नागरीकांनी देखील त्याची सवय अंगवळणी पडावी, असा पारदर्शक उद्देश प्रशासनाने त्यामागे ठेवला आहे. पालिकेने त्यासाठी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात वर्गीकरणाची सोय उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात येत आहे. सुका कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने २४ गाड्या कंत्राटावर घेतल्या आहेत. मात्र वर्गीकरणाच्या प्रकल्पाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. कचरा वर्गीकरणाप्रमाणे गोळा केला जात असला तरी पुढे तो घनकचरा प्रकल्पात एकत्रितपणे टाकला जात असल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. यापुर्वी ती जून, जूलैमध्ये सुरु होणार असल्याचे सुतोवाच प्रशासनाकडुन करण्यात आले होते. कचरा वर्गीकरणासाठी प्रशासनाकडुन विविध माध्यमांद्वारे जनजागृती केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अद्यापही कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो एकत्रितपणे साठविण्याची सवय कायम ठेवली आहे. यामुळे काही गृहनिर्माण संस्थांमध्ये खाजगी सफाई कामगारांकडुन उचलण्यात येणारा कचरा वर्गीकरणाअभावी दोन दिवसांपासुन उचललाच जात नसल्याने एकत्रितपणे साठविलेला कचरा आपसुकच कचरा कुंडीत टाकला जात आहे. याबाबत स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले कि, कचऱ्याच्या वर्गीकरणाअभावी यापूर्वी देखील कचरा उचलण्यात आला नव्हता. यानंतरही ज्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण केलेले नाही. तो कचरा २ आॅक्टोबरपासुन उचलण्यास मनाई करण्यात आली आहे. हा प्रकार कायम राहिल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा कार्यवाही केली जाणार आहे. तसेच सफाई कामगार नेते दिलीप गोतारणे यांनी, पालिकेने यापूर्वी देखील एकत्रित कचरा उचलण्यास मनाई केली होती. परंतु, राजकीय ओरड सुरू होताच पुन्हा एकत्रित कचरा उचलण्यास सुरुवात झाली. यंदाही प्रशासनाने दिलेले सरसकट निर्देश राजकीय दबावाखाली सापडु नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर