शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या अनधिकृत बांधकामाविरोधातील आदेशाची तब्बल ५ महिन्यांनंतर मीरा भाईंदर महापालिकेकडून अंमलबजावणी

By धीरज परब | Updated: May 14, 2025 19:59 IST

Mira Bhayandar News: अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी आणि त्यावर कारवाई बद्दल सर्वोच्च न्यायालयाने १३ नोव्हेम्बर आणि १७ डिसेम्बर २०२४ रोजी आदेश दिले असताना त्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक काढण्यास मीरा भाईंदर महापालिकेला तब्बल ५ महिने लागले.

मीरारोड -  अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी आणि त्यावर कारवाई बद्दल सर्वोच्च न्यायालयाने १३ नोव्हेम्बर आणि १७ डिसेम्बर २०२४ रोजी आदेश दिले असताना त्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक काढण्यास मीरा भाईंदर महापालिकेला तब्बल ५ महिने लागले.

अनधिकृत बांधकामे केवळ तेथे राहणा-या लोकांच्या आणि आसपासच्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करीत नाही, तर वीज, भूजल आणि रस्ते संसाधनांवरही परिणाम करतात. संसाधने प्रामुख्याने सुव्यवस्थित विकास आणि अधिकृत उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो. प्रादेशिक योजना किंवा क्षेत्रीय विकास केवळ वैयक्तिक स्वरुपाचा असू शकत नाही, तर तो व्यापक जनहित आणि पर्यावरणाचा विचार करून तयार केला गेला पाहिज असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने १३ नोव्हेंबर आणि १७ डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेश वेळी नोंदवले होते.

अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे बंधनकारक असताना मीरा भाईंदर महापालिकेने शासनाच्या नगरविकास विभागास ६ मार्च २०२५ रोजी पत्र पाठवून आम्ही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार असल्याचे कार्यवाहीचे आदेशातील मुद्दे नमूद केले. वास्तविक महापालिकेने स्वतः आदेश नुसार कार्यवाहीची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना ते केले नाही. विशेष म्हणजे राज्य शासनाने देखील २३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालया च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक जारी केले.  त्या नंतर देखील पालिका आदेशानुसार परिपत्रक काढत नव्हती. अखेर १३ मे रोजी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश नुसार कार्यवाही बद्दल परिपत्रक काढले आहे.

अनधिकृत बांधकामास महापालिका संरक्षण देत वेळीच ठोस कारवाई करत नाही. त्याला सर्रास कर आकारणी, पाणी पुरवठा जोडणी देते. वीज पुरवठा लगेच केला जातो आणि अनधिकृत बांधकाम रहिवास व्याप्त केली जातात. आता भोगवटा प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच सेवा पुरवठादार यांनी वीज जोडणी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण जोडणी इत्यादी सेवा पुरवायच्या आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना चाप बसणार आहे.

बांधकाम परवानगी देताना विकासक,अर्जदार यांच्याकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्या नंतरच इमारतीचा ताबा जागा मालक वा सदनिका मालक यांना सोपवला जाईल असे हमीपत्र घेतले जाणार.  मंजूर नकाशाची प्रत बांधकाम स्थळी प्रदर्शित करायची आहे. बांधकामाची पालिकेने वेळोवेळी तपासणी करून त्याचा अहवाल कार्यालयाच्या नोंदवहीमध्ये नोंदवायचा आहे.  

बांधकामाची व्यक्तीशः तपासणी करून, परवानगीच्या अनुषंगाने बांधकाम झाले आहे किंवा कसे? याची खात्री झाल्यानंतरच विनाविलंब भोगवटा प्रमाणपत्र द्यायचे आहे.

मंजूर नकाशा नुसार बांधकाम न केल्याचे निदर्शनास येताच कार्यवाही आवश्यक आहे.  जोपर्यंत मंजूर नकाशाचे उल्लंघन केलेले बांधकामात सुधारणा करीत नाहीत तो पर्यंत भोगवटा दाखला दिला जाणार नाही.

भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतरही जर बांधकाम परवानगीचे उल्लंघन आढळून आले तर तात्काळ विकासक, मालक, रहिवासी यांच्यावर कायदेशिर कारवाई करायची आहे. चुकीच्या पध्दतीने भोगवटा प्रमाणपत्र मंजूर केलेल्या जबाबदार अधिका-याविरुध्द तात्काळ विभागीय कार्यवाही करायची करणे बंधनकारक आहे. 

कोणत्याही रहिवास वा व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत इमारतीत व्यवसाय करण्या करता स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी कोणताही परवाना देऊ नये.  कोणत्याही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई वेळी अन्य विभागांनी त्वरित आवश्यक मदत करायची आहे.  आदेशा नुसार कारवाईस कोणत्याही प्रकारचे विलंब किंवा दुर्लक्ष केल्यास संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई  केली जाणार आहे.

जागा मालक - विकासक यांनी भोगवटा दाखला, बांधकाम पुर्णत्वाचा दाखला न दिल्याच्या तसेच अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या किंवा मंजूर नकाशाचे उल्लंघन करून केलेल्या बांधकामात दुरुस्ती करण्याकरीत केलेल्या अर्जास मंजूरी न दिल्याच्या विरोधात, कोणताही अर्ज, अपील, पुनरावलोकन अर्ज दाखल केल्यास ९० दिवसांच्या मुदतीत निकाली काढणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक