शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या खून प्रकरणातील सूत्रधाराला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 13, 2024 21:50 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: आरोपींची संख्या चार

जितेंद्र कालेकर, ठाणे : राबोडीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने संशयित सूत्रधार चाैथा आरोपी ओसामा शेख (३५, रा. उत्तरप्रदेश, ठाणे) याला उत्तरप्रदेशच्या विशेष तपास पथकाच्या (एसटीएफ) मदतीने अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. याच प्रकरणात याआधी तिघांना अटक केली असून तब्बल तीन वर्षांनी या सूत्रधाराला पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.

जमील यांची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोरुन २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलीवरुन जात होते. त्याचवेळी मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. गंभीर जखमी अवस्थेतील जमील यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले होते.

या गुन्ह्यातील मोटारसायकलस्वार शाहीद शेख (२२) याला राबोडीतून तर गोळी झाडणाऱ्या इरफान शेख याला उत्तरप्रदेशातून अशा दोघांना यापूर्वीच गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने अटक केली होती. फरार ओसामाचा शोध सुरु असतांनाच युनिट एकच्या ठाणे पथकाच्या हाती हबीब शेख याचाही या खूनातील सहभाग असल्याचे काही पुरावे लागले. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली. त्यापाठोपाठ आता ओसामा यालाही एसटीएफचे अधीक्षक बृजेश सिंह यांनी १२ फेब्रुवारी २०२४ राेजी ताब्यात घेतले. ठाणे पोलिसांच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी एसटीएफच्या ताब्यातून त्याला घेतले असून त्याला बुधवारी ठाण्यात आणले जाण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हयातील गुलरिहा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खीरिया गावातील तो रहिवासी आहे. त्याने त्याच्या गावातील इरफान उर्फ सोनू याच्या मदतीने जमीलची हत्या केल्याचे बृजेश सिंह यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.चार राज्यांमध्ये केले वास्तव्य-

ठाण्यातून पसार झाल्यानंतर ओसामा हा जम्मू काश्मीरच्या कुपवाडा मध्ये पसार झाला होता. तिथे दीड वर्ष टेलरिंगचे काम केल्यानंतर तो जयपूरमध्ये गेला होता. तिथे काही दिवस राहिल्यानंतर काही दिवस लखनऊमध्ये त्याने तळ ठोकला. एसटीएफ आणि ठाणे पोलिस मागावर असल्याची चाहूल लागल्यानंतर तो दिल्लीमध्ये पसार झाला होता. त्यानंतर जमाती म्हणून मुज्जफ्फरनगरमधील काही मस्जिदमध्ये तो वास्तव्य करीत होता. ठाणे पोलिसांकडून त्याची माहिती मिळाल्यानंतर एसटीएफने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी